शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक भिंतीच्या कामामुळे घरांच्या भिंतींना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST

महापालिकेचे दुर्लक्ष : आंबील ओढ्याशेजारच्या रहिवाशांचा जीव धोक्यात अमोल अवचिते पुणे : सर्व्हे क्रमांक १३३, इंदिरानगर (५२ चाळ) या ...

महापालिकेचे दुर्लक्ष : आंबील ओढ्याशेजारच्या रहिवाशांचा जीव धोक्यात

अमोल अवचिते

पुणे : सर्व्हे क्रमांक १३३, इंदिरानगर (५२ चाळ) या भागात आंबील ओढ्यालगत संरक्षित भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. या भिंतीच्या खोदकामामुळे नजीकच्या सुमारे २० ते २५ घरांच्या भिंतींना तडे गेल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. भिंतीना गेलेल्या तड्यांमुळे घरांची अवस्था धोकादायक झाल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून दिसून आले. मोठ्या पावसात कोणत्याही क्षणी ही घरे ढासळण्याची भीती आहे. यातून मनुष्यहानी व वित्तहानीचा धोका आहे.

इंदिरानगर भागात आंबील ओढ्याची संरक्षित भिंत बांधण्यासाठी गेल्या आठवड्यात खोदकाम करण्यात आले. या कामामुळे यंदा तरी भिंत बांधली जाईल असे स्थानिकांना वाटू लागले. मात्र अचानक घरांच्या भिंतींना तडे जात असल्याचे गृहिणींच्या लक्षात आले. सुरुवातीला केसाच्या आकाराच्या रेघा घराच्या भिंतींना पडल्या. मात्र दोन दिवसांतच या रेघांचे रूपांतर मोठ्या फटी-भेगांमध्ये झाले. त्यामुळे या वसाहतीत दहशत पसरली आहे. खोदकामानंतरच हा प्रकार झाल्याचे स्थानिक सांगतात. महापालिका मात्र याकडे सपशेल डोळेझाक करत आहे.

चौकट

पावसाळ्याच्या तोंडावर दहशत

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आंबील ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले. त्यातच गेल्या पंधरवड्यात तीन-चार वेळा शहरात जोरदार पाऊस झाला. आता भिंतीचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न आहे. त्यातच या अर्धवट कामामुळे घरांच्या भिंतींना तडे गेल्याने रहिवाशांमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर दहशत पसरली आहे.

चौकट

गरिबांच्या जिवाची पर्वा नाही?

ओढ्याशेजारील सोसायट्यांच्या बाजूची संरक्षित भिंत याआधीच बांधली गेली आहे. मात्र गरिबांच्या वस्तीकडील भिंतीचे काम रखडले. त्यासाठी महानगरपालिकेकडे निधी नाही. केवळ पावसाच्या तोंडावर भिंत बांधली जाईल, असे दाखून जीव घेण्याचा प्रकार सुरू आहे. महानगरपालिकेला गरिबांच्या जिवाची पर्वा नाही, असा आरोप स्थानिक रहिवासी करतात.

चौकट

१) “घराच्या भिंतीसह फरशी, स्वयंपाकघराचा ओटा, स्वच्छतागृहातील टाईल्स यांनाही तडे पडले आहेत. नळाचे पाईप फुटले आहे. भिंतींमधून पाणी येत आहे. घरात राहण्याची देखील भीती वाटत आहे.”

-दीपक वाघमारे, नागरिक.

२) “ओढ्याचे खोलीकरण करणे अपेक्षित होते. केवळ राडारोडा काढून ओढ्याच्या बाजूला टाकून देण्यात आला. तोही आताच्या पावसात वाहून गेला आहे. लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका लक्ष देत नाही.”

-अनमोल ओव्हाळ, नागरिक.

३) “आंबिल ओढ्यालगतची अतिक्रमणे गेल्या दोन वर्षापासून आहेत तशीच आहेत. सीमाभिंतींची काही ठिकाणी कामे झालीच नाहीत. पावसाळ्याच्या शेवटी महापालिका अशी कोणती जादूची कांडी फिरवणार ज्यामुळे नागरिकांना त्यांची घरे, किडुकमिडूनक वाचवता येईल? महापालिकेकडे पाठपुरावा करूनही काही कार्यवाही झाली नाही.”

- अनंत घरत, प्रमुख, अर्थ फाउंडेशन.