शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

मतांच्या राजकारणामुळे पूर्वेकडील राज्यांचा प्रश्न गंभीर : समुद्र गुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:30 IST

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक याप्रकारचा संघर्ष आसाममध्ये सातत्याने सुरु असून तेथील राजकारण्यांनी मतांचे राजकारण केले आहे. यामुळे या राज्याचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

ठळक मुद्देपरराज्य आणि परप्रांतांतून येणाऱ्या लोकांमुळे आसाममधील मुलनिवासींच्या अधिकारांवर मर्यादाएनसीआरच्या मसुद्यात चाळीस लाख नागरिकांची नाही नोंदणी 

पुणे : निवडणुका आल्यानंतर आपआपल्या मतदार संघात मते मागण्यासाठी येणाऱ्या राजकारण्यांनी बिकट परिस्थिती निर्माण केली. याला आसाम अपवाद नाही. या राज्यातील मुलनिवासी यांच्या विरोधात बाहेरच्या राज्यांतून आलेले नागरिक याशिवाय बांग्लादेशामधील घुसखोरांची वाढती संख्या याचा प्रतिकूल परिणाम आसामवर झालेला आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक याप्रकारचा संघर्ष सातत्याने सुरु असून तेथील राजकारण्यांनी मतांचे राजकारण केले आहे. यामुळे आसामच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार समुद्र गुप्त कश्यप यांनी केली. सरहद पुणे आयोजित हाक ब्रह्मपुत्रेची उपक्रमांतर्गत भारतीय नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची नोंद (एनआरसी) आणि त्यानिमित्ताने उभे राहिलेले प्रश्न या विषयावर ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरहदचे संजय नहार, शैलेश वाडेकर या वेळी उपस्थित होते.   कश्यप यांनी आसाम, त्याची सुरक्षा आणि भविष्यातील आव्हाने याची अभ्यासपूर्ण मांडणी केली. ते म्हणाले, दिवसेंदिवस परराज्य आणि परप्रांतांतून येणाऱ्या लोकांमुळे आसाममधील मुलनिवासींच्या अधिकारांवर मर्यादा आल्या आहेत. साहजिकच त्याचा परिणाम तेथील शाश्वत विकासाची साधनांवर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे भारतीय सुरक्षा खाते, स्थानिक पोलीस प्रशासन यांना बाहेरुन येणाऱ्यांविषयीची पूर्ण माहिती असताना देखील त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही. याची कारणे स्थानिक नेत्यांच्या राजकारणात आहेत. मागील काही वर्षांपासून बांग्लादेशमधील नागरिकांचा छुप्या पध्दतीने आसाम व त्याच्या शेजारील राज्यांमध्ये होणारा प्रवेश डोकेदुखी ठरत आहे. काही ठराविक कालावधीनंतर या लोकांना स्थानिक रहिवाशी असल्याचा दाखला, भारतीय ओळख विविध प्रकारे ते दर्शवितात. याविषयी अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले असताना देखील त्यावर केंद्रीय पातळीवरुन गांभीर्याने दखल घेतली गेलेली नाही. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मुद्दा आसामी विरुद्ध आसामी नसलेले अथवा बंगाली, मूलनिवासी विरुद्ध परकीय, हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नाही. ईशान्य भारतातील जमीन, नागरिक व साधनसंपत्तीला परकीय आक्रमणापासून वाचविण्याचा आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे. .................एनसीआरच्या मसुद्यात चाळीस लाख नागरिकांची नाही नोंदणी १९५१ मध्ये सर्वप्रथम आसाममध्ये एनआरसी मोहिम राबविण्यात आली. त्यावेळी पूर्व पाकिस्तान व नंतरच्या बांग्लादेशातून बेकायदा निर्वासित येत राहिल्याने आसाममधील स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर झाला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने जुलै २००५ मध्ये त्याची दखल घेण्यात आली. त्याची अंमलबजावनी करण्याचे आदेश सरकारला दिले. सरकारनेही १९५१ ची एनआरसी यादी अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, एनआरसीचा मसूदा जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये चाळीस लाख नागरिकांची नोंदणी करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :PuneपुणेBangladeshबांगलादेशNCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्र