शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

प्रभागरचनेत जुनीच पद्धत अवलंबण्याचे गौडबंगाल

By admin | Updated: October 12, 2016 03:08 IST

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे काम सॉफ्टवेअरच्या मदतीने पार पाडले जाणार आहे, त्यामुळे त्यामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप टाळला

दीपक जाधव / पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे काम सॉफ्टवेअरच्या मदतीने पार पाडले जाणार आहे, त्यामुळे त्यामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप टाळला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. निवडणूक आयोगाकडील या सॉफ्टवेअरच्या यशस्वी चाचण्याही घेण्यात आल्या होत्या; मात्र राजकीय दबाव वाढल्यामुळे निवडणूक आयोगाला सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभागरचना करण्याचा निर्णय ऐनवेळी रद्द करावा लागल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका होणार असलेल्या सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमधील निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मार्च २०१६ मध्ये घेतली होती. त्या वेळी निवडणूक आयोगाने प्रभागरचना तयार करण्यासाठी एका सॉफ्टवेअरची यशस्वी चाचणी घेतली असून, सर्वांना प्रभागरचना तयार करण्यासाठी ते सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुका चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने, तर नगरपालिकांच्या निवडणुका दोन सदस्यांचा एक प्रभाग, या पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मे २०१६ मध्ये घेतला. निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात आली. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचे जाहीर केल्यानंतर, निवडणूक आयोगाने मुंबईमध्ये सर्व पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्येही प्रभागरचना करण्यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. अगदी आॅगस्टच्या मध्यापर्यंत निवडणूक विभागाचे अधिकारी या सॉफ्टवेअरची वाट पाहत होते; मात्र अचानक २० आॅगस्ट रोजी निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध करून जुन्याच पद्धतीने मॅन्युअली प्रभागरचना तयार करण्याचे निर्देश सर्व महापालिकांच्या निवडणूक विभागांना दिले. सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभागरचना करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली असताना, अचानक हा निर्णय बदलण्यात आला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला राजकीय वर्तुळातून मोठ्याप्रमाणात विरोध झाल्याने दबावापोटी हा निर्णय गुंडाळून ठेवण्यात आला. यामुळे एका पारदर्शक प्रक्रियेला मुकावे लागले आहे. नुकत्याच सर्व महापालिकांच्या प्रभागरचना जाहीर झाल्या आहेत. या प्रभागरचनेमध्ये सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात हस्तक्षेप केला असल्याची टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नैसर्गिक सीमांचे निकष अनेक ठिकाणी पाळण्यात आलेले नाहीत. प्रभागांची मोठ्याप्रमाणात मोडतोड करण्यात आली असून, याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल, भाजपा वगळता इतर पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.