शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

पाणीचोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची फौज

By admin | Updated: May 5, 2016 04:32 IST

खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. मात्र या पाण्याची चोरी होऊन नये म्हणून पाटबंधारे विभागातर्फे भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकात एकूण

दौंड / इंदापूर : खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. मात्र या पाण्याची चोरी होऊन नये म्हणून पाटबंधारे विभागातर्फे भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकात एकूण ३२ जणांची नेमणूक करण्यात आली आहे.धरणातून दौंड आणि इंदापूरला आज मध्यरात्री पाणी सोडण्यात आले आहे. साधारणत: हे पाणी रविवारी दौंडच्या तलावात पोहोचेल, असा अंदाज दौंड नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी अभिमन्यू येळवंडे यांनी सांगितला.पाणी सर्वांत प्रथम पोलीस आणि पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात इंदापूरकडे जाणार असून, इंदापूरचा तलाव भरल्यानंतर हे पाणी परतीच्या मार्गाने दौंडच्या तलावात येणार आहे. सध्या दौंडच्या तलावात १० टक्के पाणीसाठा शिल्लक असून, ३ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तलावाची पाणीसाठवण क्षमता ७५0 एमएलटी आहे. तलाव भरल्यानंतर हे पाणी साधारणत: आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पोहोचेल, असा अंदाज येळवंडे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, तलाव जरी भरला तरी दौंडला एक दिवसाआडच पाणीपुरवठा होणार आहे. शहराला साधारणत: ५ लाख लिटर प्रतिदिनी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाण्याची टंचाई लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत १ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. सोनवडी, नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र, लिंगाळी या ग्रामपंचायतींना नगर परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असतो. मात्र, दुष्काळी परिस्थिती पाहता वरील गावांचा पाणीपुरवठा सध्या बंद केलेला आहे. पाण्यामुळे मोठा दिलासा इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी १ टीएमसी पाणी देऊन येथील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे बापट हे केवळ पुण्याचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे मत इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.आवाज उठविला म्हणून न्याय शहराला पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून दौंडला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणी सोडण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने आमदार राहुल कुल यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान, राहुल कुल यांनी यासंदर्भात पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली. विधानसभेतही त्यांनी दौंडच्या पाणीप्रश्नावर आवाज उठवला. त्यानुसार दौंडसाठी पाणी सोडण्यात आले असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार राहुल कुल यांच्या कामगिरीबाबत नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.