शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एफआरपी थकबाकीवरून किसनवीर कारखान्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST

पुणे: ऊस ‌उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) थकवली म्हणून साखर आयुक्त कार्यालयाने साता-यातील किसनवीर सहकारी कारखान्यावर मालमत्ता ...

पुणे: ऊस ‌उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) थकवली म्हणून साखर आयुक्त कार्यालयाने

साता-यातील किसनवीर सहकारी कारखान्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली.

कारखान्यावर ऊस दिलेल्या शेतकऱ्र्यांचे ७६ कोटी १८ लाख रूपये कारखान्याकडून देणे बाकी आहे. त्यावरून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या कारवाईचे आदेश दिले.

कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामामध्ये ३ लाख ८५ हजार ७० मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याची या हंगामाची निव्वळ एफआरपी प्रति मेट्रिक टनास २५६९. ९४ रुपये इतकी आहे. ३१ मार्चअखेर देय एफआरपी रक्कम थकीत ठेवून कारखान्याने ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.

आयुक्त गायकवाड यांनी कारखान्याला नोटीस बजावून म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. १५ मार्च रोजी सुनावणी घेतली. कारखान्यास निर्यात साखर विक्री कराराप्रमाणे रक्कम प्राप्त होणार आहे. त्यातून पुढील ७ दिवसांत शेतकऱ्र्यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत असल्याचे कारखान्याने सुनावणीत सांगितले. मात्र, त्याप्रमाणे कार्यवाही केली नाही. त्यामुळे आयुक्त गायकवाड यांनी ही कारवाई केली.