शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

बटाट्याची झाली माती!, अतिपावसाने सडला : उर्वरित मालालाही भाव नाही; उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 04:45 IST

बटाटा उत्पादक शेतक-यांची यंदाची दिवाळी कडू होणार आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने बटाटा शेतातच सडला, तर ऐरणीत ठेवलेल्या मालाचेही नुकसान झाले

पेठ : बटाटा उत्पादक शेतक-यांची यंदाची दिवाळी कडू होणार आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने बटाटा शेतातच सडला, तर ऐरणीत ठेवलेल्या मालाचेही नुकसान झाले; तसेच आता राहिलेल्या मालालाही चांगला भाव नसल्यामुळे उत्पादक चिंतेत आहे. आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणा-या सातगाव पठार भागातील शेतकºयांना याचा मोठा फटका बसला आहे.पेठ, कुरवंडी, कारेगाव, थुगाव, भावडी, कोल्हारवाडी व पारगाव तर्फे खेड परिसरात झालेला पाऊस बटाटा पिकाला मारक ठरला आहे. ४० ते ५० टक्के पीक सडले आहे. उर्वरित शिल्लक असलेल्या बटाट्याला अपेक्षित बाजारभाव नाही. त्यामुळे या भागातील सुमारे १ हजार ५०० शेतकºयांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळ निघाले आहे.या वर्षी जून महिन्यात बटाटा लागवडीसाठी शेतकºयांनी शेत मशागतीची कामे पूर्ण केली होती. वेळेवर पाऊस सुरू झाल्यामुळे दुसºया आठवड्यापासून या भागात बटाटा लागवडीची लगबग सुरू आहे. विशेष म्हणजे, या भागातील शेतीसाठी जलसिंचनाची कोणतीही सोय नाही. पडणा-या पावसावरच येथील शेती व बटाटा पीक अवलंबून आहे. पाच पोत्यांपासून ५०० पोत्यांपर्यंत बटाटा लागवड करणारे शेतकरी या भागात आहेत.गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता शेतकºयांनी यंदा ६० टक्केच बटाटा लागवड केली होती. त्यामुळे लागवड कमी झाल्याने बाजारभावात अपेक्षित वाढ होईल, ही अपेक्षादेखील आता फोल ठरत चालली आहे.पावसाचा सर्वाधिक फटका पारगाव तर्फे खेड व कुरवंडी भागाला बसला. त्या खालोखाल पेठ, थुगाव, भावडी या गावांतील देखील बहुतांशी बटाटा पीक सडले आहे. चालू हंगामात बटाटा पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.चालू वर्षात बटाट्याचे बाजारभाव वाढतील या आशेने अनेक शेतकºयांनी बटाटा पीक काढल्यावर अरणीमध्ये साठविले होते. परंतु, सतत पडणाºया पावसामुळे बटाटे सडले आहेत. अरणीतील निम्मे बटाटे फेकून देण्याचीवेळ शेतकºयांवर आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी