शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
4
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
5
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
6
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
7
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
8
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
9
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
10
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
11
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
12
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
13
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
14
india Israel: कॅमेरा लावलेली गोळी पोटात गेल्यावर काय होते? कुठून आल्या कल्पना?
15
Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
16
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
17
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
18
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
19
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
20
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेतून कृषि पंपांना वीज : चंद्रशेखर बावनकुळे; वारजेत सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 12:39 IST

येत्या तीन वर्षात राज्यातील ९० टक्के शेती पंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा देखील वीजपुरवठा होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देवारजे येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीमध्ये दीडशे किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटनराज्य शासनाने सौर ऊर्जेवरील कृषी वाहिन्यांच्या प्रकल्पाला चालना दिली : बावनकुळे

पुणे : येत्या तीन वर्षात राज्यातील ९० टक्के शेती पंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा देखील वीजपुरवठा होणार असून, वीजपुरवठ्याचा प्रतियुनिट दर देखील निम्म्यावर येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि.२१) येथे दिली.वारजे येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीमध्ये दीडशे किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार भीमराव तापकिर, महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका दिपाली धुमाळ, नगरसेविका सायली वांजळे, सोसायटीच्या अध्यक्ष साक्षी महाले या वेळी उपस्थित होते.ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, की पूर्वी सौरऊर्जेवरील वीजनिर्मितीसाठी प्रतियुनिट १६ रुपये खर्च येत होता. केंद्र व राज्य सरकारने सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने हा खर्च प्रतियुनिट तीन ते साडेतीन रुपयांवर खाली आला आहे. शहरी व ग्रामीण भागात सौरऊर्जेवरील प्रकल्पात वाढ होत आहे. या सोबतच राज्यातील सुमारे ४५ लाख शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने सौर ऊर्जेवरील कृषी वाहिन्यांच्या प्रकल्पाला चालना दिली आहे. या महत्वाकांक्षी सौर प्रकल्पाद्वारे येत्या तीन वर्षांत राज्यातील ९० टक्के शेतीपंपांना वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. विवेक रत्नपारखी यांनी प्रास्ताविक केले. सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. तर, नगरसेवक सचिन दोडके यांनी आभार मानले.

अडीच हजार मेगावॉट विजेची मागणी कमी होईलपारंपरिक वीजनिर्मितीद्वारे शेतीपंपांना वीजपुरवठ्यासाठी येणारा प्रतियुनिट सहा रुपये खर्चही तीन रुपयांवर येणार आहे. याशिवाय कोळशावरील सुमारे अडीच हजार मेगावॉट विजेची मागणी कमी होईल व त्याचा पर्यावरणाला फायदा होणार असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेmahavitaranमहावितरणWarje Malwadiवारजे माळवाडी