शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

महावितरणच्या देखभाल दुरूस्तीची ‘पोलखोल’

By admin | Updated: August 7, 2016 04:24 IST

पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे

पुणे : पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे नसल्याची लेखी कबुली महावितरणने दिली आहे. तसेच या देखभाल दुरुस्तीसाठी मागविलेले साहित्य मुंबई कार्यालयाने जुलै संपल्यानंतरही पाठविले नसल्याचे माहिती अधिकारांतर्गत समोर आले आहे. त्यामुळे महावितरणने शहरात देखभाल दुरुस्ती खरंच केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून आवश्यकतेनुसार उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्राची देखभाल व दुरुस्तीची कामेर् तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, तारा ओढणे, उपकेंद्र देखभाल, वाकलेले वीजखांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले वीजखांब बदलणे, ब्रेकर्सर्ची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, आॅईल फिल्टरेशन, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची कटाई, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजतारा बदलणे या कामांसह इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. दर वर्षी ही कामे ३१ मेअखेर पूर्ण केली जातात. या वर्षीही जूनच्या सुरुवातीलाच ही कामे सुमारे ९० टक्के झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते. या संदर्भात सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे परिमंडळात तसेच विभागनिहाय देखभाल दुरुस्तीसाठी साहित्याची मागणी झाली आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्याबाबत उत्तर देताना महावितरणच्या मंडलनिहाय विभागांकडून झालेल्या मागणीनुसार, २७ मे रोजी साहित्य मागविण्यात आले होते. मात्र, अद्याप ते मिळाले नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. पहिल्याच पावसात उडाला होता फज्जा शहरात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. मात्र, या अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या कामाने शहरात महावितरणच्या देखभाल दुरूस्तीच्या कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. त्यामुळे जवळपास अर्धे शहर दोन दिवस टप्प्या टप्प्याने अंधारात होते. त्यामुळे महावितरणकडून नक्की पावसाळ्यापूर्वी कामे झाली का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, माहिती अधिकारात देण्यात आलेल्या माहितीवरून ही कामे झालीच नसल्याचे समोर येत आहे.शहरात महावितरणचे सर्वाधिक २२ लाख ग्राहक आहेत. तर, राज्यात सर्वाधिक उत्पन्नही पुण्यातून मिळते, तसेच पुण्यात वीजचोरी व गळतीचे प्रमाणही कमी आहे. असे असतानाही पुणे विभागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.