शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

संप, टाळेबंदीचे प्रमाण वेगाने घटले

By admin | Updated: May 1, 2017 01:56 IST

राज्यात कामगारांचे संप व टाळेबंदीचे प्रमाण १९८१ नंतरच्या ३ दशकांमध्ये वेगाने घटले असून २०१२ पर्यंत घटलेले हे प्रमाण तीन वर्षांमध्ये

पुणे : राज्यात कामगारांचे संप व टाळेबंदीचे प्रमाण १९८१ नंतरच्या ३ दशकांमध्ये वेगाने घटले असून २०१२ पर्यंत घटलेले हे प्रमाण तीन वर्षांमध्ये पुन्हा वाढले. गेल्या वर्षी ते पुन्हा घटले. उदारीकरणाच्या धोरणामुळे कारखान्यांमध्ये होत असलेले आऊटसोर्सिंग, मोठ्या प्रमाणात झालेले अत्याधुनिकीकरण आणि कंत्राटी पद्धतीने केली जाणारी नोकरभरती ही कारणे त्यामागे असल्याचे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.औरंगाबादसारख्या ठिकाणी कारखानेच बंद होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कामगार संघटनाही अन्याय असला तरी सबुरीचे धोरण घेत असल्याचे चित्र आहे. एका स्थित्यंतराच्या काळामधून कामगार चळवळी जात आहेत. कामगारांचे वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक श्रमांमधून वस्तू उत्पादन करणे. ती स्थिती उदारीकरणाच्या काळात संपली. आऊटसोर्सिंग केले जाऊ लागले. अधिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये ५ टक्के कायमस्वरुपी कामगार उरले. ९५ टक्के कामगार कंत्राटी पद्धतीने काम करू लागले. त्यांनी दरवर्षी आपले कंत्राट होईल की नाही, या भीतीने १२ ते १६ तास काम करणे अंगवळणी पाडून घेतले आहे. सध्याच्या भांडवलशाहीचा वरचष्मा असलेल्या काळात कामगार चळवळींना नेमके काय केले पाहिजे, याचा दृष्टिकोन नाही. नेत्यांना या परिस्थितीचे आकलन नाही. पगार, बोनस, ओव्हरटाईम, कामाचे तास या झापडबंद विचारांमधून बाहेर पडून कामगारांनी नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे, असे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला कामगारांवरचे वाढते ताणतणाव, कामाचे वाढलेले तास आदी बाबींवर ते म्हणाले, की १८८६ नंतरच्या दीडशे वर्षांमध्ये भांडवलशाही प्रचंड वेगाने पुढे गेली आहे. तिचे स्वरूप समजावून घेऊन नवा लढा उभारला पाहिजे. अजेंडा निर्माण केला पाहिजे. भांडवलदारांनी स्पेक्ट्रम, सोलर एनर्जीवर मालकी निर्माण केली आहे. स्पेक्ट्रम्ज मध्ये वायू-ध्वनीच्या ज्या लहरी दिसत नाहीत, त्यावर मालकी प्रस्थापित झाली. या मालकीवरुन आपल्या देशात भ्रष्टाचारही झाला. सोलर एनर्जी कोणाच्या मालकीची आहे? विंड मिल्स उद्योगांमध्ये कच्च्या मालाची गरज नाही. उत्पादनाची पूर्वअट विशिष्ट वेगाने वाहणारा वारा हीच आहे. वारा कोणाच्या मालकीचा? पण तिच्यावरही भांडवलदारांनी हक्क प्रस्थापित केला आहे. नारायण सुर्वेंची कविता आहे, बघता बघता सूर्य बाजारात आला. ती खरीच ठरत आहे. त्यामुळे केवळ १ मे कामगार दिन साजरा करण्यापेक्षा नवी आव्हाने समजावून घेऊन नवी दृष्टी निर्माण करून कामगार चळवळींनी आक्रमक झाले पाहिजे.पुणे : राज्यात कामगारांचे संप व टाळेबंदीचे प्रमाण १९८१ नंतरच्या ३ दशकांमध्ये वेगाने घटले असून २०१२ पर्यंत घटलेले हे प्रमाण तीन वर्षांमध्ये पुन्हा वाढले. गेल्या वर्षी ते पुन्हा घटले. उदारीकरणाच्या धोरणामुळे कारखान्यांमध्ये होत असलेले आऊटसोर्सिंग, मोठ्या प्रमाणात झालेले अत्याधुनिकीकरण आणि कंत्राटी पद्धतीने केली जाणारी नोकरभरती ही कारणे त्यामागे असल्याचे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.