शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विद्यार्थी ‘कुशल’तेत पुणे विभागाची आघाडी; तंत्रनिकेतनचे थेट कंपन्यांमध्ये प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 17:25 IST

उद्योग क्षेत्राला आवश्यक कौशल्य संपादन करण्याची संधी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांमध्ये जावून मिळू लागली आहे. यामध्ये राज्यात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्देतंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रामध्ये दोन महिने कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेणे बंधनकारकचालु शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाची सुरूवात झाली असून यामध्ये पुणे विभागाची यामध्ये आघाडीया प्रशिक्षणामुळे कंपन्यांना आवश्यक ‘कुशल’ मनुष्यबळ मिळण्यास मदत; तंत्रनिकेतनची मागणीही वाढणार

पुणे : उद्योग क्षेत्राला आवश्यक कौशल्य संपादन करण्याची संधी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांमध्ये जावून मिळू लागली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी ‘कुशल’ होवू लागले असून उद्योग क्षेत्राकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये राज्यात पुणे विभागाने आघाडी घेतली असून प्रत्यक्ष खासगी कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेण्यास सुरूवात झाली आहे.तंत्र शिक्षणची पदवी, पदविका मिळवूनही योग्य प्रशिक्षणाअभावी बेरोजगारीला सामोरे जावे लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये जावून काम करण्याचा अनुभव मिळत नव्हता. त्यामुळे तेथील कामाची संस्कृती, स्वरूप अशा विविध बाबींपासून हे विद्यार्थी कोसो दूर होते. ही बाब लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने एक पाऊल पुढे टाकत सुधारीत अभ्यासक्रमातच या गोष्टींचा समावेश केला आहे. त्यानुसार तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रामध्ये दोन महिने कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी मंडळाने इंडस्ट्री असोसिएशनसोबत करारही केला आहे. विशेष म्हणजे या कामाचे मुल्यांकन करून त्याचे गुणही विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. चालु शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाची सुरूवात झाली असून यामध्ये पुणे विभागाने आघाडी घेतली आहे.पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यात उन्हाळी सुट्टीमध्ये सुमारे ३२०० विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेतले. हा सोलापूर पॅटर्न आता संपूर्ण  पुणे विभागातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्येही राबविला जाणार आहे. त्यानुसार सध्या पाचव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. १ ते १३ डिसेंबर या कालावधीत कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घेता येणार आहे. यासाठी विद्यार्थी व खासगी कंपन्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात केवळ पुणे विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व उद्योगांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

राज्यात सुरूवातीला केवळ पुणे विभागात अशाप्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात होणार्‍या या प्रशिक्षणासाठी कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षणामुळे कंपन्यांना आवश्यक ‘कुशल’ मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच पुढील दोन-तीन वर्षांत तंत्रनिकेतनची मागणीही वाढणार आहे.- एम. आर. चितलांगे, उप सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, पुणे विभाग

टॅग्स :Studentविद्यार्थीPuneपुणे