शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

आयएसएमटी कंपनीचे उत्पादन सुरू होणार

By admin | Updated: August 6, 2015 03:44 IST

एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीने अखेर शुक्रवारपासून (दि. ७) उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ४२४ कामगारांवरील टांगती तलवार

बारामती :एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीने अखेर शुक्रवारपासून (दि. ७) उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ४२४ कामगारांवरील टांगती तलवार दूर झाली आहे. मात्र, व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये याबाबत स्वतंत्र करार करण्यात आला आहे. १२ जुलैपासून कंपनीने उत्पादन बंद ठेवले होते. तेव्हापासून कंपनीच्या कामगारांना प्रवेश नाकारण्यात आला होता. गेल्या २३ दिवसांपासून ४२४ कामगार या निर्णयामुळे कंपनीच्या प्रवेशद्वारावर बसून होते. व्यवस्थापन आणि कामगारांच्या झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या होत्या. कामगार आयुक्तांनी याबाबत तोडगा काढण्याची सूचना व्यवस्थापनाला केली होती. व्यवस्थापनाने सुरुवातीपासून सकारात्मक, तर कामगारांनी तणावाच्या परिस्थितीतदेखील संयमाची भूमिका घेतली. परिसरातील कामगार संघटनांनी आयएसएमटी कामगार संघटनेला पाठिंबा व्यक्त केला होता. कंपनी बंद करण्याचा निर्णय परिसरात चर्चेचा विषय झाला. मात्र, आता कामगारांचा प्रश्न मार्गी लागला आहे. व्यवस्थापन आणि कामगारांची नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये व्यवस्थापनाने सर्वमान्य तोडगा काढला. सोमवारी (दि. ३) व्यवस्थापन आणि कामगारांच्यात चर्चा झाली. त्यामध्ये व्यवस्थापनाच्या वतीने मालक बी. आर. तनेजा, उपाध्यक्ष बलराम अग्रवाल, किशोर भारांबे आदींनी सहभाग घेतला. कामगार प्रतिनिधींच्या वतीने अध्यक्ष नाना भगत, सचिव गुरुदेव सरोदे यांनी सहभाग घेतला. या चर्चेत कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चेनंतर सर्वमान्य करार करण्यात आला आहे. कंपनीची मोडकळीस आलेली अवस्था असूनदेखील केवळ कामगारांची निष्ठा पाहून मालक बी. आर. तनेजा यांनी चांगला प्रतिसाद दिला. लवकरच कंपनी काही दिवसांत पूर्वपदावर येईल. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अ‍ॅड. आर. बी. शरमाळे यांची भूमिका हा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची ठरली, असे अध्यक्ष भगत यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष बाळासाहेब आटोळे, संजय जांबले, ज्ञानदेव गाडे, सुहास शिंदे, कल्याण कदम, नामदेव गोरे, संतोष साळवे, उमाजी भिलारे, राजकुमार होळकर, गोपीचंद नवले, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)