शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

महिला पोलिसांपुढे समस्याच

By admin | Updated: February 21, 2017 03:30 IST

मतदान साहित्याचे वाटप, मतदान केंद्रांची सुरक्षा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत

पुणे : मतदान साहित्याचे वाटप, मतदान केंद्रांची सुरक्षा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी घ्यावी लागणारी काळजी या कामांसाठी सर्व मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची, जेवणाची कोणत्याही सोयीबाबत अधिकृत सूचना देण्यात आलेल्या नाहीत. पोलीस स्टेशनकडून त्यांना याबाबतचे आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस महिला पोलीस कर्मचाऱ्यांना असुविधांचाच सामना करावा लागत असल्याचे चित्र ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले.१४ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या महिला कर्मचाऱ्यांना दोन दिवस केंद्रावर थांबून ड्यूटी निभावावी लागणार आहे. मात्र, त्यांच्या निवासाची, भोजनाच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आलेले नाही. एक-दोन पोलीस स्टेशनचा अपवाद वगळता, पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाबाबत मुख्यालयाकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस मुख्यालय जेवणाची सोय करणार की पोलीस निरीक्षकांकडून सोय केली जाणार, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.(प्रतिनिधी)मागणीकडे दुर्लक्ष पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एखादा वर्ग खुला ठेवावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे प्राचार्यांकडे करण्यात आली. मात्र, ती नाकारण्यात आली.  निवडणूक ड्यूटीचा शिक्षकांना किमान मोबदला मिळतो. मात्र, पोलिसांना तो मिळत नसल्याची खंतही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ड्यूटी संपल्यानंतर शिक्षक घरी जाऊ शकतात. मात्र, मतदानपेट्या सील होईपर्यंत पोलिसांना हालताही येणे शक्य नसते. अशा वेळी, किमान सुविधा उपलब्ध असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.इतर जिल्ह्यांतून कुमकनिवडणूक ड्यूटीसाठी हिंगोली, परभणी, अहमदनगर आदी ठिकाणांहून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. हिंगोलीतून २२० कर्मचारी पुण्यात आले असून, त्यामध्ये ३० महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अहमदनगरवरून २५० पोलीस कर्मचारी आले असून, त्यामध्ये ५० महिला कर्मचारी आहेत. मतदान केंद्रांवरील स्वच्छतागृहांची दुरवस्था, निवासाची गैरसोय, भोजनाबाबत अनिश्तिता अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे.