शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

महापालिकेच्या पाण्याचा टँकरमधून गैरव्यवहार

By admin | Updated: May 10, 2017 04:27 IST

महापालिकेकडून स्वस्तात मिळणाऱ्या पाण्याने टँकर भरून घ्यायचा व तो महागड्या दराने महापालिकेच्या हद्दीबाहेर विविध प्रकारच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमहापालिकेकडून स्वस्तात मिळणाऱ्या पाण्याने टँकर भरून घ्यायचा व तो महागड्या दराने महापालिकेच्या हद्दीबाहेर विविध प्रकारच्या व्यावसायिकांना विकायचा, असा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू आहे. महापालिकेला या व्यवहारातून अधिकृतपणे ३ कोटी रुपये वर्षाला मिळतात. टँकर लॉबी मात्र यातून कित्येक कोटी रुपये कमवत आहे. या वर्षी पाणीसाठा चांगला असल्याने या व्यवहाराला चांगलीच बरकत आल्याची चर्चा टँकर लॉबीत आहे. महापालिकेच्या हद्दीतच पाणी वितरित करण्याचे बंधन असतानाही सर्रास टँकरद्वारे पाणी हद्दीबाहेर नेऊन विकले जात आहे. महापालिकेच्या टँकर पाँइंटवरून टँकर भरून गेल्यानंतर पुढे त्याची तपासणी करणारी कसलीच यंत्रणात महापालिकेकडे नाही. अशी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न टँकर लॉबीने हाणून पाडला आहे. त्यासाठी राजकीय दबावाचाही वापर केला जातो. गेल्या काही वर्षांत ही टँकर लॉबी चांगलीच शक्तिशाली झाली असून, तिच्याकडून पाणीपुरवठा विभागाला टँकरसाठी वेठीस धरले जात आहे. प्रशासनाने टँकर भरून द्यायचे बंद केले, की लगेचच राजकीय दबाव आणून टँकर भरून द्यायला करण्यास भाग पाडले जाते.टँकरचालकांनी महापालिकेत पैसे जमा केले, की त्यांना एक कूपन दिले जाते. ते त्यांनी महापालिकेच्या त्यांच्या नजीक असलेल्या टँकर पॉँइंटवर दाखविले, की त्यांना टँकर भरून मिळतो. हे पाणी महापालिकेने शुद्धीकरण प्रक्रिया केलेले पाणी, प्यायचे पाणी असते. महापालिकेच्या हद्दीतच टँकरचालकांनी ते विकणे बंधनकारक आहे; मात्र तसे केले जात नाही. यातील अनेक टँकर सरळ बाहेर नेले जातात व पाण्याची गरज असलेल्या कंपन्या, बांधकाम व्यावसायिकांना पाणी विकले जाते. स्वस्तात मिळालेले पाणी विकताना मात्र बराच जास्त दर घेऊन विकले जाते. पाणी शुद्ध केलेले असल्यामुळे विकत घेणाऱ्यांना ते तरीही परवडते.यंदा पाणीटंचाई नाही. पुण्याच्या बहुतेक भागांमध्ये, उपनगरांमध्येही व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे. मात्र, तरीही सध्या सुमारे १०० टँकर सुरू आहेत. बहुतेक टँकरमालक महापालिका हद्दीबाहेरचेच आहेत. टँकर बंद करण्याचा विचारही प्रशासन करायला तयार नाही, तसेच इतके टँकर भरून जातात तरी कुठे, याचाही विचार केला जात नाही. काही वर्षांपूर्वी टँकरना जीपीएस यंत्रणा बसविण्याचा विचार प्रशासनाने केला. तो प्रत्यक्षात येण्याआधीच टँकर लॉबीने हाणून पाडला. पदाधिकाऱ्यांनीही याची गरज नाही; म्हणून प्रशासनाला पाठिंबा देण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे पाण्याचा हा धंदा व्यवस्थित सुरू आहे. उपनगरांमधील अनेक नगरसेवकांकडून त्यांच्या भागात टँकर सुरू करण्याबाबत सांगितले जाते त्यामागेही हेच कारण असल्याची चर्चा आहे.