शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

प्रदूषणामुळे मुठेतील माशांच्या ६१ प्रजाती नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 02:16 IST

-  श्रीकिशन काळे  पुणे : मुळा-मुठा नदीपात्र एवढे प्रदूषित झाले आहे, की त्यातील जवळपास ६१ माशांच्या प्रजातीच नष्ट झाल्या ...

-  श्रीकिशन काळे 

पुणे : मुळा-मुठा नदीपात्र एवढे प्रदूषित झाले आहे, की त्यातील जवळपास ६१ माशांच्या प्रजातीच नष्ट झाल्या आहेत. आता केवळ एक-दोन मासे सापडत असावेत किंवा तेदेखील नष्ट झाले असतील. आता या नद्या पुन्हा पूर्वीसारख्या स्वच्छ आणि प्रवाही करायच्या असतील, तर पुणेकरांनीच प्रयत्न केले पाहिजे, असे प्राणीशास्त्राचे अभ्यासक व संशोधक प्रा. हेमंत घाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काही वर्षांपूर्वी या नदीतील मासे बाटलीत जतन करून ठेवले आहेत. तेच आता पुणेकरांना पाहावे लागतील, असेही ते म्हणाले.

येत्या २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान शहरात नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या सुमारे २० संस्था एकत्र येऊन नदीसंवर्धनाचे काम करीत आहेत. प्रा. घाटेम्हणाले, ‘‘नद्यांच्या प्रदूषणाचा नाश हा केवळ पर्यावरणासाठी नव्हे, तर मानवासाठीदेखील घातक आहे. नद्या बिघडल्यामुळे मानवी आरोग्य, शेतकºयांचे अर्थकारण, अनेकांच्या रोजीरोटीवर परिणाम झालेला आहे. १९४२ मध्ये मुळा-मुठा नदीतमाशांच्या तब्बल ६१ प्रजाती अस्तित्वात होत्या. त्या साºयांच्या नोंदी केल्या होत्या. त्यानंतर आम्ही १९९२ ते १९९५ दरम्यान माशांचे सर्वेक्षण केले. तेव्हा अर्ध्याहून अधिक प्रजाती संपूर्णपणे नामशेष झाल्याचे उघड झाले. आता तर एकही मासा जिवंत राहू शकेल, अशी स्थितीमुठेची नाही.’’

मुळा-मुठेत सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडले जात आहे. त्यातून फॉस्फेट व नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याने जलपर्णीचे प्रमाण वाढते. कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारे डिटर्जंट आणि साबण यामधील फॉस्फेट थेट नदीत येत आहे. परिणामी मासे नष्ट झाले आणि जलपर्णीसारखी वनस्पती वाढू लागली. जलपर्णीमुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता खालावते. त्यातील आॅक्सिजन कमी होते.त्यामुळे मासे व इतर जलचरांचा जीव जातो. आता तर मुठेतील पाण्यात हातदेखील घालावा वाटत नाही. अत्यंत घाण वास येतो.’’माशांचे संशोधनच दिले सोडून...मी मुठेतील अनेक मासे जतन करून ठेवले आहेत. ते इतर कोणाकडेही सापडणार नाहीत. पण आता मी माशांवरील संशोधनच सोडून दिले आहे. कारण मुठेमध्ये माशांचे अस्तित्वच नाही. पुणेकरांना वाटतच नाही की, मुठेसाठी आपण काही तरी करावे. त्यात महापालिकेतील अधिकारी आणि राजकीय नेते यांच्याकडेही इच्छाशक्ती राहिलेली नाही. त्यामुळे मी आता मुठेबाबत संशोधन करीत नाही. तिला पुनर्जीवित करायचे असेल, तर पुणेकरांनी रस्त्यावर येऊन मोठा दबाव आणला पाहिजे.सांडपाणी सोडणाºयांवर कडक कारवाई व्हावीजोपर्यंत नदीपात्रात सांडपाणी सोडणे बंद होणार नाही, तोपर्यंत नदी स्वच्छ होण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. तसेच महापालिकेतर्फे ठिकठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण केंद्र सुरू व्हायला हवीत. जे सांडपाणी सोडतील, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी डॉ. घाटे यांनी केली. तसेच प्रदूषण महामंडळाने सातत्याने नदी प्रदूषणावर लक्ष दिले पाहिजे, नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून नदीत कचरा टाकू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.संशोधनाकडे दुर्लक्षचमी मुठा नदीचे संशोधन करीत असताना अनेक मासे बाटलीत जतन करून ठेवले आहेत. आता हे मासे नदीतून नष्ट झाले आहेत. त्यामुळे केवळ बाटलीतच ते पाहायला मिळणार आहेत. खरं तर इंग्लंडप्रमाणे आपण संशोधनावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी दोनशे वर्षांच्याही वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. तसेच ते संशोधनावर लक्ष देतात, आपल्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते, अशी खंत प्रा. घाटे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :riverनदीmula muthaमुळा मुठा