शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

मावळात धुमसतेय राजकीय वैमनस्य

By admin | Updated: October 17, 2016 01:26 IST

खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता

पिंपरी : गतवर्षी कामशेतजवळील खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता. मतदानाच्या दिवशीच झालेल्या या खुनाच्या घटनेनंतर दीड वर्षात खुनाच्या आणखी घटना घडल्या. महिनाभरापूर्वीच तळेगाव नगर परिषदेचे सदस्य व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा कट फसला. हल्ल्याच्या तयारीत आलेले शस्त्रधारी आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने ही घटना टळली. काही दिवस उलटताच रविवारी भरदिवसा तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा निर्घृण खून झाला. मावळात राजकीय वैमनस्य धुमसत असल्याचा प्रत्यय या घटनांतून आला आहे.तळेगावात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून, त्यांचा उपद्रव वेळोवेळी जाणवतो. सुपारी देऊन खून केल्याच्या घटना तळेगावसह मावळ तालुक्यात घडल्या आहेत. ग्रामपंचायत अथवा नगर परिषदेची निवडणूक असते, त्या वेळी या गुन्हेगारी टोळ्या अधिक सक्रिय होतात. राजकीय वैमनस्यातून घडणाऱ्या घटना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे संकेत देणाऱ्या आहेत. लोकप्रतिनिधी अथवा समाज संघटनाचे काम करणाऱ्यांवर असे हल्ले होत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशा घटनांमुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. २०१० मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा तळेगाव येथे भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी खून झाला होता. शेट्टी यांच्या खुनाच्या खळबळजनक घटनेने राज्यभर तळेगावच्या गुन्हेगारीची चर्चा झाली. मुंबई, पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये खुनाच्या गंभीर घटना घडतात. परंतु त्या घटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये घडत असतात. शहरामध्ये राजकारणी अथवा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्य केले जात नाही. तळेगाव आणि मावळ परिसरात मात्र राजकीय व्यक्तींना टार्गेट केले जात आहे. सुपारी घेणाऱ्या गुंडांच्या टोळ्या या भागात कार्यरत आहेत. या परिसरातील गुन्हेगारी वेगळ्या स्वरूपाची असून, गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागला असल्याचे बोलले जात आहे. मावळातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता रसाळ यांचा सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक होताच राजकीय वैमनस्यातूनच काटा काढला. ग्रामपंचायत ते नगर परिषद निवडणुकीच्या वेळी अशा घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)>चार संशयित ताब्यातसचिन शेळके यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तळेगावात या प्रकरणामुळे तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच हत्याप्रकणातील हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. रविवारी रात्री शेळके यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी साथीदारांचा तपास सुरू असल्याचे पोलीस सांगितले.>पोलिसांचे दुर्लक्ष : गुन्हेगारी आळा घालामावळ परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आलेला आहे. तळेगाव, कामशेत, लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गृह प्रकल्प विकसित होत आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून धमकावणे, मारामाऱ्या करणे असे गुन्हे वाढू लागले आहेत. वाढत्या गुन्हेगारीकडे ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादानेच मावळ परिसरात भाईगिरी वाढली आहे. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मावळ परिसरात सुजाण नागरिक करीत आहेत.