शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

स्थानिकांच्या विरोधामुळे बहुचर्चित नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्दची प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुभाष देसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 19:47 IST

राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ : सुभाष देसाई

ठळक मुद्देमहाराष्ट्र अंतर्गत विविध औद्योगिक कंपन्यांबरोबर १२ लाख कोटी रुपयांचे करार येत्या १६ जून रोजी पुण्यात उरूळी देवाची येथे सकाळी १० वाजता हा रोजगार मेळावा होणार

पुणे: कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्यामुळे या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी दिली. राज्यात उद्योगांना चांगले वातावरण असून मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत विविध औद्योगिक कंपन्यांबरोबर १२ लाख कोटी रुपयांचे करार झाले आहेत.राज्य शासनाबरोबर करार केलेल्या २ हजार ४०० कंपन्यांपैकी २ हजार १२१ कंपन्यांनी उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात वाढ होत आहे, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या उद्योग विभागाच्या वतीने पुण्यात आयोजित केल्या जाणा-या रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.देसाई म्हणाले,उद्योगांसाठी लागणा-या जमीन,पाणी,वीज आदी पायाभूत सुविधेसह राज्यात कुशल मन्युष्यबळ उपलब्ध आहे.त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात येणा-या उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यातच काही कंपन्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड घेवून ठेवले होते. मात्र, त्यावर कोणताही औद्योगिक प्रकल्प सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे वर्षानुवर्षे पडून असलेले राज्यातील सुमारे २ हजार भूखंड शासनाने पुन्हा ताब्यात घेतले असून त्याची फेर वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. तळेगाव एमआयडीसीमधील जमीन सुध्दा विविध कंपन्यांना दिली जात आहे.राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभाग, रोजगार व स्वयंरोजगार विभाग,उद्योग संचलनालय आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १६ जून रोजी पुण्यात उरूळी देवाची येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार असून त्यासाठी ८ हजार ८०० बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. त्यातील ४ हजार ८०० बेरोजगार तांत्रिक क्षेत्रातील आहेत.परिसरातील ९२ नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी बेरोजगार तरुण-तरुणींच्या मुलाखती घेणार आहेत. या मेळाव्यास पालकमंत्री गिरीश बापट व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत, असेही देसाई यांनी सांगितले. तसेच पुण्यानंतर नाशिक व नवी मुंबईसह राज्यभरात रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत,असेही देसाई म्हणाले.दरम्यान, भोसरी येथील एकनाथ खडसे यांच्याविषयी विचारले असता हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करता येणार नसल्याने देसाई यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेSubhash Desaiसुभाष देसाईnanar refinery projectनाणार प्रकल्पMIDCएमआयडीसी