शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पुनर्वसन प्रकल्प रखडल्याने लाभार्थ्यांचे निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST

विकसकाने ही जागा एसआरए अंतर्गत विकसित करण्यासाठी १२६ घरे तोडून डिसेंबर २०१७ मध्ये ताबा पूर्णतः स्वतःकडे घेतला आणि २४ ...

विकसकाने ही जागा एसआरए अंतर्गत विकसित करण्यासाठी १२६ घरे तोडून डिसेंबर २०१७ मध्ये ताबा पूर्णतः स्वतःकडे घेतला आणि २४ महिन्यांच्या आत प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल असे आश्वासन दिले. परंतु, २०२१ चा जून उजाडला तरीही पायाभरणीच्या पुढे काहीच काम झालेले नाही. यामध्ये स्थानिक रहिवाशांची फसवणूक झाल्याने नागरिकांनी निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

सध्या प्रकल्पातील लाभार्थ्यांना दुसरीकडे राहण्यासाठी भाडेपोटी दरमहा ३ हजार रुपये मिळत आहे. परंतु, वडारवाडीच्या ५ किलोमीटरच्या परिघात घरांचे भाडे हे ६ हजार रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे गेली ४८ महिने येथील रहिवासी पदरचे पैसे टाकून बिल्डरचा व्यवसाय चालवीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे परेश शिरसंगे, राहुल भोसले, रवी कांबळे, मनोहर पवार, दत्तात्रय गोसावी, सिद्राम कांबळे, सुभाष भरमनोर, युवराज कदम, तुषार भिसे, मनोज तेलंगी, पौर्णिमा कदम व स्थानिक महिला उपस्थित होत्या.

-----

विकसकाने अद्याप करारच केला नाही

विकसकाने कुठल्याही प्रकारचे करार कागदोपत्री येथील नागरिकांशी केलेले नाही. शासनमान्य नकाशाप्रमाणे पूर्ण जागेचा ताबा न मिळवताच विकसकाने घरे तोडून बांधकामास सुरुवात केली व आता ही बाब लक्षात आल्यामुळे बांधकाम बंद ठेवले आहे. याबाबत एसआरएच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करण्यात येत आहे. मात्र, ते विकसकाची बाजू घेऊन उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे बिल्डर दरवेळी आज काम सुरू करतो, उद्या काम सुरू करतो, १५ दिवसांत नाहीतर महिन्यात काम सुरू करतो, अशी नवनवीन कारणे सांगून नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

-----

लाभार्थ्यांची फरफट सुरूच

टाळेबंदीमुळे येथील बहुतांश नागरिकांचा रोजगार गेला आहे. मिळेल त्या पगारात पडेल ते काम करून कसाबसा संसाराचा गाढा ओढताना अजून किती दिवस पदर मोडून बिल्डरचा व्यवसाय चालवायचा आणि अजून किती दिवस हे आर्थिक आणि मानसिक शोषण सहन करायचं, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

फोटो : वडारवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प चार वर्षांपासून रखडल्याने कंटाळून लाभार्थ्यांनी निषेध आंदोलन केले.