शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

संप, टाळेबंदीचे प्रमाण वेगाने घटले

By admin | Updated: May 1, 2017 01:56 IST

राज्यात कामगारांचे संप व टाळेबंदीचे प्रमाण १९८१ नंतरच्या ३ दशकांमध्ये वेगाने घटले असून २०१२ पर्यंत घटलेले हे प्रमाण तीन वर्षांमध्ये

पुणे : राज्यात कामगारांचे संप व टाळेबंदीचे प्रमाण १९८१ नंतरच्या ३ दशकांमध्ये वेगाने घटले असून २०१२ पर्यंत घटलेले हे प्रमाण तीन वर्षांमध्ये पुन्हा वाढले. गेल्या वर्षी ते पुन्हा घटले. उदारीकरणाच्या धोरणामुळे कारखान्यांमध्ये होत असलेले आऊटसोर्सिंग, मोठ्या प्रमाणात झालेले अत्याधुनिकीकरण आणि कंत्राटी पद्धतीने केली जाणारी नोकरभरती ही कारणे त्यामागे असल्याचे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.औरंगाबादसारख्या ठिकाणी कारखानेच बंद होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कामगार संघटनाही अन्याय असला तरी सबुरीचे धोरण घेत असल्याचे चित्र आहे. एका स्थित्यंतराच्या काळामधून कामगार चळवळी जात आहेत. कामगारांचे वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक श्रमांमधून वस्तू उत्पादन करणे. ती स्थिती उदारीकरणाच्या काळात संपली. आऊटसोर्सिंग केले जाऊ लागले. अधिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये ५ टक्के कायमस्वरुपी कामगार उरले. ९५ टक्के कामगार कंत्राटी पद्धतीने काम करू लागले. त्यांनी दरवर्षी आपले कंत्राट होईल की नाही, या भीतीने १२ ते १६ तास काम करणे अंगवळणी पाडून घेतले आहे. सध्याच्या भांडवलशाहीचा वरचष्मा असलेल्या काळात कामगार चळवळींना नेमके काय केले पाहिजे, याचा दृष्टिकोन नाही. नेत्यांना या परिस्थितीचे आकलन नाही. पगार, बोनस, ओव्हरटाईम, कामाचे तास या झापडबंद विचारांमधून बाहेर पडून कामगारांनी नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे, असे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला कामगारांवरचे वाढते ताणतणाव, कामाचे वाढलेले तास आदी बाबींवर ते म्हणाले, की १८८६ नंतरच्या दीडशे वर्षांमध्ये भांडवलशाही प्रचंड वेगाने पुढे गेली आहे. तिचे स्वरूप समजावून घेऊन नवा लढा उभारला पाहिजे. अजेंडा निर्माण केला पाहिजे. भांडवलदारांनी स्पेक्ट्रम, सोलर एनर्जीवर मालकी निर्माण केली आहे. स्पेक्ट्रम्ज मध्ये वायू-ध्वनीच्या ज्या लहरी दिसत नाहीत, त्यावर मालकी प्रस्थापित झाली. या मालकीवरुन आपल्या देशात भ्रष्टाचारही झाला. सोलर एनर्जी कोणाच्या मालकीची आहे? विंड मिल्स उद्योगांमध्ये कच्च्या मालाची गरज नाही. उत्पादनाची पूर्वअट विशिष्ट वेगाने वाहणारा वारा हीच आहे. वारा कोणाच्या मालकीचा? पण तिच्यावरही भांडवलदारांनी हक्क प्रस्थापित केला आहे. नारायण सुर्वेंची कविता आहे, बघता बघता सूर्य बाजारात आला. ती खरीच ठरत आहे. त्यामुळे केवळ १ मे कामगार दिन साजरा करण्यापेक्षा नवी आव्हाने समजावून घेऊन नवी दृष्टी निर्माण करून कामगार चळवळींनी आक्रमक झाले पाहिजे.पुणे : राज्यात कामगारांचे संप व टाळेबंदीचे प्रमाण १९८१ नंतरच्या ३ दशकांमध्ये वेगाने घटले असून २०१२ पर्यंत घटलेले हे प्रमाण तीन वर्षांमध्ये पुन्हा वाढले. गेल्या वर्षी ते पुन्हा घटले. उदारीकरणाच्या धोरणामुळे कारखान्यांमध्ये होत असलेले आऊटसोर्सिंग, मोठ्या प्रमाणात झालेले अत्याधुनिकीकरण आणि कंत्राटी पद्धतीने केली जाणारी नोकरभरती ही कारणे त्यामागे असल्याचे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.