शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरोनाच्या अफवेमुळे  कुक्कटपालन व्यवसाय अडचणीत ; सायबर सेलकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 18:59 IST

मागील १५ दिवसात बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील दहा दिवसांत ११०० मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सुमारे १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

पुणे : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावासंदर्भात पसरलेल्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. मागील १५ दिवसात बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील दहा दिवसांत ११०० मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सुमारे १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, ही अफवा पसरविणाऱ्यांविरूध्द पशुसंवर्धन विभागाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.चीनमध्ये कोरोना विषाणुचा फैलाव वेगाने होत आहे. भारतामध्ये कोंबडीच्या माध्यमातून या विषाणुचा फैलाव होत असल्याची अफवा सोशल मिडियातून पसरली. त्याचा फटका थेट या व्यवसायाला बसला आहे. यापार्श्वभुमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, राष्ट्रीय विषाणु संस्थे (एनआयव्ही) तील शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. तांदळे, वेंकीजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगांवकर, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते. ‘कोंबडीद्वारे कोरोना विषाणुचा प्रसार होत असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. यांसदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन पोलिस कारवाई करतील. अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले.

पेडगावकर यांनी राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायावर झालेल्या परिणामांची माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात दररोज २८०० मेट्रिक टन ब्रायलर कोंबडीची मागणी असते. दि. ४ फेब्रुवारीनंतर ही मागणी १७०० मेट्रीक टनांपर्यंत खाली आली होती. आता काही प्रमाणात जनजागृती होऊ लागल्याने हा आकडा २२०० मेट्रीक टनांपर्यंत वाढला आहे. पण या अफवेमुळे दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत प्रति दिन १० कोटी याप्रमाणे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या व्यवसायावर मका व सोयाबीन पिकविणाऱ्या शेतक ऱ्यांनाही फटका बसला आहे. देशातील कुक्कुटपालन व्यवसायाची एकुण उलाढाल १ लाख २० कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा १२ टक्के एवढा आहे. देशामध्ये ५० लाख शेतकीर हे मका व ५५ लाख शेतकरी सोयाबीन पिकविणारे आहेत. त्यांनाही या अफवेचा फटका बसला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाcyber crimeसायबर क्राइमSocial Viralसोशल व्हायरल