शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

नरेंद्र मोदींविषयी संघात खदखद, ‘एकला चलो’मुळे संघ नाराज - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 05:28 IST

मंत्रिमंडळात फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना फारसे विश्वासात घेतले नाही. विनय सहस्रबुद्धे व राम माधव यांना मंत्रिपद न दिल्याने नाराजी आहे.

पुणे : ‘मंत्रिमंडळात फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना फारसे विश्वासात घेतले नाही. विनय सहस्रबुद्धे व राम माधव यांना मंत्रिपद न दिल्याने नाराजी आहे. सरकारकडे चांगल्या क्षमतेचे मंत्री नाहीत, हेही जगजाहीर आहे. तसेच मोदींच्या ‘एकला चलो’ धोरणामुळे संघात त्यांच्याविषयी खदखद सुरू झाली आहे,’ असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी येथे सांगितले. तसेच समविचारी पक्षांनी एकत्र येण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचेही चव्हाण यांनी समर्थन केले.महाराष्ट्र मीडियाच्या वतीने चव्हाण यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजिला होता. या वेळी निवेदक सुधार गाडगीळ यांनी चव्हाण यांच्याशी संवाद साधला. चव्हाण यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.त्यांनी निवडणुकीपूर्वी खूप घोषणाबाजी केली. पण एकही पूर्ण झाली नाही. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी या घोषणा करण्यात आल्या. तसेच त्यांनी निवडणुकीत हिंदीचाही प्रभावी वापर केला. याबाबतीत काँग्रेसचे नेते मागे पडले. त्यामुळे आमचा धक्कादायक पराभव झाला. मोदी यांच्या तोडीचा नेता काँग्रेसमध्ये नसल्याची कबुलीही त्यांनी या वेळी अप्रत्यक्षपणे दिली.आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र येण्याच्या शरद पवार यांच्या भूमिकेचे समर्थन चव्हाण यांनी केले. आजचे अंकगणित पाहिले तर आमचा पक्ष कमी पडत आहे. राष्ट्रवादीबद्दल आजही स्पष्टता वाटत नाही. तरीही पवारांच्या भूमिकेचे समर्थन करतो. विरोधकांना एकत्र यावेच लागणार आहे. सध्या काँग्रेसही रस्त्यावर यायला कमी पडत आहे, असे चव्हाण यांनी नमूद केले.गृहमंत्रिपद सोडले ही चूक!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवून खूप शहाणपणाचा निर्णय घेतला. दुर्दैैवाने हे खाते मला ठेवता आले असते तर खूप मोठा फरक पडला असता, अशी टिप्पणी चव्हाण यांनी केली. देशात आघाडी सरकार असलेल्या प्रत्येक राज्यांत हीच पद्धत आहे. पण मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा हे खाते सोडले. तिथून पुढे ही पद्धत सुरू झाली, असे चव्हाण म्हणाले.बुलेट ट्रेनचा निर्णय अविचारीनोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी मोदी हे सारासार विचार करून निर्णय घेत नसल्याचे सांगितले. लोकांकडील नोटा गायब करून क्रेडिट व डेबिट कार्डला खुली छूट दिली. लोकांना त्याकडे जबरदस्तीने वळविले. मात्र, त्यांची सर्व उद्दिष्टे फेल ठरली आहेत. बुलेट ट्रेनचा निर्णयही नोटाबंदीइतकाच अविचारी आहे. अनेक प्रश्न असताना अहमदाबादला प्राधान्य मिळावे, यासाठी बुलेट ट्रेनचा निर्णय घेतला, असे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण