शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची फौज

By admin | Updated: May 5, 2016 04:32 IST

खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. मात्र या पाण्याची चोरी होऊन नये म्हणून पाटबंधारे विभागातर्फे भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकात एकूण

दौंड / इंदापूर : खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. मात्र या पाण्याची चोरी होऊन नये म्हणून पाटबंधारे विभागातर्फे भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकात एकूण ३२ जणांची नेमणूक करण्यात आली आहे.धरणातून दौंड आणि इंदापूरला आज मध्यरात्री पाणी सोडण्यात आले आहे. साधारणत: हे पाणी रविवारी दौंडच्या तलावात पोहोचेल, असा अंदाज दौंड नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी अभिमन्यू येळवंडे यांनी सांगितला.पाणी सर्वांत प्रथम पोलीस आणि पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात इंदापूरकडे जाणार असून, इंदापूरचा तलाव भरल्यानंतर हे पाणी परतीच्या मार्गाने दौंडच्या तलावात येणार आहे. सध्या दौंडच्या तलावात १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, ३ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तलावाची पाणीसाठवण क्षमता ७५0 एमएलटी आहे. तलाव भरल्यानंतर हे पाणी साधारणत: आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पोहोचेल, असा अंदाज येळवंडे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, तलाव जरी भरला तरी दौंडला एक दिवसाआडच पाणीपुरवठा होणार आहे. शहराला साधारणत: ५ लाख लिटर प्रतिदिनी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाण्याची टंचाई लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत १ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. सोनवडी, नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र, लिंगाळी या ग्रामपंचायतींना नगर परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असतो. मात्र, दुष्काळी परिस्थिती पाहता वरील गावांचा पाणीपुरवठा सध्या बंद केलेला आहे. पाण्यामुळे मोठा दिलासा इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी १ टीएमसी पाणी देऊन येथील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे बापट हे केवळ पुण्याचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे मत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.आवाज उठविला म्हणून न्याय शहराला पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून दौंडला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणी सोडण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने आमदार राहुल कुल यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान, राहुल कुल यांनी यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली. विधानसभेतही त्यांनी दौंडच्या पाणीप्रश्नावर आवाज उठवला. त्यानुसार दौंडसाठी पाणी सोडण्यात आले असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार राहुल कुल यांच्या कामगिरीबाबत नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.