शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

रखडवलेल्या गुणपत्रिका एका दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:28 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाला शिकणा-या हजारो विद्यार्थ्यांच्या एक वर्षापासून रखडलेल्या गुणपत्रिका अखेर एका दिवसात छपाई करून महाविद्यालयांना वितरित करण्यात आल्या आहेत.

दीपक जाधव ।पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाला शिकणा-या हजारो विद्यार्थ्यांच्या एक वर्षापासून रखडलेल्या गुणपत्रिका अखेर एका दिवसात छपाई करून महाविद्यालयांना वितरित करण्यात आल्या आहेत. आॅनलाइन निकाल लागल्यानंतर कागद खरेदी झाली नसल्याने गुणपत्रिकांची छपाईच झाली नसल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते.विद्यापीठामध्ये परीक्षा विभाग हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. निकाल प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. मात्र कागद खरेदी वेळेवर न करण्यात आल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत सापडले होते. याबाबतचे वृत्त बुधवारी लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर मात्र सुस्तावलेल्या यंत्रणेने वेगाने पावले टाकून एका दिवसात निकाल महाविद्यालयांना दिला आहे. वर्षभर रखडलेले छपाईचे काम पतेतीची सुटी असतानाही दिवस-रात्र राबून एका दिवसात पूर्ण करण्यात आले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत १२० एमबीएच्या महाविद्यालयांमध्ये दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एमबीए प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राचा आॅनलाइन निकाल नोव्हेंबर २०१६ मध्ये जाहीर करण्यात आला. त्यानंतर एमबीएच्या दुसºया सत्र परीक्षेचा निकाल मे २०१७ मध्ये आॅनलाइन जाहीर करण्यात आला. मात्र गेल्या वर्षभरापासून कागद उपलब्ध नसल्याने गुणपत्रिकांची छपाईच होऊ शकलेली नव्हती. त्यामुळे त्याचे वाटपच होऊ शकले नव्हते.गुणपत्रिका मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत सापडले होते. अनेक विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेता येत नव्हता. एमबीए महाविद्यालयांचे प्रशासन व विद्यार्थ्यांकडून सातत्याने गुणपत्रिका मिळण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती.परीक्षा विभागातील अनेक प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. इंजिनिअरिंग व आर्किटेक्टकॉलेजचे अनेक विद्यार्थी परीक्षेला हजर असतानाही त्यांना गैरहजर दाखवून अनुत्तीर्ण करण्यातआल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उजेडात आला होता. त्याचबरोबर वेतन मिळत असतानाही अधिकचा प्रोत्साहन भत्ता बेकायदेशीररीत्या उचलला जात असल्याचे उजेडात आले आहे. यामुळे परीक्षा विभागाची विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.परीक्षा विभागात सुधारणा व्हाव्यात, यासाठी विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंकडे निवेदने दिली आहेत. येत्या काही दिवसांत यामध्ये बदल न झाल्यास परीक्षा विभागाचे कामकाज चालू देणार नाही, इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.>गुणपत्रिका मिळाल्या, पण कारवाईचे काय?एक वर्षानंतर गुणपत्रिका तर मिळतील मात्र तरीही काही प्रश्न अजून अंधारीच आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास एखादा दिवस उशीर केला तर त्यांच्याकडून लेट फी घेतली जाते. त्याचवेळी गुणपत्रिका देण्यास एक वर्षाचा विलंब लावून त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणाºया अधिकाºयांवर काय कारवाई केली जाणार, याची विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. परीक्षा विभागाच्या गैरप्रकारांच्या चौकशीसाठी यापूर्वीच एकसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. आता या पार्श्वभूमीवर कुलगुरू काय भूमिका घेतात, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.