शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागरचनेत जुनीच पद्धत अवलंबण्याचे गौडबंगाल

By admin | Updated: October 12, 2016 03:08 IST

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे काम सॉफ्टवेअरच्या मदतीने पार पाडले जाणार आहे, त्यामुळे त्यामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप टाळला

दीपक जाधव / पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे काम सॉफ्टवेअरच्या मदतीने पार पाडले जाणार आहे, त्यामुळे त्यामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप टाळला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. निवडणूक आयोगाकडील या सॉफ्टवेअरच्या यशस्वी चाचण्याही घेण्यात आल्या होत्या; मात्र राजकीय दबाव वाढल्यामुळे निवडणूक आयोगाला सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभागरचना करण्याचा निर्णय ऐनवेळी रद्द करावा लागल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुका होणार असलेल्या सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमधील निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मार्च २०१६ मध्ये घेतली होती. त्या वेळी निवडणूक आयोगाने प्रभागरचना तयार करण्यासाठी एका सॉफ्टवेअरची यशस्वी चाचणी घेतली असून, सर्वांना प्रभागरचना तयार करण्यासाठी ते सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुका चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने, तर नगरपालिकांच्या निवडणुका दोन सदस्यांचा एक प्रभाग, या पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने मे २०१६ मध्ये घेतला. निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात आली. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचे जाहीर केल्यानंतर, निवडणूक आयोगाने मुंबईमध्ये सर्व पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्येही प्रभागरचना करण्यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले होते. अगदी आॅगस्टच्या मध्यापर्यंत निवडणूक विभागाचे अधिकारी या सॉफ्टवेअरची वाट पाहत होते; मात्र अचानक २० आॅगस्ट रोजी निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध करून जुन्याच पद्धतीने मॅन्युअली प्रभागरचना तयार करण्याचे निर्देश सर्व महापालिकांच्या निवडणूक विभागांना दिले. सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभागरचना करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली असताना, अचानक हा निर्णय बदलण्यात आला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला राजकीय वर्तुळातून मोठ्याप्रमाणात विरोध झाल्याने दबावापोटी हा निर्णय गुंडाळून ठेवण्यात आला. यामुळे एका पारदर्शक प्रक्रियेला मुकावे लागले आहे. नुकत्याच सर्व महापालिकांच्या प्रभागरचना जाहीर झाल्या आहेत. या प्रभागरचनेमध्ये सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात हस्तक्षेप केला असल्याची टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नैसर्गिक सीमांचे निकष अनेक ठिकाणी पाळण्यात आलेले नाहीत. प्रभागांची मोठ्याप्रमाणात मोडतोड करण्यात आली असून, याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल, भाजपा वगळता इतर पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.