शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

विद्यापीठात सांडपाण्यावर प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:20 IST

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) प्राप्त झालेल्या निधीतून सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठ आवारात सुमारे १२ लाख लिटर क्षमतेचा सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.

पुणे : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) प्राप्त झालेल्या निधीतून सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठ आवारात सुमारे १२ लाख लिटर क्षमतेचा सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत होणार असून पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरील ताणही कमी होणार आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच विविध विभागांना दररोज दहा ते बारा लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. पालिकेच्या पाणी पुरवठा केंद्रातून विद्यापीठ आवारातील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून त्याचा वापर विद्यापीठ प्रशासनातर्फे केला जातो. तसेच विद्यापीठातील विविध उद्यानांमधील झाडांना तसेच विद्यापीठाच्या मुख्य इमारती मागील हिरवळीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, काही कारणास्तव पालिकेकडून एक किंवा दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो किंवा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जातो. त्यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी टँकर मागविले जातात. परंतु, यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून विद्यापीठाने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील म्हणाले, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या डेÑनेज लाईनमध्ये जाणारे पाणी थांबेल. परिणामी पालिका प्रशासनाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर येणारा ताण काही प्रमाणात कमी होईल. प्रक्रिया केलेले पाणी उद्यानासाठी व स्वच्छतेसाठी वापरले जाईल. सध्या उद्यानांसाठी व नवीन इमारतींच्या बांधकामासाठी सुमारे ३५ बोअरवेलचे पाणी वापरले जात आहे. मात्र, प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध झाल्यानंतर बोअरवेलचा वापर बंद करता येईल. त्यामुळे भूमिगत जलसाठ्याचा उपसा थांबेल.विद्यापीठातर्फे येत्या महिना अखेरीस सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठीची निविदा काढली जाणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पातून सुरुवातीला १२ लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया करता येईल.>पालिकेकडून पाणी घेणार नाहीपुढील काळात या प्रकल्पाची क्षमता १५ लाख लिटरपर्यंत वाढवली जाईल. प्रकल्पामुले दररोज दहा लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया होईल. त्यामुळे विद्यापीठाला पालिकेकडून अधिक पाणी घ्यावे लागणार नाही, असेही विद्यापीठातील कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांनी स्पष्ट केले.