शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

अन्यायकारक जमीन संपादन रोखू, शेतकऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 01:08 IST

चासकमान कालव्याच्या थेंबभरही पाण्याचा लाभ झाला नाही, तरीही शासनाने पुनर्वसनासाठी जमिनी संपादित करण्याचा घाट घातला आहे, हे अन्यायकारक असून, प्रसंगी रक्त सांडू, पण जमिनींचा ताबा घेऊ देणार नाही, असा निर्धार काळुस (ता. खेड) येथील शेतक-यांनी व्यक्त केला.

काळुस - चासकमान कालव्याच्या थेंबभरही पाण्याचा लाभ झाला नाही, तरीही शासनाने पुनर्वसनासाठी जमिनी संपादित करण्याचा घाट घातला आहे, हे अन्यायकारक असून, प्रसंगी रक्त सांडू, पण जमिनींचा ताबा घेऊ देणार नाही, असा निर्धार काळुस (ता. खेड) येथील शेतक-यांनी व्यक्त केला. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना मानणा-या शेतक-यांनी या प्रश्नावर एकत्र येत येथे झालेल्या ग्रामसभेत वरील निर्धार व्यक्त केला.खेड तालुक्यातील काळुस गावच्या पुनर्वसन जमिनीच्या संपादनाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. चासकमान धरणाचा उजवा कालवा काळुसमधून जातो. वीस वर्षांपूर्वी या कालव्याचे थेंबभरही पाणी गावात आले नाही. कालवा आणि पोटचाºयांसाठी शेतकºयांच्या जमिनी घेण्यात आल्या. गाव लाभक्षेत्रात येत असल्याचे दाखवून सुमारे सहाशे एकर क्षेत्रावर भूसंपादनाचे शिक्के मारण्यात आले. मुळात कालव्याला पाणी आलेच नाही, तर लाभक्षेत्राच्या नियमानुसार चुकीचे व अन्यायकारक भूसंपादन झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. यामुळे जमीन विकसन, खातेफोड कर्ज काढणे आदी अनेक समस्यांना शेतकºयांना तोंड द्यावे लागत आहे.यापूर्वी गावातून रिलायन्स वायूवाहिनी, एच. पी. वायूवाहिनी या प्रकल्पांसाठीही शेतकºयांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. आता नव्यानेच भामा-आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांसाठीही येथील जमिनी संपादित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. गावातील शेतकरी याविरोधात एकवटला असून विरोधाची ठाम भूमिका शेतकºयांनी घेतली आहे. याबाबत सविस्तर भूमिका मांडण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.सरपंच यशवंत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांच्या पुढारी व शेतकºयांची उपस्थिती होती. माजी पंचायत समिती सदस्य बबन अरगडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दौडकर, सुभाष पवळे, माजी सरपंच गणेश पवळे, माजी उपसरपंच केशव अरगडे, मोहन पवळे, विश्वनाथ पोटवडे, विठ्ठल अरगडे, विठाबाई खलाटे, संदीप पोटवडे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. काहीही झाले तरी जमिनीचा ताबा घेऊ देणार नसल्याची ठाम भूमिका शेतकºयांनी यावेळी व्यक्त केली. मोहन पवळे यांनी आभार मानले.जमीन संपादनाच्या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि शेतकरी सर्व मतभेद विसरून एकत्र आले आहेत. आपल्यातील दुहीचा फायदा शासन घेत आहे. त्यामुळे जे होईल ते मिळून करू, अशी भावना व्यक्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वी प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकºयांचे समाधान झाल्याशिवाय संपादन करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी ३४ एकर जमिनीचे वाटप लाभार्थ्यांना केले आहे, ही दिशाभूल असून याबाबत शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.राजकीय पक्षांकडून आपला फक्त वापर होत असल्याचेही काही शेतकºयांनी बोलून दाखविले. आता आपली लढाई आपणच लढू, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Puneपुणे