शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

महावितरणच्या देखभाल दुरूस्तीची ‘पोलखोल’

By admin | Updated: August 7, 2016 04:24 IST

पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे

पुणे : पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे नसल्याची लेखी कबुली महावितरणने दिली आहे. तसेच या देखभाल दुरुस्तीसाठी मागविलेले साहित्य मुंबई कार्यालयाने जुलै संपल्यानंतरही पाठविले नसल्याचे माहिती अधिकारांतर्गत समोर आले आहे. त्यामुळे महावितरणने शहरात देखभाल दुरुस्ती खरंच केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून आवश्यकतेनुसार उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्राची देखभाल व दुरुस्तीची कामेर् तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, तारा ओढणे, उपकेंद्र देखभाल, वाकलेले वीजखांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले वीजखांब बदलणे, ब्रेकर्सर्ची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, आॅईल फिल्टरेशन, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची कटाई, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजतारा बदलणे या कामांसह इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. दर वर्षी ही कामे ३१ मेअखेर पूर्ण केली जातात. या वर्षीही जूनच्या सुरुवातीलाच ही कामे सुमारे ९० टक्के झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते. या संदर्भात सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे परिमंडळात तसेच विभागनिहाय देखभाल दुरुस्तीसाठी साहित्याची मागणी झाली आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्याबाबत उत्तर देताना महावितरणच्या मंडलनिहाय विभागांकडून झालेल्या मागणीनुसार, २७ मे रोजी साहित्य मागविण्यात आले होते. मात्र, अद्याप ते मिळाले नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. पहिल्याच पावसात उडाला होता फज्जा शहरात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. मात्र, या अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या कामाने शहरात महावितरणच्या देखभाल दुरूस्तीच्या कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. त्यामुळे जवळपास अर्धे शहर दोन दिवस टप्प्या टप्प्याने अंधारात होते. त्यामुळे महावितरणकडून नक्की पावसाळ्यापूर्वी कामे झाली का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, माहिती अधिकारात देण्यात आलेल्या माहितीवरून ही कामे झालीच नसल्याचे समोर येत आहे.शहरात महावितरणचे सर्वाधिक २२ लाख ग्राहक आहेत. तर, राज्यात सर्वाधिक उत्पन्नही पुण्यातून मिळते, तसेच पुण्यात वीजचोरी व गळतीचे प्रमाणही कमी आहे. असे असतानाही पुणे विभागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.