शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पुरोगामी विचार पचवला नाही - डॉ. अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:02 IST

एकीकडे महाराष्ट्र पुरोगामी आहे असे आपण सर्वार्थाने म्हणतो. अनेक पुरोगामी विचारवंत झाले, पण त्यांचे विचार पचवत महाराष्ट्र पुढे आला नाही.

पुणे : एकीकडे महाराष्ट्र पुरोगामी आहे असे आपण सर्वार्थाने म्हणतो. अनेक पुरोगामी विचारवंत झाले, पण त्यांचे विचार पचवत महाराष्ट्र पुढे आला नाही. तसे झाले असते तर आज ज्या टोकेरी जातीय अस्मिता आहेत, त्या आज राहिल्या नसत्या. आपापले तळ आणि झेंडे उभारून लोक संवाद साधायला कडवेपणाने प्रतिकार करीत आहेत ते दिसले नसते, अशा शब्दांत नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ढेरे यांचा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, शिपिंग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत, संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर उपस्थित होते.डॉ. ढेरे म्हणाल्या, प्राचीन मराठी साहित्य संस्कृतीमध्ये अनेक विचारधारा निर्माण झाल्या, विद्रोह झाले, आक्रोश झाले, या सगळ्यांना सामावून घेत ही संस्कृती चालत आली आहे. ती मनुष्यकेंद्रित करणे, मूल्य अधोरेखित करत जाण्याचे काम विचारवंतांनी केले आहे. नवता आणि परंपरा यांचा संघर्ष होत आला आहे. काळानुरूप जुन्या गोष्टी मागे टाकाव्याच लागतात. टाकाऊ आहे ते टाकावेच लागते आणि टिकाऊपणाशी नाळ जोडावी लागते. संस्कृती टिकाऊ तशी टाकाऊ आहे. विद्रोहालादेखील एक परंपरा आहे. नव्या विचारांना आणून लोकांनी विद्रोहच केला आहे. विद्रोहासाठी विद्रोह कधीच नव्हता.भक्तीचळवळ हा सर्वांत मोठा विद्रोह होता. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जे केले त्यातून हे दिसेल. आधीची ज्ञानव्यवस्था बदलायची होती. भाषेला पूरक नवसाहित्य दिले. ही परंपरा आपल्याकडे असताना आजच्या काळात याचा विचार कसा करणार आहोत, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. पुरोगामी विचारवंत झाले पण त्यांचे विचार पचवत महाराष्ट्र पुढे आला आहे असे दिसत नाही. लोक डोंगराएवढे काम करतात, पण त्यांचे विचार मागे टाकून पुढे जात असल्याची खंत व्यक्त केली.संस्थेकडून कात टाकण्यास सुरवातभांडारकर संस्थेने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. दार उघडून लोकांना आत घेण्यास सुरुवात झाली आहे, असा टोला माधव भांडारी यांनी लगावला. देशात ज्ञान कुणाला दाखवायचे नाही, अशी पद्धत पडली होती. परकीयांच्या आक्रमणामुळे ज्ञान संपुष्टात आले.स्वकीयांमुळे नष्ट झालेल्या ज्ञानाचे काय, असा सवाल त्यांनी केला. गेल्या काही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात दिसले नाही ते मराठी साहित्याचे, लोकसाहित्याचे विवेचन यंदा ऐकायला मिळेल, अशी टिप्पणी ढेरे यांनी केली.

टॅग्स :Aruna Dhereअरुणा ढेरेmarathiमराठी