औरंगाबादसारख्या ठिकाणी कारखानेच बंद होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कामगार संघटनाही अन्याय असला तरी सबुरीचे धोरण घेत असल्याचे चित्र आहे. एका स्थित्यंतराच्या काळामधून कामगार चळवळी जात आहेत. कामगारांचे वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक श्रमांमधून वस्तू उत्पादन करणे. ती स्थिती उदारीकरणाच्या काळात संपली. आऊटसोर्सिंग केले जाऊ लागले. अधिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये ५ टक्के कायमस्वरुपी कामगार उरले. ९५ टक्के कामगार कंत्राटी पद्धतीने काम करू लागले. त्यांनी दरवर्षी आपले कंत्राट होईल की नाही, या भीतीने १२ ते १६ तास काम करणे अंगवळणी पाडून घेतले आहे. सध्याच्या भांडवलशाहीचा वरचष्मा असलेल्या काळात कामगार चळवळींना नेमके काय केले पाहिजे, याचा दृष्टिकोन नाही. नेत्यांना या परिस्थितीचे आकलन नाही. पगार, बोनस, ओव्हरटाईम, कामाचे तास या झापडबंद विचारांमधून बाहेर पडून कामगारांनी नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटित व्हायला पाहिजे, असे कामगार चळवळींच्या अभ्यासकांचे मत आहे.कामगारदिनाच्या पूर्वसंध्येला कामगारांवरचे वाढते ताणतणाव, कामाचे वाढलेले तास आदी बाबींवर ते म्हणाले, की १८८६ नंतरच्या दीडशे वर्षांमध्ये भांडवलशाही प्रचंड वेगाने पुढे गेली आहे. तिचे स्वरूप समजावून घेऊन नवा लढा उभारला पाहिजे. अजेंडा निर्माण केला पाहिजे. भांडवलदारांनी स्पेक्ट्रम, सोलर एनर्जीवर मालकी निर्माण केली आहे. स्पेक्ट्रम्ज मध्ये वायू-ध्वनीच्या ज्या लहरी दिसत नाहीत, त्यावर मालकी प्रस्थापित झाली. या मालकीवरुन आपल्या देशात भ्रष्टाचारही झाला. सोलर एनर्जी कोणाच्या मालकीची आहे? विंड मिल्स उद्योगांमध्ये कच्च्या मालाची गरज नाही. उत्पादनाची पूर्वअट विशिष्ट वेगाने वाहणारा वारा हीच आहे. वारा कोणाच्या मालकीचा? पण तिच्यावरही भांडवलदारांनी हक्क प्रस्थापित केला आहे. नारायण सुर्वेंची कविता आहे, बघता बघता सूर्य बाजारात आला. ती खरीच ठरत आहे. त्यामुळे केवळ १ मे कामगार दिन साजरा करण्यापेक्षा नवी आव्हाने समजावून घेऊन नवी दृष्टी निर्माण करून कामगार चळवळींनी आक्रमक झाले पाहिजे.१९ व्या शतकाच्या अखेरीस किमान १० ते १६ तास काम करणे बंधनकारक होते. त्यामुळे कामगार वर्ग ८ तास कामाच्या मागणीसाठी संघर्ष करत होता. १ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात १३ हजार व्यवसायांमधील ३ लाख कामगार ८ तासांच्या कामाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. ४० हजार कामगार या मागणीसाठी संपावर गेले. तेव्हापासून १ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अस्वस्थता हवीच : पाटणकरमाहिती-तंत्रज्ञान युगामध्ये कामगार आणि भांडवलदार संबंध बदलले आहेत. कामगारांना छुप्या पद्धतीने पुढे आलेली नवी भांडवलशाही समजलेली नाही. जगण्यासाठी गरीब कष्टकऱ्यांना कचरा आमच्या हक्काचा’ अशी घोषणा पुण्यासारख्या शहरात द्यावी लागली. सध्याच्या परिस्थितीविषयी अस्वस्थता निर्माण होत नाही, तोपर्यंत कामगारांची स्थिती बदलणार नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी येथे सांगितले.