शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

नरेंद्र मोदींविषयी संघात खदखद, ‘एकला चलो’मुळे संघ नाराज - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 05:28 IST

मंत्रिमंडळात फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना फारसे विश्वासात घेतले नाही. विनय सहस्रबुद्धे व राम माधव यांना मंत्रिपद न दिल्याने नाराजी आहे.

पुणे : ‘मंत्रिमंडळात फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना फारसे विश्वासात घेतले नाही. विनय सहस्रबुद्धे व राम माधव यांना मंत्रिपद न दिल्याने नाराजी आहे. सरकारकडे चांगल्या क्षमतेचे मंत्री नाहीत, हेही जगजाहीर आहे. तसेच मोदींच्या ‘एकला चलो’ धोरणामुळे संघात त्यांच्याविषयी खदखद सुरू झाली आहे,’ असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी येथे सांगितले. तसेच समविचारी पक्षांनी एकत्र येण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचेही चव्हाण यांनी समर्थन केले.महाराष्ट्र मीडियाच्या वतीने चव्हाण यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजिला होता. या वेळी निवेदक सुधार गाडगीळ यांनी चव्हाण यांच्याशी संवाद साधला. चव्हाण यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.त्यांनी निवडणुकीपूर्वी खूप घोषणाबाजी केली. पण एकही पूर्ण झाली नाही. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी या घोषणा करण्यात आल्या. तसेच त्यांनी निवडणुकीत हिंदीचाही प्रभावी वापर केला. याबाबतीत काँग्रेसचे नेते मागे पडले. त्यामुळे आमचा धक्कादायक पराभव झाला. मोदी यांच्या तोडीचा नेता काँग्रेसमध्ये नसल्याची कबुलीही त्यांनी या वेळी अप्रत्यक्षपणे दिली.आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र येण्याच्या शरद पवार यांच्या भूमिकेचे समर्थन चव्हाण यांनी केले. आजचे अंकगणित पाहिले तर आमचा पक्ष कमी पडत आहे. राष्ट्रवादीबद्दल आजही स्पष्टता वाटत नाही. तरीही पवारांच्या भूमिकेचे समर्थन करतो. विरोधकांना एकत्र यावेच लागणार आहे. सध्या काँग्रेसही रस्त्यावर यायला कमी पडत आहे, असे चव्हाण यांनी नमूद केले.गृहमंत्रिपद सोडले ही चूक!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवून खूप शहाणपणाचा निर्णय घेतला. दुर्दैैवाने हे खाते मला ठेवता आले असते तर खूप मोठा फरक पडला असता, अशी टिप्पणी चव्हाण यांनी केली. देशात आघाडी सरकार असलेल्या प्रत्येक राज्यांत हीच पद्धत आहे. पण मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा हे खाते सोडले. तिथून पुढे ही पद्धत सुरू झाली, असे चव्हाण म्हणाले.बुलेट ट्रेनचा निर्णय अविचारीनोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी मोदी हे सारासार विचार करून निर्णय घेत नसल्याचे सांगितले. लोकांकडील नोटा गायब करून क्रेडिट व डेबिट कार्डला खुली छूट दिली. लोकांना त्याकडे जबरदस्तीने वळविले. मात्र, त्यांची सर्व उद्दिष्टे फेल ठरली आहेत. बुलेट ट्रेनचा निर्णयही नोटाबंदीइतकाच अविचारी आहे. अनेक प्रश्न असताना अहमदाबादला प्राधान्य मिळावे, यासाठी बुलेट ट्रेनचा निर्णय घेतला, असे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण