शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

करपा, तांबेरा आणि खोडकिडा रोगांमुळे भातपिकावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:45 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे.

तळेघर - आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी व परिसर भातशेतीचे आगर समजले जाते. पुणे जिल्ह्यातील एकूण ६३,८०० हेक्टर भात क्षेत्रापैकी ५,१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. प्रत्येक वर्षी आदिवासी शेतकरी हा रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळामध्ये हा शुभमुहूर्त समजून धूळवाफेवर पेरण्या करतो. दर वर्षीप्रमाणे चालू वर्षीही आदिवासी बांधवानी या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळामध्ये काही ठिकाणी धूळवाफेवर, तर काही ठिकाणी चिडवाफेवर पेरण्या उरकून घेतल्या.गत वर्षीपेक्षा चालू वर्षी रोहिणी व मृग या नक्षत्रांपाठोपाठ आर्द्रा व पुनर्वसु (कोर) या नक्षत्रांतही सुरुवातीपासूनच पावसाने चांगलीच साथ दिल्याने भातपेरणी केलेला वरचा दाणा व मातीआड झालेला दाणा उगवून येऊन भातरोपे चांगल्या प्रकारे तरारल्याने आदिवासी शेतकºयांनी लागवडी उरकून घेतल्या. यानंतर या भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी भातरोपे सडून गेली, तर काही ठिकाणी बांध फुटून भातखाचरे गाडली गेली.तिन्ही खोºयांमध्ये भातपिकांना करपा, तांबेरा व खोडकिड्याने या रोगांनी ग्रासल्याने पिक पिवळे व तांबडे पडून जळून गेले आहे.गेल्या २० ते २५ दिवसांपासून या भागात पावसाने दडी मारल्यामुळे दाट धुके व रोगट वातावरणामुळे या भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातपिके जळू लागली आहेत. हे रोग पडल्यानंतर पुढील लक्षणे जाणवत आहेत.या भागात राहणारा आदिवासी शेतकरी हा १२ महिन्यांतून भात हे एकमेव पीक घेतो.भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे त्यांच्या जीवनाचा तो मुख्य आधार समजला जातो. कित्येक वर्षांपासून निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भातशेती संकटात सापडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बारा महिने मोठ्या आशेने काबाडकष्ट करून ऐन वेळी होणाºया निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भात उत्पादनवाढीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.भातपिकांना करपा, तांबेरा व खोडकिड्याने ग्रासल्याने सगळीकडे भातरोपे तांबडी-पिवळी पडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरापासून पावसाने या भागातून काढता पाय घेतला आहे. सद्य:स्थितीमध्ये या भागात भातपिकासाठी दोन ते तीन वेळा पावसाची आवश्यकता आहे. या एक ते दोन दिवसांमध्ये जर वेळेत पाऊस झाला नाही, तर एकीकडे रोगांनी ग्रासलेले आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या