शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांसमोर मांडल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:36 IST

जागर जाणिवांचा उपक्रम : युवतींना समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याचे केले आवाहन

भूगाव : महाविद्यालयाची वेळ केवळ आठ ते साडेबारा असताना आम्ही घरातून सकाळी सहा वाजता निघुन सायंकाळी सहा वाजता घरी पोहोचतो. हे फक्त एसटीच्या अनियमित वेळेमुळेच, अशा शब्दांत पिरंगुटच्या विद्यार्थिनींनी समस्यांचा पाढा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर वाचला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई द्वारा आयोजित युवा संवाद यात्रा जागर हा जाणिवांचा या उपक्रमात पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात खासदार सुळे यांनी विद्यार्थ्यीनींशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीही त्यांच्याशी मनमोकळेपणा समस्यांविषयी चर्चा केली. एसटीच्या अनियमितपणामुळे अभ्यासालाही वेळ मिळत नाही, डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी करावी लागणारी पायपीट, पिरंगुटपासून महाविद्यालयापर्यंत दोन किमी चिखल तुडवत येताना येणाऱ्या अडचणी, मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांचा नकारात्मक दृष्टिकोन आदी समस्यांचा उहापोह करण्यात आला. विद्यार्र्थिनींना संबोधन करताना खासदार सुळे यांनी युवतींनो निर्भीड बना, प्रचंड मेहनत करून आपले भविष्य उज्वल करा, तासन्तास अभ्यास तर कराच शिवाय आपल्या प्रकृतीकडे लक्ष्य द्या, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, जीवनातील संकटांचा सामना धीरोदात्त पणे करा, कठिण प्रसंगी आई वडील शिक्षक, प्राचार्यांची मदत घ्या असे आवाहन केले. तसेच संबंधित घटकाला योग्य कारवाई करण्याच्या सुचना देखील केल्या.शैक्षणिक आणि वैयक्तिक अडचणी बरोबरच समाजातील वाढते स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण, हुंडाबळी, तरुणांमधील व्यसनाधीनता, मराठा आरक्षण, इत्यादी ज्वलंत समस्येवर देखील खासदार सुळे यांनी आपले विचार मांडले. महाविद्यालयातील तरुणांना नवसमाजनिर्मितीसाठी चांगल्या आचारांना, विचारांना महत्व द्या. महिला, मुलींचा सन्मान करा, परिसर स्वच्छतेसाठी प्रयत्नरत रहा या शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. संदीप कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, सुनील चांदेरे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, सभापती कोमल साखरे, युवक अध्यक्ष अमित कंधारे, जितेंद्र इंगवले, सविता पवळे, सविता दगडे, कोमल वाशिवले, महादेव कोंढरे आदी उपस्थित होते.मुळशीत बराच भाग हा दुर्गम आहे. तेथील लोकांचे शेती हेच प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. तरीही या परिस्थितीतून विद्यार्थी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी दररोज एसटीने ५० ते ६० किमी प्रवास करुन येतात. रस्त्यांची प्रचंड प्रमाणात झालेल्या दुरावस्थेमुळे एसटीही उशिरा अथवा कधीकधी येतच नाही. विद्यार्थ्यांना यावेळी खासगी अथवा कोणाकडेतरी लिफ्ट मागुनच घरी व महाविद्यालयात जावे लागते. कधीकधी उशीर झाल्यामुळे महाविद्यालयाचे एक-दोन तास बुडतात. अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.

टॅग्स :Puneपुणे