शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पुनर्वसन प्रकल्प रखडल्याने लाभार्थ्यांचे निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST

विकसकाने ही जागा एसआरए अंतर्गत विकसित करण्यासाठी १२६ घरे तोडून डिसेंबर २०१७ मध्ये ताबा पूर्णतः स्वतःकडे घेतला आणि २४ ...

विकसकाने ही जागा एसआरए अंतर्गत विकसित करण्यासाठी १२६ घरे तोडून डिसेंबर २०१७ मध्ये ताबा पूर्णतः स्वतःकडे घेतला आणि २४ महिन्यांच्या आत प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल असे आश्वासन दिले. परंतु, २०२१ चा जून उजाडला तरीही पायाभरणीच्या पुढे काहीच काम झालेले नाही. यामध्ये स्थानिक रहिवाशांची फसवणूक झाल्याने नागरिकांनी निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

सध्या प्रकल्पातील लाभार्थ्यांना दुसरीकडे राहण्यासाठी भाडेपोटी दरमहा ३ हजार रुपये मिळत आहे. परंतु, वडारवाडीच्या ५ किलोमीटरच्या परिघात घरांचे भाडे हे ६ हजार रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे गेली ४८ महिने येथील रहिवासी पदरचे पैसे टाकून बिल्डरचा व्यवसाय चालवीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे परेश शिरसंगे, राहुल भोसले, रवी कांबळे, मनोहर पवार, दत्तात्रय गोसावी, सिद्राम कांबळे, सुभाष भरमनोर, युवराज कदम, तुषार भिसे, मनोज तेलंगी, पौर्णिमा कदम व स्थानिक महिला उपस्थित होत्या.

-----

विकसकाने अद्याप करारच केला नाही

विकसकाने कुठल्याही प्रकारचे करार कागदोपत्री येथील नागरिकांशी केलेले नाही. शासनमान्य नकाशाप्रमाणे पूर्ण जागेचा ताबा न मिळवताच विकसकाने घरे तोडून बांधकामास सुरुवात केली व आता ही बाब लक्षात आल्यामुळे बांधकाम बंद ठेवले आहे. याबाबत एसआरएच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करण्यात येत आहे. मात्र, ते विकसकाची बाजू घेऊन उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे बिल्डर दरवेळी आज काम सुरू करतो, उद्या काम सुरू करतो, १५ दिवसांत नाहीतर महिन्यात काम सुरू करतो, अशी नवनवीन कारणे सांगून नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

-----

लाभार्थ्यांची फरफट सुरूच

टाळेबंदीमुळे येथील बहुतांश नागरिकांचा रोजगार गेला आहे. मिळेल त्या पगारात पडेल ते काम करून कसाबसा संसाराचा गाढा ओढताना अजून किती दिवस पदर मोडून बिल्डरचा व्यवसाय चालवायचा आणि अजून किती दिवस हे आर्थिक आणि मानसिक शोषण सहन करायचं, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

फोटो : वडारवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प चार वर्षांपासून रखडल्याने कंटाळून लाभार्थ्यांनी निषेध आंदोलन केले.