शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

‘अनधिकृत’चा प्रश्न सुटणे लांबणीवर

By admin | Updated: September 15, 2015 04:18 IST

राज्यातील युती सरकारने पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा कायदा बनविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे

पिंपरी : राज्यातील युती सरकारने पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा कायदा बनविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटण्यासाठी काही महिने लागणार असल्याचे बोलले जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकाम प्रश्न राज्यभर गाजत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सुमारे ६५ हजार बांधकामांवर आयुक्तांनी धडक कारवाई सुरू केली आहे. लोकप्रतिनिधींची मागणी आणि या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रस आघाडी सरकारने बांधकामे नियमितीकरणासाठी सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यानंतर सत्तांतर झाले आणि कुंटे समितीने भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारकडे अहवाल सादर केला. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला. कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नये, म्हणून फडणवीस सरकारने विधी व न्याय आणि महसूल या दोन विभागांकडून अभिप्राय मागविला. विधी व न्याय विभागाने आणि नंतर महसूल विभागाने सकारात्मक अभिप्राय दिला. त्यामुळे बांधकामे अधिकृत करण्यासंदर्भात अंतिम कामकाज सुरू आहे. या संदर्भातील धोरण निश्चित करीत असताना दोन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे बांधकामे नियमितीकरण लांबणार आहे.(प्रतिनिधी)नवी मुंबई महापालिका हद्दीतील दिघे या गावातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर ३० जुलै २०१५ ला सुनावणी झाली. त्यात अनधिकृत बांधकामांबाबत दिलेल्या एका आदेशामुळे राज्य सरकारपुढे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. राज्य सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी काही धोरण निश्चित केल्यास अनुमतीशिवाय धोरणावर कार्यवाही होऊ नये. तसेच, धोरण ठरविण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारने संबंधित धोरणाची वैधता व कायदेशीर बाबी विचारात घेणे आवश्यक असल्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी होणार आहे.