शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

स्मार्ट नव्हे, राहण्यायोग्य शहर हवे - प्रियदर्शनी कर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 02:09 IST

पुणे स्मार्ट सिटी होणार असल्याचे सर्वत्र गाजावाजा सुरू आहे. परंतु, खरं तर शहराला स्मार्ट करण्यापेक्षा ‘शाश्वत स्मार्ट पुणे’ करणे आवश्यक आहे.

पुणे : पुणे स्मार्ट सिटी होणार असल्याचे सर्वत्र गाजावाजा सुरू आहे. परंतु, खरं तर शहराला स्मार्ट करण्यापेक्षा ‘शाश्वत स्मार्ट पुणे’ करणे आवश्यक आहे. राहण्यायोग्य शहर हवे. त्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत, अशी खंत ‘समुचित एनव्हायरो टेक’च्या संचालक प्रियदर्शनी कर्वे यांनी व्यक्त केली.समुचित एन्व्हारो टेक, आयएनइसीसी, लाया या संस्थांतर्फे ‘शाश्वत स्मार्ट पुणे २०३०’ या प्रकल्प अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी इकॉलॉजिकल सोसायटीचे गुरुदास नूलकर उपस्थित होते.कर्वे म्हणाल्या, ‘‘शहरातील काही भागच स्मार्ट होणार आहेत. खरं तर स्मार्ट होण्याऐवजी राहण्यायोग्य शहर करणे गरजेचे आहे. ते उद्दिष्ट समोर ठेवून पुणे महापालिकेने काम करणे आवश्यक आहे. वर्षभर २४ तास पाणीपुरवठा करणार आहेत. परंतु, त्यासाठी भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन किती गरज लागणार आहे, गळती थांबविण्यावर काही ठोस उपाय आहेत का, सांडपाणी पुनर्वापर करण्यावर भर देणार का, पाण्याचे सर्वांना न्याय पद्धतीने वाटप करणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे महापालिकेकडे नाहीत. यावर काम करणे महत्त्वाचे आहे.’’सध्या शहरातील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यावर महापालिका काहीच करीत नाही. झोपडपट्टीधारकांना घरे देण्यावर काहीच उपाय नाहीत.तसेच नवीन झोपडपट्टी होऊ नये, म्हणून काहीच उपाययोजनाझालेल्या नाहीत.शहरात सायकल चालविणाऱ्यांसाठी ट्रॅकचे चांगले जाळे उभे केले पाहिजे. त्याबाबत विचार होत नाही. सार्वजनिक वाहतूक, पीएमपी, आॅटो रिक्षा या सर्व वाहतूक साधनांचा समन्वय साधून वाहतूककोंडीवर उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही कर्वे यांनी सांगितले.राहण्यायोग्य पुण्यासाठी तीन ‘टुल’पुणेकरांना राहण्यायोग्य शहर करायचे असेल, तर तीन टुल आवश्यक आहेत. त्यामध्ये एक पायाभूत सुविधा चांगल्या करणे, आर्थिक स्थितीवर लक्ष, टेक्नॉलॉजीचा वापर चांगला करणे.दुसरे समाज सोशल फे्रंडली झाला पाहिजे. एकमेकांना चांगली मूल्ये दिली, घेतली पाहिजेत. त्यामुळे चांगले काम करण्यासाठीचे सामाजिक वातावरण निर्माण होईल.तिसरे टुल म्हणजे महापालिकेने सर्व सुविधांची देखभाल, दुरुस्ती चांगली ठेवली पाहिजे. त्यावर सातत्याने भर दिला पाहिजे. या तीन टुलवर काम केले तर पुणे राहण्यायोग्य बनू शकेल, असे गुरुदास नूलकर यांनी सांगितले.पर्यावरणाकडे प्रचंड दुर्लक्षनूलकर म्हणाले, ‘‘आपले पर्यावरणाकडे लक्षच नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्याचा परिणाम भावी पिढीला भोगावा लागणार आहे. आपल्याकडे वेस्टेजची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात नाही. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. उरळी देवाची येथील वातावरण प्रदूषित झाले आहे. जोपर्यंत नागरिक जागरूक होऊन याबाबत बोलत नाहीत आणि कृती करीत नाहीत, तोपर्यंत पुणे राहण्यायोग्य होऊ शकत नाही.’’

टॅग्स :Puneपुणे