शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

फिर्यादी पोलिसाने फिरविली न्यायालयामध्ये साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 03:17 IST

न्यायालयाकडून कारणे दाखवा; शिवाजीनगर पोलीस लाइनमध्ये झाली होती मारहाण

पुणे : आरोपींना वाचविण्यासाठी चक्क एका पोलिसाने आणि त्याच्या वडिलांना साक्ष फिरवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आले आहे. साक्ष फिरवली म्हणून पिता-पुत्राला न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे.पोलीस विलास एकनाथ भाटे आणि त्याचे वडील एकनाथ राधाजी भाटे यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. नाशिककर यांनी नोटीस बजावण्याचा आदेश दिला. २० जुलै २०१५ रोजी शिवाजीनगरमधील जुनी पोलीस लाइन येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास विलास भाटे यांना मारहाण झाली होती. बस पार्किंगवरून आरोपींनी फिर्यादीला बांबूने मारहाण केली. जखमी झाल्यामुळे फिर्यादी यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले होते.त्याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून महेश मनोहर जाधव (वय २६), उमेश उत्तम काळेबाग (२६), सोनू घन:श्याम गुंड (१८, सर्व रा. जुनी पोलीस लाइन, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पंचनामा करून बांबू आणि शर्ट जप्त करण्यात आला. २७ जुलै २०१५ रोजी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. घटना झाली त्या वेळी फिर्यादी पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील एस. सी. शिंदे यांनी काम पाहिले. त्यांनी खटल्यात सहा साक्षीदार तपासले. यात फिर्यादी भाटे आणि त्याच्या वडिलांच्या साक्षीचा समावेश होता.तपासादरम्यान तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पाटील यांनी एकनाथ भाटे, सुजाता भाटे, अशोक भाऊ बुचडे यांचे जबाब नोंदविले. त्यानंतर भारतीय दंड विधान कायदा कलम ३२४, ३२३, ५०४ नुसार आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याची सुनावणी सुरू असताना फिर्यादी भाटेने संबंधित घटना मी उपस्थितीत नसताना झाल्याचे सांगितले. तर, फिर्यादीच्या वडिलांनी उलटतपासणीत आरोपी तिथे उपस्थित नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यामुळे आरोपींना वाचविण्यासाठी खोटी साक्ष दिल्याप्रकरणी विलास आणि एकनाथ भाटे या दोघांवर कारवाई करण्यात यावी, असा अर्ज अ‍ॅड. शिंदे यांनी दिला होता. त्यानुसार न्यायालयात चुकीची साक्ष दिल्याप्रकरणी फिर्यादी व त्यांच्या वडिलांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३४४ नुसार संबंधितांवर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याचे अतिरिक्त न्यायालयाने निकालात नमूद केले.फिर्यादींना ठाम राहायला हवे होतेघटना घडल्यानंतर भाटे यांनी स्वत:च फिर्याद दाखल केली होती; मात्र घटनेच्या वेळी आरोपी तिथे नव्हतेच, अशी साक्ष फिर्यादींच्या वडिलांनी दिली. फिर्यादीने पोलिसांपुढे दिलेला जबाब आणि साक्ष देतानाचा जबाब वेगळा होता. त्यामुळे फिर्यादी आणि त्याच्या वडिलांनी संबंधित घटना खरी होती, तर त्यावर ठाम राहणे आवश्यक होते.प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबाबतीत घडलेल्या घटनेकडे खऱ्या बाजूने ठाम राहिले पाहिजे. त्याचे मन विचलित होता कामा नये किंवा चुकीची माहिती देऊ नये. ही परिस्थिती पाहता, दोन्ही साक्षीदारांची योग्य चौकशी करणे योग्य आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. शिंदे यांनी केला.

टॅग्स :Courtन्यायालय