शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

स्थानिकांच्या विरोधामुळे बहुचर्चित नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्दची प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुभाष देसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 19:47 IST

राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ : सुभाष देसाई

ठळक मुद्देमहाराष्ट्र अंतर्गत विविध औद्योगिक कंपन्यांबरोबर १२ लाख कोटी रुपयांचे करार येत्या १६ जून रोजी पुण्यात उरूळी देवाची येथे सकाळी १० वाजता हा रोजगार मेळावा होणार

पुणे: कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्यामुळे या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी दिली. राज्यात उद्योगांना चांगले वातावरण असून मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत विविध औद्योगिक कंपन्यांबरोबर १२ लाख कोटी रुपयांचे करार झाले आहेत.राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ होत आहे, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीने पुण्यात आयोजित केल्या जाणा-या रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.देसाई म्हणाले,उद्योगांसाठी लागणा-या जमीन,पाणी,वीज आदी पायाभूत सुविधेसह राज्यात कुशल मन्युष्यबळ उपलब्ध आहे.त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात येणा-या उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यातच काही कंपन्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड घेवून ठेवले होते. मात्र, त्यावर कोणताही औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे वर्षानुवर्षे पडून असलेले राज्यातील सुमारे २ हजार भूखंड शासनाने पुन्हा ताब्यात घेतले असून त्याची फेर वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. तळेगाव एमआयडीसीमधील जमीन सुध्दा विविध कंपन्यांना दिली जात आहे.राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग,उद्योग संचलनालय आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १६ जून रोजी पुण्यात उरूळी देवाची येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार असून त्यासाठी ८ हजार ८०० बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. त्यातील ४ हजार ८०० बेरोजगार तांत्रिक क्षेत्रातील आहेत.परिसरातील ९२ नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी बेरोजगार तरुण-तरुणींच्या मुलाखती घेणार आहेत. या मेळाव्यास पालकमंत्री गिरीश बापट व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत, असेही देसाई यांनी सांगितले. तसेच पुण्यानंतर नाशिक व नवी मुंबईसह राज्यभरात रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत,असेही देसाई म्हणाले.दरम्यान, भोसरी येथील एकनाथ खडसे यांच्याविषयी विचारले असता हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करता येणार नसल्याने देसाई यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेSubhash Desaiसुभाष देसाईnanar refinery projectनाणार प्रकल्पMIDCएमआयडीसी