औरंगाबादसारख्या ठिकाणी कारखानेच बंद होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कामगार संघटनाही अन्याय असला तरी सबुरीचे धोरण घेत असल्याचे चित्र आहे. एका स्थित्यंतराच्या काळामधून कामगार चळवळी जात आहेत. कामगारांचे वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक श्रमांमधून वस्तू उत्पादन करणे. ती स्थिती उदारीकरणाच्या काळात संपली. आऊटसोर्सिंग केले जाऊ लागले. अधिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये ५ टक्के कायमस्वरुपी कामगार उरले. ९५ टक्के कामगार कंत्राटी पद्धतीने काम करू लागले. त्यांनी दरवर्षी आपले कंत्राट होईल की नाही, या भीतीने १२ ते १६ तास काम करणे अंगवळणी पाडून घेतले आहे. सध्याच्या भांडवलशाहीचा वरचष्मा असलेल्या काळात कामगार चळवळींना नेमके काय केले पाहिजे, याचा दृष्टिकोन नाही. नेत्यांना या परिस्थितीचे आकलन नाही. पगार, बोनस, ओव्हरटाईम, कामाचे तास या झापडबंद विचारांमधून बाहेर पडून कामगारांनी नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे, असे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला कामगारांवरचे वाढते ताणतणाव, कामाचे वाढलेले तास आदी बाबींवर ते म्हणाले, की १८८६ नंतरच्या दीडशे वर्षांमध्ये भांडवलशाही प्रचंड वेगाने पुढे गेली आहे. तिचे स्वरूप समजावून घेऊन नवा लढा उभारला पाहिजे. अजेंडा निर्माण केला पाहिजे. भांडवलदारांनी स्पेक्ट्रम, सोलर एनर्जीवर मालकी निर्माण केली आहे. स्पेक्ट्रम्ज मध्ये वायू-ध्वनीच्या ज्या लहरी दिसत नाहीत, त्यावर मालकी प्रस्थापित झाली. या मालकीवरुन आपल्या देशात भ्रष्टाचारही झाला. सोलर एनर्जी कोणाच्या मालकीची आहे? विंड मिल्स उद्योगांमध्ये कच्च्या मालाची गरज नाही. उत्पादनाची पूर्वअट विशिष्ट वेगाने वाहणारा वारा हीच आहे. वारा कोणाच्या मालकीचा? पण तिच्यावरही भांडवलदारांनी हक्क प्रस्थापित केला आहे. नारायण सुर्वेंची कविता आहे, बघता बघता सूर्य बाजारात आला. ती खरीच ठरत आहे. त्यामुळे केवळ १ मे कामगार दिन साजरा करण्यापेक्षा नवी आव्हाने समजावून घेऊन नवी दृष्टी निर्माण करून कामगार चळवळींनी आक्रमक झाले पाहिजे.१९ व्या शतकाच्या अखेरीस किमान १० ते १६ तास काम करणे बंधनकारक होते. त्यामुळे कामगार वर्ग ८ तास कामाच्या मागणीसाठी संघर्ष करत होता. १ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात १३ हजार व्यवसायांमधील ३ लाख कामगार ८ तासांच्या कामाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. ४० हजार कामगार या मागणीसाठी संपावर गेले. तेव्हापासून १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अस्वस्थता हवीच : पाटणकरमाहिती-तंत्रज्ञान युगामध्ये कामगार आणि भांडवलदार संबंध बदलले आहेत. कामगारांना छुप्या पद्धतीने पुढे आलेली नवी भांडवलशाही समजलेली नाही. जगण्यासाठी गरीब कष्टकऱ्यांना कचरा आमच्या हक्काचा’ अशी घोषणा पुण्यासारख्या शहरात द्यावी लागली. सध्याच्या परिस्थितीविषयी अस्वस्थता निर्माण होत नाही, तोपर्यंत कामगारांची स्थिती बदलणार नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी येथे सांगितले.