शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘एफटीआय’मधील वाद मिटण्याची शक्यता

By admin | Updated: August 22, 2015 02:14 IST

गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी नियुक्ती आणि इतर प्रश्नांसंदर्भात ७१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची प्रथमच केंद्रीय पातळीवर सकारात्मक पद्धतीने दखल घेतली

पुणे : गजेंद्र चौहान यांची अध्यक्षपदी नियुक्ती आणि इतर प्रश्नांसंदर्भात ७१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची प्रथमच केंद्रीय पातळीवर सकारात्मक पद्धतीने दखल घेतली गेल्याने फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) चिघळलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी समजून घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्प मूल्यांकन प्रक्रियेसह अन्य विषयांवर विस्तृत चर्चा झाल्याने संचालक, विद्यार्थी यांच्यासह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्रिसदस्यीय समिती सोमवारपर्यंत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे अहवाल सादर करणार आहे. शुक्रवारी प्रथमच आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एस. एम. खान, अंशू सिन्हा आणि सी. राजनाथ यांची समिती शुक्रवारी संस्थेत आली. या समितीने केवळ स्टुडंट असोसिएशनशीच नव्हे, तर टीचर्स आणि कर्मचारीवर्गाशीही चर्चा केली. एस. एम. खान म्हणाले, ‘‘संस्थेतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची त्वरित पूर्तता करणे, कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. प्राध्यापकांकडून काही चांगल्या सूचनाही मिळाल्या. या चर्चेनंतर चांगलेच निष्पन्न होईल, याबाबत आम्ही आशावादी आहोत.’’ आंदोलनाचे नेतृत्व करणारा विकास अर्स म्हणाला, ‘‘सोमवारपर्यंत चांगल्या निकालाची वाट पाहू. माझ्यासह राहत, सचित, शिनी, रणजित नायर, अजयन अडार असे सात जण चर्चेमध्ये सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)