शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

मतांच्या राजकारणामुळे पूर्वेकडील राज्यांचा प्रश्न गंभीर : समुद्र गुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:30 IST

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक याप्रकारचा संघर्ष आसाममध्ये सातत्याने सुरु असून तेथील राजकारण्यांनी मतांचे राजकारण केले आहे. यामुळे या राज्याचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

ठळक मुद्देपरराज्य आणि परप्रांतांतून येणाऱ्या लोकांमुळे आसाममधील मुलनिवासींच्या अधिकारांवर मर्यादाएनसीआरच्या मसुद्यात चाळीस लाख नागरिकांची नाही नोंदणी 

पुणे : निवडणुका आल्यानंतर आपआपल्या मतदार संघात मते मागण्यासाठी येणाऱ्या राजकारण्यांनी बिकट परिस्थिती निर्माण केली. याला आसाम अपवाद नाही. या राज्यातील मुलनिवासी यांच्या विरोधात बाहेरच्या राज्यांतून आलेले नागरिक याशिवाय बांग्लादेशामधील घुसखोरांची वाढती संख्या याचा प्रतिकूल परिणाम आसामवर झालेला आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक याप्रकारचा संघर्ष सातत्याने सुरु असून तेथील राजकारण्यांनी मतांचे राजकारण केले आहे. यामुळे आसामच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार समुद्र गुप्त कश्यप यांनी केली. सरहद पुणे आयोजित हाक ब्रह्मपुत्रेची उपक्रमांतर्गत भारतीय नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची नोंद (एनआरसी) आणि त्यानिमित्ताने उभे राहिलेले प्रश्न या विषयावर ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरहदचे संजय नहार, शैलेश वाडेकर या वेळी उपस्थित होते.   कश्यप यांनी आसाम, त्याची सुरक्षा आणि भविष्यातील आव्हाने याची अभ्यासपूर्ण मांडणी केली. ते म्हणाले, दिवसेंदिवस परराज्य आणि परप्रांतांतून येणाऱ्या लोकांमुळे आसाममधील मुलनिवासींच्या अधिकारांवर मर्यादा आल्या आहेत. साहजिकच त्याचा परिणाम तेथील शाश्वत विकासाची साधनांवर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे भारतीय सुरक्षा खाते, स्थानिक पोलीस प्रशासन यांना बाहेरुन येणाऱ्यांविषयीची पूर्ण माहिती असताना देखील त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही. याची कारणे स्थानिक नेत्यांच्या राजकारणात आहेत. मागील काही वर्षांपासून बांग्लादेशमधील नागरिकांचा छुप्या पध्दतीने आसाम व त्याच्या शेजारील राज्यांमध्ये होणारा प्रवेश डोकेदुखी ठरत आहे. काही ठराविक कालावधीनंतर या लोकांना स्थानिक रहिवाशी असल्याचा दाखला, भारतीय ओळख विविध प्रकारे ते दर्शवितात. याविषयी अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले असताना देखील त्यावर केंद्रीय पातळीवरुन गांभीर्याने दखल घेतली गेलेली नाही. आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मुद्दा आसामी विरुद्ध आसामी नसलेले अथवा बंगाली, मूलनिवासी विरुद्ध परकीय, हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नाही. ईशान्य भारतातील जमीन, नागरिक व साधनसंपत्तीला परकीय आक्रमणापासून वाचविण्याचा आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे. .................एनसीआरच्या मसुद्यात चाळीस लाख नागरिकांची नाही नोंदणी १९५१ मध्ये सर्वप्रथम आसाममध्ये एनआरसी मोहिम राबविण्यात आली. त्यावेळी पूर्व पाकिस्तान व नंतरच्या बांग्लादेशातून बेकायदा निर्वासित येत राहिल्याने आसाममधील स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर झाला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने जुलै २००५ मध्ये त्याची दखल घेण्यात आली. त्याची अंमलबजावनी करण्याचे आदेश सरकारला दिले. सरकारनेही १९५१ ची एनआरसी यादी अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, एनआरसीचा मसूदा जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये चाळीस लाख नागरिकांची नोंदणी करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :PuneपुणेBangladeshबांगलादेशNCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्र