शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

बारामतीत साहित्य संमेलनाची शक्यता धूसर

By admin | Updated: July 9, 2015 02:55 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना अनोखी भेट देण्याच्या हेतूने ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा योग बारामतीला.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना अनोखी भेट देण्याच्या हेतूने ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा योग बारामतीला जुळून येण्यासाठी साहित्य परिषदेची बारामती शाखा ‘गुडघ्याला बाशिंग’ लावून बसली असली, तरी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र पुन्हा जिल्ह्यातच संमेलन घेण्याची शक्यता जवळपास फेटाळून लावली आहे. दोन वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यातील सासवड गावी संमेलनाचा उत्सव पार पडल्यानंतर पुन्हा बारामतीला संमेलन घेण्याचा कोणताच विचार नसल्याचे संकेत पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांच्या आशेवर एक प्रकारे विरजण पडणार आहे. बारामतीमध्ये आजपर्यंत एकदाही साहित्य संमेलन झालेले नाही. शरद पवार यांचा अमृतमहोत्सव असल्याने त्यांना ही अनोखी भेट दिली जाऊ शकते, म्हणून साहित्य परिषदेची बारामती शाखा या ठिकाणी संमेलन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यासाठी महामंडळावर दबावदेखील टाकला जाऊ शकतो. मात्र, यापूर्वीचा इतिहास पाहिला तर युवा साहित्य संमेलनासह पवारांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधत नाट्यसंमेलनचा घाटही या ठिकाणी घालण्यात आला होता. यातही संमेलनासाठी दोन-तीनच निमंत्रणे आली असती तर बारामतीमध्ये संमेलन घेण्याचा विचारही झाला असता. मात्र यंदाच्या वर्षी ११ निमंत्रणे आली आहेत.त्यामुळे इतरही स्थळांचा विचार केला जाऊ शकतो. तूर्तास तरी पुन्हा बारामतीमध्येच साहित्य संमेलन घेणे शक्य होईल असे वाटत नसल्याचे स्पष्ट संकेत पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. यंदा साहित्य संमेलनासाठी आलेल्या निमंत्रणांमध्ये मराठवाड्यातील हिंगोली, नायगाव, उस्मानाबाद अशी तीन, पिंपरीच्या डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, कलारंग संस्था, कामगार साहित्य संघ अशी तीन, सातारा, बारामती, अक्षरमानव श्रीगोंदा, भालकी (कर्नाटक) आणि अग्रीयुथ फोरम आदी ११ ठिकाणांचा समावेश आहे. मराठवाड्यातील दुष्काळसदृश स्थिती पाहता या ठिकाणी संमेलन होणे तसे दुरापास्त आहे. बेळगावच्या नाट्यसंमेलनाला चढलेला वादग्रस्त रंग पाहता इथे साहित्य संमेलन न घेणेच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे ११ पैकी सहाच स्थळांचा विचार खऱ्या अर्थाने केला जाणार आहे. त्यातीलही ‘पवारां’च्या गावाला काही प्रमाणात फुलीच मारली जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे संमेलनासाठी केवळ पिंपरी-चिंचवडच्या तीन आणि सातारा, श्रीगोंदा या स्थळांचाच प्रकर्षाने विचार होईल, असे सकृद्दर्शनी दिसत आहे. (प्रतिनिधी)साहित्य महामंडळ पुण्यात आहे म्हणून शहराच्या आसपासच्या स्थळांचा विचार करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे शहराबाहेरील स्थळांचा प्रामुख्याने विचार केला जाईल. स्थळ निवड समिती काही निवडक स्थळांची पाहणी करेल. त्यानंतर ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत समितीने सुचविलेल्या स्थळांचा विचार केला जाईल.- प्रकाश पायगुडे, प्रमुख कार्यवाह, साहित्य महामंडळ> बारामतीमध्ये आजपर्यंत एकदाही साहित्य संमेलन झालेले नाही. शरद पवार यांचा अमृतमहोत्सव असल्याने त्यांना ही अनोखी भेट दिली जाऊ शकते, म्हणून बारामती शाखा संमेलन घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.> पिंपरी-चिंचवडच्या तीन आणि सातारा, श्रीगोंदा या स्थळांचाच प्रकर्षाने विचार होण्याची शक्यता.