शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

कोरोनाच्या अफवेमुळे  कुक्कटपालन व्यवसाय अडचणीत ; सायबर सेलकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 18:59 IST

मागील १५ दिवसात बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील दहा दिवसांत ११०० मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सुमारे १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

पुणे : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावासंदर्भात पसरलेल्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. मागील १५ दिवसात बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील दहा दिवसांत ११०० मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सुमारे १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, ही अफवा पसरविणाऱ्यांविरूध्द पशुसंवर्धन विभागाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.चीनमध्ये कोरोना विषाणुचा फैलाव वेगाने होत आहे. भारतामध्ये कोंबडीच्या माध्यमातून या विषाणुचा फैलाव होत असल्याची अफवा सोशल मिडियातून पसरली. त्याचा फटका थेट या व्यवसायाला बसला आहे. यापार्श्वभुमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, राष्ट्रीय विषाणु संस्थे (एनआयव्ही) तील शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. तांदळे, वेंकीजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगांवकर, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते. ‘कोंबडीद्वारे कोरोना विषाणुचा प्रसार होत असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. यांसदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन पोलिस कारवाई करतील. अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले.

पेडगावकर यांनी राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायावर झालेल्या परिणामांची माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात दररोज २८०० मेट्रिक टन ब्रायलर कोंबडीची मागणी असते. दि. ४ फेब्रुवारीनंतर ही मागणी १७०० मेट्रीक टनांपर्यंत खाली आली होती. आता काही प्रमाणात जनजागृती होऊ लागल्याने हा आकडा २२०० मेट्रीक टनांपर्यंत वाढला आहे. पण या अफवेमुळे दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत प्रति दिन १० कोटी याप्रमाणे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या व्यवसायावर मका व सोयाबीन पिकविणाऱ्या शेतक ऱ्यांनाही फटका बसला आहे. देशातील कुक्कुटपालन व्यवसायाची एकुण उलाढाल १ लाख २० कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा १२ टक्के एवढा आहे. देशामध्ये ५० लाख शेतकीर हे मका व ५५ लाख शेतकरी सोयाबीन पिकविणारे आहेत. त्यांनाही या अफवेचा फटका बसला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाcyber crimeसायबर क्राइमSocial Viralसोशल व्हायरल