शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी विचार पचवला नाही - डॉ. अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:02 IST

एकीकडे महाराष्ट्र पुरोगामी आहे असे आपण सर्वार्थाने म्हणतो. अनेक पुरोगामी विचारवंत झाले, पण त्यांचे विचार पचवत महाराष्ट्र पुढे आला नाही.

पुणे : एकीकडे महाराष्ट्र पुरोगामी आहे असे आपण सर्वार्थाने म्हणतो. अनेक पुरोगामी विचारवंत झाले, पण त्यांचे विचार पचवत महाराष्ट्र पुढे आला नाही. तसे झाले असते तर आज ज्या टोकेरी जातीय अस्मिता आहेत, त्या आज राहिल्या नसत्या. आपापले तळ आणि झेंडे उभारून लोक संवाद साधायला कडवेपणाने प्रतिकार करीत आहेत ते दिसले नसते, अशा शब्दांत नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ढेरे यांचा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, शिपिंग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत, संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर उपस्थित होते.डॉ. ढेरे म्हणाल्या, प्राचीन मराठी साहित्य संस्कृतीमध्ये अनेक विचारधारा निर्माण झाल्या, विद्रोह झाले, आक्रोश झाले, या सगळ्यांना सामावून घेत ही संस्कृती चालत आली आहे. ती मनुष्यकेंद्रित करणे, मूल्य अधोरेखित करत जाण्याचे काम विचारवंतांनी केले आहे. नवता आणि परंपरा यांचा संघर्ष होत आला आहे. काळानुरूप जुन्या गोष्टी मागे टाकाव्याच लागतात. टाकाऊ आहे ते टाकावेच लागते आणि टिकाऊपणाशी नाळ जोडावी लागते. संस्कृती टिकाऊ तशी टाकाऊ आहे. विद्रोहालादेखील एक परंपरा आहे. नव्या विचारांना आणून लोकांनी विद्रोहच केला आहे. विद्रोहासाठी विद्रोह कधीच नव्हता.भक्तीचळवळ हा सर्वांत मोठा विद्रोह होता. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जे केले त्यातून हे दिसेल. आधीची ज्ञानव्यवस्था बदलायची होती. भाषेला पूरक नवसाहित्य दिले. ही परंपरा आपल्याकडे असताना आजच्या काळात याचा विचार कसा करणार आहोत, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. पुरोगामी विचारवंत झाले पण त्यांचे विचार पचवत महाराष्ट्र पुढे आला आहे असे दिसत नाही. लोक डोंगराएवढे काम करतात, पण त्यांचे विचार मागे टाकून पुढे जात असल्याची खंत व्यक्त केली.संस्थेकडून कात टाकण्यास सुरवातभांडारकर संस्थेने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. दार उघडून लोकांना आत घेण्यास सुरुवात झाली आहे, असा टोला माधव भांडारी यांनी लगावला. देशात ज्ञान कुणाला दाखवायचे नाही, अशी पद्धत पडली होती. परकीयांच्या आक्रमणामुळे ज्ञान संपुष्टात आले.स्वकीयांमुळे नष्ट झालेल्या ज्ञानाचे काय, असा सवाल त्यांनी केला. गेल्या काही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात दिसले नाही ते मराठी साहित्याचे, लोकसाहित्याचे विवेचन यंदा ऐकायला मिळेल, अशी टिप्पणी ढेरे यांनी केली.

टॅग्स :Aruna Dhereअरुणा ढेरेmarathiमराठी