शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
4
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
5
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
6
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
7
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
8
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
9
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
10
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
11
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
12
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
13
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
14
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
15
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
16
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
17
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
18
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
19
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
20
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या देखभाल दुरूस्तीची ‘पोलखोल’

By admin | Updated: August 7, 2016 04:24 IST

पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे

पुणे : पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे नसल्याची लेखी कबुली महावितरणने दिली आहे. तसेच या देखभाल दुरुस्तीसाठी मागविलेले साहित्य मुंबई कार्यालयाने जुलै संपल्यानंतरही पाठविले नसल्याचे माहिती अधिकारांतर्गत समोर आले आहे. त्यामुळे महावितरणने शहरात देखभाल दुरुस्ती खरंच केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून आवश्यकतेनुसार उच्चदाब व लघुदाब वाहिन्या, रोहित्राची देखभाल व दुरुस्तीची कामेर् तसेच डिस्क इन्सुलेटर बदलणे, तारा ओढणे, उपकेंद्र देखभाल, वाकलेले वीजखांब सरळ करणे, गंजलेले, तुटलेले वीजखांब बदलणे, ब्रेकर्सर्ची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, आॅईल फिल्टरेशन, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची कटाई, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजतारा बदलणे या कामांसह इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. दर वर्षी ही कामे ३१ मेअखेर पूर्ण केली जातात. या वर्षीही जूनच्या सुरुवातीलाच ही कामे सुमारे ९० टक्के झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते. या संदर्भात सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे परिमंडळात तसेच विभागनिहाय देखभाल दुरुस्तीसाठी साहित्याची मागणी झाली आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्याबाबत उत्तर देताना महावितरणच्या मंडलनिहाय विभागांकडून झालेल्या मागणीनुसार, २७ मे रोजी साहित्य मागविण्यात आले होते. मात्र, अद्याप ते मिळाले नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. पहिल्याच पावसात उडाला होता फज्जा शहरात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पावसाला सुरूवात झाली. मात्र, या अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या कामाने शहरात महावितरणच्या देखभाल दुरूस्तीच्या कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. त्यामुळे जवळपास अर्धे शहर दोन दिवस टप्प्या टप्प्याने अंधारात होते. त्यामुळे महावितरणकडून नक्की पावसाळ्यापूर्वी कामे झाली का? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, माहिती अधिकारात देण्यात आलेल्या माहितीवरून ही कामे झालीच नसल्याचे समोर येत आहे.शहरात महावितरणचे सर्वाधिक २२ लाख ग्राहक आहेत. तर, राज्यात सर्वाधिक उत्पन्नही पुण्यातून मिळते, तसेच पुण्यात वीजचोरी व गळतीचे प्रमाणही कमी आहे. असे असतानाही पुणे विभागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.