शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पोस्टमन काकांना पोस्टकार्डाची राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 03:33 IST

एके काळी आनंद, दु:ख, यशाच्या वार्ता स्नेहीजनांपर्यंत पोचविणारे पोस्टमन काका बदलत्या काळात मागे-मागे पडत चालले आहेत. सायकल चालवीत येणारा खाकी रंगाच्या कपड्यातील पोस्टमन काका, हे चित्र काळाच्या ओघात हरवत चाललंय.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एके काळी आनंद, दु:ख, यशाच्या वार्ता स्नेहीजनांपर्यंत पोचविणारे पोस्टमन काका बदलत्या काळात मागे-मागे पडत चालले आहेत. सायकल चालवीत येणारा खाकी रंगाच्या कपड्यातील पोस्टमन काका, हे चित्र काळाच्या ओघात हरवत चाललंय. त्यांची ओळख मुलांना व्हावी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरिता निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने पोस्टमन काकांना चक्क पोस्ट कार्डाच्या राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.निरंजन सेवाभावी संस्थेच्या सिद्धीता गटातर्फे पोस्टाच्या मुख्य कार्यालयात (जीपीओ) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपडाकपाल अश्विनी पोतदार, वरिष्ठ डाकपाल आर. एस. गायकवाड, रेखा भळगट, डॉ. प्राजक्ता कोळपकर, शुभांगी धूत, पूनम राठी, रेश्मा भट्टड, पूजा पाटील, वैशाली कासट, प्राजक्ता डागा, भारती होले, अनिता मुंदडा, माधुरी तुपे, पूजा भुतडा, संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट आदी उपस्थित होते. या वेळी पोस्टमन काकांना भेटवस्तू देण्यात आल्या. शुभांगी धूत म्हणाल्या, की आंतरदेशीय पत्र, पिवळसर पोस्टकार्ड, लाल रंगाच्या पत्रपेट्या आणि पत्ररूपी संवादाच्या काळात पोस्टमन काका सर्वांच्याच आयुष्यातील अविभाज्य घटक होते.पोस्ट खात्याचे काम कमी झाले असले, तरी आजही अनेकदा पत्रव्यवहारांसाठी पोस्टमनशिवाय पर्याय नसतो. पोस्टमन गौतम वाव्हळ म्हणाले, की आजच्या काळात मोबाईलमुळे पत्रव्यवहार कमी झाला असून पोस्टमनचे महत्त्वही हळूहळू कमी होऊ लागले आहे. परंतु, आमची आठवण ठेवून आमच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केल्याबद्दल खूप आनंद झाला आहे.