शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

लोकनिर्माण युवा शिबिर : ग्रामविकासासाठी लोकनिर्माणाची चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 02:09 IST

कोकणातील चिखलगावासारख्या दुर्मिळ भागामध्ये ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन गेलेले राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दाम्पत्याने लोकसाधना चळवळ उभारली.

पुणे : कोकणातील चिखलगावासारख्या दुर्मिळ भागामध्ये ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन गेलेले राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दाम्पत्याने लोकसाधना चळवळ उभारली. ग्रामविकासाला हातभार लावणारी सामाजिक कार्यकर्त्यांची भावी पिढी घडावी, यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसाधना आणि टीम तरुणाईतर्फे २५ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान लोकनिर्माण युवा शिबिराचा उपक्रम चिखलगावमध्य ेहाती घेण्यात आला आहे. यामध्ये देशभरातील ३००, तर पुणे जिल्ह्यातील सुमारे १५ तरुण-तरुणींचा समावेश आहे.चिखलगाव आणि आजूबाजूच्या ४६ गावांमध्ये कौशल्याधारित शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण आणि सर्वांगीण विकास या क्षेत्रांमध्ये लोकसाधना कार्यरत आहे. तरुणाईच्या ऊर्जेतूनच लोकनिर्माण, ग्रामकल्याण आणि राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी लोकनिर्माण युवा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. देशाच्या कोणत्याही भूभागात गेलो तरी तेथील परिस्थितीशी जुळवून घेता यावे, सक्षम होता यावे, यादृष्टीने या वेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे.शिबिरादरम्यान दांडेकर दाम्पत्यासह डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. दिलीप कुलकर्णी आणि डॉ. पौर्णिमा कुलकर्णी, भगीरथचे डॉ. प्रसाद देवधर, विज्ञानाश्रमचे डॉ. योगेश कुलकर्णी, कोकणातील माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, अविनाश धर्माधिकारी आणि पूर्णा धर्माधिकारी अशा मान्यवरांचे मार्गदर्शन तरुणांना मिळणार आहे. यामध्ये कोकणातील कौशल्य विकासाची चळवळ, निसर्गभान, श्रमदान, गटचर्चा, पक्षिनिरीक्षण, रात्रभ्रमंती आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. दहा दिवसांच्या या शिबिरामध्ये तरुणांची ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडली जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामीण पर्यटन व पर्यावरण, ग्राम विकासाची चळवळ व लोकसहभाग, खेड्यांचा आर्थिक विकास, स्मार्ट खेडी व स्मार्ट शहरे, कौशल्यविकासातून खेड्यांचा विकास अशा विषयांबाबत विचारमंथन होणार आहे.१ आॅगस्ट १९१९ ते १ आॅगस्ट २०२० या कालावधीमध्ये हे लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. गेली ४० वर्षे चिखलगावात काम करीत असताना ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून नवीन विचार पुढे आणावा, अशी कल्पना होती. त्यातूनच लोकनिर्माण युवा शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात आली. समाजामध्ये नव्याने लोकनिर्माणाची गरज भासत असते. सामाजिक कार्याला बळकटी द्यायची असेल तर मनुष्यबळ आवश्यक असते. खेडी स्वयंपूर्ण झाल्यास देशाचा विकास होऊ शकेल आणि त्यासाठी तरुणांचा ग्रामविकासामधील सहभाग आवश्यक आहे. सहा लाख खेड्यांमध्ये युवकांनी परतण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामीण विकासाचे सूत्र घेऊन लोकनिर्माण युवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.- डॉ. राजा दांडेकर, संस्थापक, लोकसाधना

टॅग्स :Puneपुणे