शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

संमेलनाध्यक्ष विरूध्द महामंडळ अध्यक्ष नवा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:43 IST

संमेलनाध्यक्ष निवड मुठभरांच्या हाती : संस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न म्हणजे शिस्तीचा भंग

पुणे : साहित्य महामंडळांच्या सन्माननीय सदस्यांना महामंडळाकडून काही अपेक्षित असल्यास ते महामंडळ अध्यक्षांना रितसर संबंधितांच्या मूळ स्वाक्षरीनिशी कळायला हवे. मात्र, तसे न करता कोणीही विपर्यस्त आणि कपोलकल्पित आरोप करून संस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो संस्थात्मक शिस्तीचा भंग आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या आरोपांना खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिले. घटनात्मक प्रक्रियेचा अवमान करून अशा बाबींची दखल घेतली जाण्याचे प्रयोजनच त्यांनीच संपुष्टात आणले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणुकीऐवजी निवड केली जाईल, अशी घटनादुरुस्ती केल्यानंतर सोमवारी देशमुख यांनी महामंडळाच्या या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अत्यंत चुकीची आणि अध्यक्षांची सन्मानाने निवड या घटनादुरुस्तीच्या मूळ हेतूला काळिमा फासणारी आहे, असे सांगत संमेलनाध्यक्षाची निवड मूठभर लोकांच्या हाती येणार असल्याबद्दल त्यांनी नाराजी नोंदवली होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देशमुख यांच्या आक्षेपावर निशाणा साधला.

‘देशमुख स्वत: घटनादुरुस्ती प्रक्रियेत सहभागी असताना व तिथे आपले मत मांडण्याची त्यांना उपलब्ध संधी घेऊन व त्याला अनुसरून त्यांनी निवडीसाठी महामंडळाकडे नावदेखील पाठवले आहे, असे असताना संस्थात्मक सामूहिक निर्णय प्रक्रियेचा व सामूहिक विवेकाचा असा अवमान करणे अनाकलनीय आहेच; शिवाय ते महामंडळाच्या घटनेचा, घटनात्मक प्रक्रियेचा, प्रक्रियेत सहभागी संस्थांच्या भूमिकांचा अवमान करणारे आहे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

देशमुख यांची मूळ स्वाक्षरी असलेले कोणतेही पत्र अथवा प्रस्ताव महामंडळाच्या कार्यालयात आलेला नाही. तसे पत्र अध्यक्षांच्या अवलोकनात अद्याप आलेले नाही. पत्र मिळाल्यावर घटना व नियमानुसार जे यथोचित असेल त्याप्रमाणे विचार केला जाईल. मात्र, तसे काहीही होण्याची वाट न बघता अगोदरच कोणी अकारणच अधीर होत दबाव निर्माण करू पाहत असेल तर तो संस्थात्मक शिस्तीचा भंग, औचित्य, संकेत आणि परंपरा यांचाही भंग ठरतो. महामंडळ सदस्य असणाऱ्या कोणीही असे काहीही करणे अपेक्षित नाही.- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी