शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाला विरोध; स्वत:ही ‘सहभागी’

By admin | Updated: November 30, 2014 00:45 IST

एकीकडे ‘ते’ साहित्य संमेलनावर टीका करीत विरोध दर्शवितात; पण दुसरीकडे स्वत: संमेलनात सहभागी होतात,

पुणो : एकीकडे ‘ते’ साहित्य संमेलनावर टीका करीत विरोध दर्शवितात; पण दुसरीकडे स्वत: संमेलनात सहभागी होतात, अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणो यांनी भालचंद्र नेमाडे यांच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले. 
साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग आहे. यावर चर्चा करणो हा वेळेचा अपव्यय आहे, अशा प्रकारची विधाने करून  ‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे यांनी संमेलनाच्या आयोजनाची खिल्ली उडवली. या संदर्भातील नेमाडे यांच्या दुटप्पी भूमिकेवर फुटाणो यांनी मात्र एक प्रकारे प्रहार केला. नेमाडे हे सत्यशोधक आहेत. त्यामुळे त्यांनी बोलत राहिले पाहिजे, संमेलनाला त्यांचा विरोध असला, तरी ते संमेलनाला जातात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या समवेत  घुमानच्या संमेलनाचे आयोजक सरहद्द संस्थेचे संजय नहार आणि स्वागताध्यक्ष भारत देसडला उपस्थित होते. 
नेमाडे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष का केले जात नाही? याविषयी विचारले असता फुटाणो म्हणाले, नेमाडे यांना अध्यक्ष करणारे आम्ही कोण? खरे तर ज्या साहित्यिकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत, त्यांना संमेलनाध्यक्ष करायला पाहिजे. मात्र, साहित्य महामंडळाच्या घटनेत अशा प्रकारची कोणतीच तरतूद नाही. यासाठी घटनादुरुस्ती झाली पाहिजे. मात्र, अजूनही महामंडळाच्या घटनादुरुस्तीचे घोंगडे भिजत पडले आहे. 
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी कृषिमंत्री शरद पवार, तसेच पंजाबचे महापौर प्रकाशसिंग बादल आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुरुदयाल सिंग उपस्थित राहणार आहेत. नहार म्हणाले, संमेलनात दर वर्षी टीका  होतच असते. मात्र, या टीकेलाही आम्ही सकारात्मक पद्धतीनेच घेणार आहोत. 
(प्रतिनिधी)
 
साहित्यिकांना 25 ते 3क् हजार रुपये इतके प्रकाशकांकडून मानधन मिळते. तेवढय़ा पैशांत साहित्यिक कुठे कुठे जाणार? त्यामुळे संमेलनासाठी निधी हा उभारावाच लागतो. हा निधी उभारणो ही आयोजकांसाठी मोठी तारेवरची कसरत असते.
- रामदास फुटाणो
 
4आमचा संबंध हा केवळ संमेलनापुरता आहे. नेमाडे यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर आम्हाला कोणतेही भाष्य करायचे नाही, असे सांगून संमेलनाविषयी सध्या काही मंडळींकडून चुकीचे वातावरण निर्माण केले जात आहे, याबद्दल मात्र नहार आणि देसडला यांनी नाराजी व्यक्त केली. देसडला म्हणाले, संमेलनासाठी येणा:या 3 हजार प्रतिनिधींच्या माध्यमातून सुमारे 75 लाख रुपये, राज्य शासनाकडून 25 लाख रुपये आणि मित्रमंडळी, संस्था आणि संघटनांकडून उर्वरित रक्कम संकलित केली जाणार आहे. रेल्वे, संमेलन मंडप, निवास व्यवस्था या सगळ्या व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. संमेलनाला यापूर्वीच्या सर्व स्वागताध्यक्षांना नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.