शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

संरक्षक भिंतीच्या कामामुळे घरांच्या भिंतींना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST

महापालिकेचे दुर्लक्ष : आंबील ओढ्याशेजारच्या रहिवाशांचा जीव धोक्यात अमोल अवचिते पुणे : सर्व्हे क्रमांक १३३, इंदिरानगर (५२ चाळ) या ...

महापालिकेचे दुर्लक्ष : आंबील ओढ्याशेजारच्या रहिवाशांचा जीव धोक्यात

अमोल अवचिते

पुणे : सर्व्हे क्रमांक १३३, इंदिरानगर (५२ चाळ) या भागात आंबील ओढ्यालगत संरक्षित भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. या भिंतीच्या खोदकामामुळे नजीकच्या सुमारे २० ते २५ घरांच्या भिंतींना तडे गेल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. भिंतीना गेलेल्या तड्यांमुळे घरांची अवस्था धोकादायक झाल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून दिसून आले. मोठ्या पावसात कोणत्याही क्षणी ही घरे ढासळण्याची भीती आहे. यातून मनुष्यहानी व वित्तहानीचा धोका आहे.

इंदिरानगर भागात आंबील ओढ्याची संरक्षित भिंत बांधण्यासाठी गेल्या आठवड्यात खोदकाम करण्यात आले. या कामामुळे यंदा तरी भिंत बांधली जाईल असे स्थानिकांना वाटू लागले. मात्र अचानक घरांच्या भिंतींना तडे जात असल्याचे गृहिणींच्या लक्षात आले. सुरुवातीला केसाच्या आकाराच्या रेघा घराच्या भिंतींना पडल्या. मात्र दोन दिवसांतच या रेघांचे रूपांतर मोठ्या फटी-भेगांमध्ये झाले. त्यामुळे या वसाहतीत दहशत पसरली आहे. खोदकामानंतरच हा प्रकार झाल्याचे स्थानिक सांगतात. महापालिका मात्र याकडे सपशेल डोळेझाक करत आहे.

चौकट

पावसाळ्याच्या तोंडावर दहशत

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आंबील ओढ्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले. त्यातच गेल्या पंधरवड्यात तीन-चार वेळा शहरात जोरदार पाऊस झाला. आता भिंतीचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न आहे. त्यातच या अर्धवट कामामुळे घरांच्या भिंतींना तडे गेल्याने रहिवाशांमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर दहशत पसरली आहे.

चौकट

गरिबांच्या जिवाची पर्वा नाही?

ओढ्याशेजारील सोसायट्यांच्या बाजूची संरक्षित भिंत याआधीच बांधली गेली आहे. मात्र गरिबांच्या वस्तीकडील भिंतीचे काम रखडले. त्यासाठी महानगरपालिकेकडे निधी नाही. केवळ पावसाच्या तोंडावर भिंत बांधली जाईल, असे दाखून जीव घेण्याचा प्रकार सुरू आहे. महानगरपालिकेला गरिबांच्या जिवाची पर्वा नाही, असा आरोप स्थानिक रहिवासी करतात.

चौकट

१) “घराच्या भिंतीसह फरशी, स्वयंपाकघराचा ओटा, स्वच्छतागृहातील टाईल्स यांनाही तडे पडले आहेत. नळाचे पाईप फुटले आहे. भिंतींमधून पाणी येत आहे. घरात राहण्याची देखील भीती वाटत आहे.”

-दीपक वाघमारे, नागरिक.

२) “ओढ्याचे खोलीकरण करणे अपेक्षित होते. केवळ राडारोडा काढून ओढ्याच्या बाजूला टाकून देण्यात आला. तोही आताच्या पावसात वाहून गेला आहे. लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका लक्ष देत नाही.”

-अनमोल ओव्हाळ, नागरिक.

३) “आंबिल ओढ्यालगतची अतिक्रमणे गेल्या दोन वर्षापासून आहेत तशीच आहेत. सीमाभिंतींची काही ठिकाणी कामे झालीच नाहीत. पावसाळ्याच्या शेवटी महापालिका अशी कोणती जादूची कांडी फिरवणार ज्यामुळे नागरिकांना त्यांची घरे, किडुकमिडूनक वाचवता येईल? महापालिकेकडे पाठपुरावा करूनही काही कार्यवाही झाली नाही.”

- अनंत घरत, प्रमुख, अर्थ फाउंडेशन.