शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पंचनामे झाले... पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST

पुणे : शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. आठ-बाय दहाच्या खोल्यांमध्ये फुललेला संसार अवघ्या काही क्षणात ...

पुणे : शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. आठ-बाय दहाच्या खोल्यांमध्ये फुललेला संसार अवघ्या काही क्षणात नाहीसा झाला. दररोजच्या जगण्याचा संघर्ष मांडलेला असतानाच अचानक कोसळलेल्या या संकटातून मार्ग काढायचा कसा अशा विवंचनेत लोहियानगर येथील जळीतग्रस्त आहेत. जळालेल्या घरांचे पंचनामे झाले... आता पुढे काय? असा उद्विग्न सवालही त्यांनी यंत्रणेला केला आहे.

लोहियानगर वसाहतीमध्ये सोमवारी रात्री आग लागली. पुठ्ठ्यांपासून बॉक्स बनविण्याच्या घरगुती कारखान्याला लागलेली आग बघता बघता वाढली. आठ ते दहा घरे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्याने नागरिक आपल्या मुलांना, घरातील ज्येष्ठांना घेऊन बाहेर पळाले. नागरिकांनी जागरुकता दाखवित घरातील सिलेंडर बाहेर काढून ठेवले. अग्निशामक दलाचे मुख्य केंद्र अगदी जवळच असल्याने तेथूनच पाईप लावून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या आगीमध्ये कोणाच्या घरातील मौल्यवान वस्तू जळून गेल्या. तर, कोणाच्या मुलांचे शैक्षणिक साहित्य जळून गेले. पै-पै जोडून जमा केलेले पैसे, कपडे, संसारोपयोगी वस्तू जळून गेल्या. ही आग धुमसत असताना एकही नगरसेवक किंवा अधिकारी फिरकला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. अधिकारी आणि नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी भेट दिली.

===

एरवी आगीच्या घटना घडल्यानंतर पालिका प्रशासन-नगरसेवकांकडून जवळच्या शाळांमध्ये जळीतग्रस्तांची व्यवस्था केली जाते. त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय केली जाते. परंतू, अशी कोणतीही सोय करण्यात आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.