शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

लोकनिर्माण युवा शिबिर : ग्रामविकासासाठी लोकनिर्माणाची चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 02:09 IST

कोकणातील चिखलगावासारख्या दुर्मिळ भागामध्ये ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन गेलेले राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दाम्पत्याने लोकसाधना चळवळ उभारली.

पुणे : कोकणातील चिखलगावासारख्या दुर्मिळ भागामध्ये ग्रामविकासाचे स्वप्न घेऊन गेलेले राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दाम्पत्याने लोकसाधना चळवळ उभारली. ग्रामविकासाला हातभार लावणारी सामाजिक कार्यकर्त्यांची भावी पिढी घडावी, यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसाधना आणि टीम तरुणाईतर्फे २५ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान लोकनिर्माण युवा शिबिराचा उपक्रम चिखलगावमध्य ेहाती घेण्यात आला आहे. यामध्ये देशभरातील ३००, तर पुणे जिल्ह्यातील सुमारे १५ तरुण-तरुणींचा समावेश आहे.चिखलगाव आणि आजूबाजूच्या ४६ गावांमध्ये कौशल्याधारित शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण आणि सर्वांगीण विकास या क्षेत्रांमध्ये लोकसाधना कार्यरत आहे. तरुणाईच्या ऊर्जेतूनच लोकनिर्माण, ग्रामकल्याण आणि राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी लोकनिर्माण युवा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. देशाच्या कोणत्याही भूभागात गेलो तरी तेथील परिस्थितीशी जुळवून घेता यावे, सक्षम होता यावे, यादृष्टीने या वेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे.शिबिरादरम्यान दांडेकर दाम्पत्यासह डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. दिलीप कुलकर्णी आणि डॉ. पौर्णिमा कुलकर्णी, भगीरथचे डॉ. प्रसाद देवधर, विज्ञानाश्रमचे डॉ. योगेश कुलकर्णी, कोकणातील माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, अविनाश धर्माधिकारी आणि पूर्णा धर्माधिकारी अशा मान्यवरांचे मार्गदर्शन तरुणांना मिळणार आहे. यामध्ये कोकणातील कौशल्य विकासाची चळवळ, निसर्गभान, श्रमदान, गटचर्चा, पक्षिनिरीक्षण, रात्रभ्रमंती आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. दहा दिवसांच्या या शिबिरामध्ये तरुणांची ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडली जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामीण पर्यटन व पर्यावरण, ग्राम विकासाची चळवळ व लोकसहभाग, खेड्यांचा आर्थिक विकास, स्मार्ट खेडी व स्मार्ट शहरे, कौशल्यविकासातून खेड्यांचा विकास अशा विषयांबाबत विचारमंथन होणार आहे.१ आॅगस्ट १९१९ ते १ आॅगस्ट २०२० या कालावधीमध्ये हे लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. गेली ४० वर्षे चिखलगावात काम करीत असताना ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून नवीन विचार पुढे आणावा, अशी कल्पना होती. त्यातूनच लोकनिर्माण युवा शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात आली. समाजामध्ये नव्याने लोकनिर्माणाची गरज भासत असते. सामाजिक कार्याला बळकटी द्यायची असेल तर मनुष्यबळ आवश्यक असते. खेडी स्वयंपूर्ण झाल्यास देशाचा विकास होऊ शकेल आणि त्यासाठी तरुणांचा ग्रामविकासामधील सहभाग आवश्यक आहे. सहा लाख खेड्यांमध्ये युवकांनी परतण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामीण विकासाचे सूत्र घेऊन लोकनिर्माण युवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.- डॉ. राजा दांडेकर, संस्थापक, लोकसाधना

टॅग्स :Puneपुणे