शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

संमेलनाला विरोध; स्वत:ही ‘सहभागी’

By admin | Updated: November 30, 2014 00:45 IST

एकीकडे ‘ते’ साहित्य संमेलनावर टीका करीत विरोध दर्शवितात; पण दुसरीकडे स्वत: संमेलनात सहभागी होतात,

पुणो : एकीकडे ‘ते’ साहित्य संमेलनावर टीका करीत विरोध दर्शवितात; पण दुसरीकडे स्वत: संमेलनात सहभागी होतात, अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणो यांनी भालचंद्र नेमाडे यांच्या दुटप्पी भूमिकेवर ताशेरे ओढले. 
साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग आहे. यावर चर्चा करणो हा वेळेचा अपव्यय आहे, अशा प्रकारची विधाने करून  ‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे यांनी संमेलनाच्या आयोजनाची खिल्ली उडवली. या संदर्भातील नेमाडे यांच्या दुटप्पी भूमिकेवर फुटाणो यांनी मात्र एक प्रकारे प्रहार केला. नेमाडे हे सत्यशोधक आहेत. त्यामुळे त्यांनी बोलत राहिले पाहिजे, संमेलनाला त्यांचा विरोध असला, तरी ते संमेलनाला जातात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या समवेत  घुमानच्या संमेलनाचे आयोजक सरहद्द संस्थेचे संजय नहार आणि स्वागताध्यक्ष भारत देसडला उपस्थित होते. 
नेमाडे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष का केले जात नाही? याविषयी विचारले असता फुटाणो म्हणाले, नेमाडे यांना अध्यक्ष करणारे आम्ही कोण? खरे तर ज्या साहित्यिकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत, त्यांना संमेलनाध्यक्ष करायला पाहिजे. मात्र, साहित्य महामंडळाच्या घटनेत अशा प्रकारची कोणतीच तरतूद नाही. यासाठी घटनादुरुस्ती झाली पाहिजे. मात्र, अजूनही महामंडळाच्या घटनादुरुस्तीचे घोंगडे भिजत पडले आहे. 
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी कृषिमंत्री शरद पवार, तसेच पंजाबचे महापौर प्रकाशसिंग बादल आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुरुदयाल सिंग उपस्थित राहणार आहेत. नहार म्हणाले, संमेलनात दर वर्षी टीका  होतच असते. मात्र, या टीकेलाही आम्ही सकारात्मक पद्धतीनेच घेणार आहोत. 
(प्रतिनिधी)
 
साहित्यिकांना 25 ते 3क् हजार रुपये इतके प्रकाशकांकडून मानधन मिळते. तेवढय़ा पैशांत साहित्यिक कुठे कुठे जाणार? त्यामुळे संमेलनासाठी निधी हा उभारावाच लागतो. हा निधी उभारणो ही आयोजकांसाठी मोठी तारेवरची कसरत असते.
- रामदास फुटाणो
 
4आमचा संबंध हा केवळ संमेलनापुरता आहे. नेमाडे यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर आम्हाला कोणतेही भाष्य करायचे नाही, असे सांगून संमेलनाविषयी सध्या काही मंडळींकडून चुकीचे वातावरण निर्माण केले जात आहे, याबद्दल मात्र नहार आणि देसडला यांनी नाराजी व्यक्त केली. देसडला म्हणाले, संमेलनासाठी येणा:या 3 हजार प्रतिनिधींच्या माध्यमातून सुमारे 75 लाख रुपये, राज्य शासनाकडून 25 लाख रुपये आणि मित्रमंडळी, संस्था आणि संघटनांकडून उर्वरित रक्कम संकलित केली जाणार आहे. रेल्वे, संमेलन मंडप, निवास व्यवस्था या सगळ्या व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. संमेलनाला यापूर्वीच्या सर्व स्वागताध्यक्षांना नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.