शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पॉप्युलर बूक हाऊस घेतेय वाचकांचा निरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:56 IST

पुणे : लेखक, खेळाडू, अभिनेते, राजकीय  नेते, उद्योगपती, गायक, शास्त्रज्ञ, शासकीय व पोलीस अधिकारी अशा दिग्गजांचे फर्ग्युसन रस्त्यावरील पॉप्युलर बूक हाऊसशी स्नेहबंध निर्माण झाले.

ठळक मुद्देमाधव लक्ष्मण गाडगीळ यांनी १० आॅक्टोबर १९५४ रोजी पॉप्युलर बुक हाऊसची स्थापना केली.पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, पं. हृदयनाथ मंगेशकर, अनुराधा पौडवाल, बाळासाहेब ठाकरे यांनी दुकानाला भेट दिली होती. देशा-परदेशातील वाचकांचेही हे आवडीचे ठिकाण होते. 

पुणे : गेली ६४ वर्षे हजारो वाचक, लेखक, प्राचार्य, ग्रंथपालांचे हक्काचे साहित्यस्थान असलेले फर्ग्युसन रस्त्यावरील पॉप्युलर बूक हाऊस वाचकांचा निरोप घेत आहे. करमणुकीची नवी साधने, वाचनाकडील कमी झालेली ओढ या कारणांमुळे पुस्तकविक्री घटल्याने हे बूक हाऊस बंद करण्याची वेळ ओढवली आहे. चार-पाच वर्षांपासून पुस्तकविक्रीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. वाचनप्रेमी दुकानामध्ये येईनासे झाले आहेत. त्यामुळे बूक हाऊस काळाच्या पडद्याआड जाणार आहे.     पुस्तकांबरोबरच सीडी, व्हीसीडी,डिव्हीडी, आॅडिओ बुक्स, किंडल असे कालानुरुप होत गेलेले बदल ‘पॉप्युलर’ने सहज स्वीकारले. पहिले आॅनलाईन बुक स्टोर्स सुरू केले होते. मात्र, काही काळाने ते यशस्वीपणे चालू शकले नाही. फेसबुक, व्हाट्सअप, ईमेलच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या कायमच संपर्कात राहिलो. ‘टीम पीबीएच’ ह्या व्हाट्सअप ग्रूपने अनेक मित्र दिले. ह्या ग्रूपद्वारे आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवू शकलो, अशी प्रतिक्रिया सुनील गाडगीळ यांनी व्यक्त केली. परिस्थिती बदलली, आवड, प्राधान्यक्रम बदलल्या आणि बुक हाऊस बंद करावे लागणार  ह्या कटू सत्याला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी केली. त्याच जागेत लवकरच एका नव्या रुपात, नव्या स्वरूपात आपल्या सेवेस येत आहोत, असेही ते म्हणाले.माधव लक्ष्मण गाडगीळ यांनी १० आॅक्टोबर १९५४ रोजी पॉप्युलर बुक हाऊसची स्थापना केली.  लेखक, खेळाडू, अभिनेते, राजकीय  नेते, उद्योगपती, गायक, शास्त्रज्ञ, शासकीय व पोलीस अधिकारी अशा दिग्गजांचे बूक हाऊसशी स्नेहबंध निर्माण झाले. वाचकांच्या तीन चार पिढया दुकानाशी जोडल्या गेल्या. पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, पं. हृदयनाथ मंगेशकर, अनुराधा पौडवाल, बाळासाहेब ठाकरे यांनी दुकानाला भेट दिली होती. देशा-परदेशातील वाचकांचेही हे आवडीचे ठिकाण होते. ------------------पुस्तकप्रेम आणि व्यवहार यामध्ये व्यवहाराची सरशी झाली. पुस्तकविक्रीचे प्रमाण घटल्याने तोटा सहन करत आणखी किती काळ दुकान सुरू ठेवायचे ही चिंता भेडसावत होती. ग्राहकांचा ओघ कमी झाल्याने पुस्तकांची विक्री होत नसल्याच्या कारणास्तव काही कर्मचाºयांना कमी करण्याची वेळ ओढवली. वर्षभर विचार केल्यानंतर आता हे दुकान बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. दुकानातील उर्वरित माल वितरकांकडे पोहोचविल्यानंतर चार-पाच दिवसांत दुकान औपचारिकरित्या बंद होणार आहे. लवकरच आम्ही एका नव्या स्वरूपात पुणेकरांसमोर येणार आहोत. - सुनील गाडगीळ 

टॅग्स :Puneपुणे