शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

प्रभातची ८० वर्षांत १२ हजार चित्रपटांची मेजवानी

By admin | Updated: December 4, 2014 04:53 IST

: १२ ते १३ हजार चित्रपटांची मेजवानी आजवर पुणेकरांना देणाऱ्या प्रभातचा अस्त होणार असल्याची बातमी समजल्यानंतर चित्रपटरसिक हळहळले.

पुणे : १२ ते १३ हजार चित्रपटांची मेजवानी आजवर पुणेकरांना देणाऱ्या प्रभातचा अस्त होणार असल्याची बातमी समजल्यानंतर चित्रपटरसिक हळहळले. मात्र, या चित्रपटगृहाचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी अनेक घटक पुढे आल्याने डिसेंबरअखेर चित्रपटगृहाची वास्तू कायम राहणार की नव्या वर्षात अस्तित्वाची ‘प्रभात’ पुन्हा उजाडणार, याविषयी रसिकांच्या मनात हुरहुर आहे.१९८५ नंतर निव्वळ मराठी चित्रपटांसाठीच प्रभात उपलब्ध आहे. इंदूरचे सरदार किबे यांच्या मालकीच्या १४ हजार चौरस फूट क्षेत्रापैकी प्रत्यक्ष चित्रपटगृह असलेल्या जागेमुळे प्रभातच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. १९७० पर्यंत दर दहा वर्षांनी भाडेकराराने नूतनीकरण होत होते. १९७० मध्ये ३० वर्षांचा भाडेकरार झाला. तो डिसेंबरमध्ये संपत आहे. चित्रपटगृहात २५ कर्मचारी असून, व्यवस्थापक बाळकृष्ण भिडे आज ८२ वर्षांचे आहेत. १९७१ पासून ते व्यवस्थापकाचे काम पाहतात. त्यांच्यासह अनेक कर्मचारी जुने असून, त्या सर्वांमध्ये अस्वस्थता आहे.गेल्या ८० वर्षांत १३ हजारावर चित्रपटांची मेजवानी दिली. ५१ चित्रपटांनी येथे सुवर्णमहोत्सव साजरा केला. ४६ चित्रपट १०० दिवस चालले. ११७ चित्रपटांनी ५० दिवस रसिकांना येथे आमंत्रण दिले. ‘तोहफा’ हा १९८५ मधील अखेरचा हिंंदी चित्रपटही २६ आठवडे चालला. त्यानंतर मराठी चित्रपटांसाठी प्रभात हक्काचे माहेरघर आहे.अमिताभ तसेच जया बच्चन, लता मंगेशकर अशा कलावंतांनी या चित्रपटगृहाला भेट दिली आहे. मराठीत बहुतेक कलावंतांनी हजेरी लावली आहे. मल्टिीफ्लेक्स संस्कृतीमुळे प्रभातमध्ये चित्रपटाचा प्रिमीयर होऊ शकला नाही. किबे यांच्या तिसऱ्या पिढीच्या निर्णयावर पुण्याच्या या सांस्कृतिक ठेव्याचे अस्तित्व अवलंबून आहे.(प्रतिनिधी)