शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

काँग्रेसने डबघाईला आणलेली अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधारली- पियुष गोयल

By अजित घस्ते | Updated: November 25, 2023 17:24 IST

यापुढे गोयल म्हणाले, २०१४ पूर्वी व्यापाऱ्यांना, उद्योगांना पोशाक वातावरण नव्हते. कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती...

पुणे : रशिया- युक्रेन युध्दामुळे जागतिक पातळीवर ६० ते ७० देशाची अर्थव्यवस्था कमजोर झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पायाभूत सोईसुविधांचा विस्तार केला जात आहे. पुर्वी काँग्रेस सरकारने भ्रष्टाचार करून देशाची अर्थव्यवस्था कमजोर केली होती. १० वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था डबगाईला आली होती. परंतु जेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तेव्हापासून देशाची अर्थव्यवथा प्रगती पथावर घेऊ जात आहेत. त्यामुळेच भारत सध्या जगात पाचव्या क्रमांकाचा देश बनला आहे. २०२४ मध्ये मोदीना सत्ता दिली तर भारताची अर्थव्यवस्था ३५ मिलीयन डॉलरची होईल अन् ती जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी व्यक्त केला.

दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व.उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा "आदर्श व्यापारी "उत्तम" पुरस्कार'' प्रदान सोहळा शनिवारी सेनापती बापट रस्ता येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे पार पडला. यावेळी पीयुष गोयल बोलत होते. यावेळी राज्यस्तरावरील पुरस्कार मे. दांडेकर आणि कंपनीचे अरुण दांडेकर, पुणे जिल्हा स्तरावरील पुरस्कार कल्याण भेळचे रमेश कोंढरे, पुणे शहर स्तरावरील पुरस्कार पुरुषोतम लोहिया यांना देण्यात आला. तर दि पूना मर्चंटस् चेंबर सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांना देण्यात आला. युवा व्यापारी पुरस्कार  शुभम गोयल यांना तर कै. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा "आदर्श पत्रकार पुरस्कार'' पत्रकार प्रविण डोके यांना देण्यात आला.

यावेळी जेष्ठ विधी सल्लागार अॅड. एस. के. जैन, लायन्सल क्लब इंटरनशनल झोन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी, कामगार कष्टकरी नेते बाबा आढाव, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार,चेंबरचे माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले, उपाध्यक्ष अजित बोरा,  वालचंद संचेती, आशिष दुगड, दिनेश मेहता, नवीन गोयल, ललित जैन इ. उपस्थिती होते.

यापुढे गोयल म्हणाले, २०१४ पूर्वी व्यापाऱ्यांना, उद्योगांना पोशाक वातावरण नव्हते. कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर महागाई कमी करणे, पायाभूत सुविधामध्ये रस्ते, मेट्रो आणि  विमानतळांची संख्या वाढ करणे यामुळे विकासाला चालना मिळाली आहे. देशाचा जीडीपी रेट वाढवला असून जगाच्या पाठिंवर सध्या देशाची अर्थव्यवस्था प्रगतिपथावर आहे. व्यापा-यांना व्यवसायांत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते, त्या प्रमाणे पुणेकर व्यापार उद्योगातही पुढे आहेत. जगात विविध क्षेत्रात आपला ठसा उमतावता पुणेकरांनी देशाची मान उंचावली आहे.

यावेळी याकार्यक्रमाच्या प्रास्ताविक राजेंद्र बाठिया यांनी केले . यावेळी बाठिया यांनी ऑनलाइन शॉपिंगमुळे व्यापाऱ्यांपूढे पेच निर्माण झाल्याने अनेक व्यापा-यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच सरकारने केद्राकडून व्यापाऱ्यांसाठी पुरस्कार सुरू करून  ज्येष्ठ व्यापाऱ्यांना पेन्शन सुविधा देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी निकिता बाठीया यांचा मिलेट मधील योगदानाबद्दल गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय उत्तम बाठीया यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन द्वारका जालान यांनी केले.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसEconomyअर्थव्यवस्था