शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

करपा, तांबेरा आणि खोडकिडा रोगांमुळे भातपिकावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:45 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे.

तळेघर - आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातशेती धोक्यात आली आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी व परिसर भातशेतीचे आगर समजले जाते. पुणे जिल्ह्यातील एकूण ६३,८०० हेक्टर भात क्षेत्रापैकी ५,१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. प्रत्येक वर्षी आदिवासी शेतकरी हा रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळामध्ये हा शुभमुहूर्त समजून धूळवाफेवर पेरण्या करतो. दर वर्षीप्रमाणे चालू वर्षीही आदिवासी बांधवानी या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या काळामध्ये काही ठिकाणी धूळवाफेवर, तर काही ठिकाणी चिडवाफेवर पेरण्या उरकून घेतल्या.गत वर्षीपेक्षा चालू वर्षी रोहिणी व मृग या नक्षत्रांपाठोपाठ आर्द्रा व पुनर्वसु (कोर) या नक्षत्रांतही सुरुवातीपासूनच पावसाने चांगलीच साथ दिल्याने भातपेरणी केलेला वरचा दाणा व मातीआड झालेला दाणा उगवून येऊन भातरोपे चांगल्या प्रकारे तरारल्याने आदिवासी शेतकºयांनी लागवडी उरकून घेतल्या. यानंतर या भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी भातरोपे सडून गेली, तर काही ठिकाणी बांध फुटून भातखाचरे गाडली गेली.तिन्ही खोºयांमध्ये भातपिकांना करपा, तांबेरा व खोडकिड्याने या रोगांनी ग्रासल्याने पिक पिवळे व तांबडे पडून जळून गेले आहे.गेल्या २० ते २५ दिवसांपासून या भागात पावसाने दडी मारल्यामुळे दाट धुके व रोगट वातावरणामुळे या भातपिकावर करपा, तांबेरा व खोडकिडा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भातपिके जळू लागली आहेत. हे रोग पडल्यानंतर पुढील लक्षणे जाणवत आहेत.या भागात राहणारा आदिवासी शेतकरी हा १२ महिन्यांतून भात हे एकमेव पीक घेतो.भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे त्यांच्या जीवनाचा तो मुख्य आधार समजला जातो. कित्येक वर्षांपासून निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भातशेती संकटात सापडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बारा महिने मोठ्या आशेने काबाडकष्ट करून ऐन वेळी होणाºया निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भात उत्पादनवाढीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.भातपिकांना करपा, तांबेरा व खोडकिड्याने ग्रासल्याने सगळीकडे भातरोपे तांबडी-पिवळी पडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरापासून पावसाने या भागातून काढता पाय घेतला आहे. सद्य:स्थितीमध्ये या भागात भातपिकासाठी दोन ते तीन वेळा पावसाची आवश्यकता आहे. या एक ते दोन दिवसांमध्ये जर वेळेत पाऊस झाला नाही, तर एकीकडे रोगांनी ग्रासलेले आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या