शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या अफवेमुळे  कुक्कटपालन व्यवसाय अडचणीत ; सायबर सेलकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 18:59 IST

मागील १५ दिवसात बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील दहा दिवसांत ११०० मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सुमारे १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

पुणे : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावासंदर्भात पसरलेल्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. मागील १५ दिवसात बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील दहा दिवसांत ११०० मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सुमारे १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, ही अफवा पसरविणाऱ्यांविरूध्द पशुसंवर्धन विभागाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.चीनमध्ये कोरोना विषाणुचा फैलाव वेगाने होत आहे. भारतामध्ये कोंबडीच्या माध्यमातून या विषाणुचा फैलाव होत असल्याची अफवा सोशल मिडियातून पसरली. त्याचा फटका थेट या व्यवसायाला बसला आहे. यापार्श्वभुमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, राष्ट्रीय विषाणु संस्थे (एनआयव्ही) तील शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. तांदळे, वेंकीजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगांवकर, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते. ‘कोंबडीद्वारे कोरोना विषाणुचा प्रसार होत असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. यांसदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन पोलिस कारवाई करतील. अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले.

पेडगावकर यांनी राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायावर झालेल्या परिणामांची माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात दररोज २८०० मेट्रिक टन ब्रायलर कोंबडीची मागणी असते. दि. ४ फेब्रुवारीनंतर ही मागणी १७०० मेट्रीक टनांपर्यंत खाली आली होती. आता काही प्रमाणात जनजागृती होऊ लागल्याने हा आकडा २२०० मेट्रीक टनांपर्यंत वाढला आहे. पण या अफवेमुळे दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत प्रति दिन १० कोटी याप्रमाणे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या व्यवसायावर मका व सोयाबीन पिकविणाऱ्या शेतक ऱ्यांनाही फटका बसला आहे. देशातील कुक्कुटपालन व्यवसायाची एकुण उलाढाल १ लाख २० कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा १२ टक्के एवढा आहे. देशामध्ये ५० लाख शेतकीर हे मका व ५५ लाख शेतकरी सोयाबीन पिकविणारे आहेत. त्यांनाही या अफवेचा फटका बसला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोनाcyber crimeसायबर क्राइमSocial Viralसोशल व्हायरल