शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आळंदीच्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण ११ नाल्यांमुळे, पाच दिवस नदी फेसाळलेलीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 12:35 IST

महापालिका म्हणते, हे तर आमचे सांडपाणी नाही!...

पिंपरी :इंद्रायणी नदीत उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. अकरा नाले थेट नदीत सोडले आहेत. आता पाच दिवस नदी फेसाळूनही आळंदी नगरपालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी यांना कोठून दूषित पाणी मिसळते, हे सापडलेले नाही. त्यामुळे नदीसुधार योजनेच्या गप्पा फार्सच ठरत आहेत.

पुणे जिल्ह्याला धरण आणि नद्यांचे मोठे वैभव आहे. मात्र, नद्यांच्या आरोग्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत वारंवार पर्यावरणवादी संस्थांनी आवाज उठवूनही त्यांचा आवाज लालफितीच्या कारभारातील प्रशासनापर्यंत पोहोचत नाही.

बुधवारपासून नदी फेसाळलेली

इंद्रायणी नदी आळंदीतील केटीवेअरपासून गावापर्यंत फेसाळलेली आहे. याबाबत नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए आणि नगरपालिकेकडे तक्रार करूनही त्याबाबत दखल घेतली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ते नाले थेटपणे नदीत!

पर्यावरणवादी संस्थांनी केलेल्या पाहणीनुसार, इंद्रायणी नदीचे प्रदूषण लोणावळ्यापासून सुरू होते. त्याचबरोबर तळेगाव दाभाडे, इंदोरी, देहूगाव या भागातील पाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडले जात असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. महापालिका क्षेत्रात एसटीपी प्लांट केले असले, तरी तळवडे, चिखलीतील दोन नाल्यांमधील पाणी थेट नदीत जात आहे. नदीच्या अलीकडे महापालिका आणि पलीकडच्या भागामध्ये चाकण एमआयडीसी, निघोजे, चिंबळी, मोई व आळंदी या गावांचा समावेश आहे. या भागात खासगी कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. नागरीकरणही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यांचे पाणी नदीत सोडले जात आहे. चिंबळी, मोई आणि निघोजेमधील अकरा नाले थेट नदीत सोडले आहेत. त्यामुळे प्रदूषणात भर पडली आहे.

महापालिका म्हणते, हे तर आमचे सांडपाणी नाही!

पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, इंद्रायणी नदीच्या अलीकडच्या भागांमध्ये महापालिका क्षेत्र आहे. नागरिकांची तक्रार झाल्यानंतर संबंधित भागांमध्ये जाऊन पथकाने पाहणी केली. महापालिकेच्या भागातून रसायनमिश्रित पाणी जात नसल्याचे दिसून आले. पलीकडचा भाग पीएमआरडीए, नगरपालिका आणि एमआयडीसीचा आहे. संबंधित प्रशासनाने याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीAlandiआळंदी