शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खासदारांसमोर मांडल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:36 IST

जागर जाणिवांचा उपक्रम : युवतींना समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याचे केले आवाहन

भूगाव : महाविद्यालयाची वेळ केवळ आठ ते साडेबारा असताना आम्ही घरातून सकाळी सहा वाजता निघुन सायंकाळी सहा वाजता घरी पोहोचतो. हे फक्त एसटीच्या अनियमित वेळेमुळेच, अशा शब्दांत पिरंगुटच्या विद्यार्थिनींनी समस्यांचा पाढा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर वाचला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई द्वारा आयोजित युवा संवाद यात्रा जागर हा जाणिवांचा या उपक्रमात पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात खासदार सुळे यांनी विद्यार्थ्यीनींशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीही त्यांच्याशी मनमोकळेपणा समस्यांविषयी चर्चा केली. एसटीच्या अनियमितपणामुळे अभ्यासालाही वेळ मिळत नाही, डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी करावी लागणारी पायपीट, पिरंगुटपासून महाविद्यालयापर्यंत दोन किमी चिखल तुडवत येताना येणाऱ्या अडचणी, मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांचा नकारात्मक दृष्टिकोन आदी समस्यांचा उहापोह करण्यात आला. विद्यार्र्थिनींना संबोधन करताना खासदार सुळे यांनी युवतींनो निर्भीड बना, प्रचंड मेहनत करून आपले भविष्य उज्वल करा, तासन्तास अभ्यास तर कराच शिवाय आपल्या प्रकृतीकडे लक्ष्य द्या, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, जीवनातील संकटांचा सामना धीरोदात्त पणे करा, कठिण प्रसंगी आई वडील शिक्षक, प्राचार्यांची मदत घ्या असे आवाहन केले. तसेच संबंधित घटकाला योग्य कारवाई करण्याच्या सुचना देखील केल्या.शैक्षणिक आणि वैयक्तिक अडचणी बरोबरच समाजातील वाढते स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण, हुंडाबळी, तरुणांमधील व्यसनाधीनता, मराठा आरक्षण, इत्यादी ज्वलंत समस्येवर देखील खासदार सुळे यांनी आपले विचार मांडले. महाविद्यालयातील तरुणांना नवसमाजनिर्मितीसाठी चांगल्या आचारांना, विचारांना महत्व द्या. महिला, मुलींचा सन्मान करा, परिसर स्वच्छतेसाठी प्रयत्नरत रहा या शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. संदीप कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, सुनील चांदेरे, शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, सभापती कोमल साखरे, युवक अध्यक्ष अमित कंधारे, जितेंद्र इंगवले, सविता पवळे, सविता दगडे, कोमल वाशिवले, महादेव कोंढरे आदी उपस्थित होते.मुळशीत बराच भाग हा दुर्गम आहे. तेथील लोकांचे शेती हेच प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. तरीही या परिस्थितीतून विद्यार्थी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी दररोज एसटीने ५० ते ६० किमी प्रवास करुन येतात. रस्त्यांची प्रचंड प्रमाणात झालेल्या दुरावस्थेमुळे एसटीही उशिरा अथवा कधीकधी येतच नाही. विद्यार्थ्यांना यावेळी खासगी अथवा कोणाकडेतरी लिफ्ट मागुनच घरी व महाविद्यालयात जावे लागते. कधीकधी उशीर झाल्यामुळे महाविद्यालयाचे एक-दोन तास बुडतात. अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.

टॅग्स :Puneपुणे