शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मावळात धुमसतेय राजकीय वैमनस्य

By admin | Updated: October 17, 2016 01:26 IST

खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता

पिंपरी : गतवर्षी कामशेतजवळील खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता. मतदानाच्या दिवशीच झालेल्या या खुनाच्या घटनेनंतर दीड वर्षात खुनाच्या आणखी घटना घडल्या. महिनाभरापूर्वीच तळेगाव नगर परिषदेचे सदस्य व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा कट फसला. हल्ल्याच्या तयारीत आलेले शस्त्रधारी आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने ही घटना टळली. काही दिवस उलटताच रविवारी भरदिवसा तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा निर्घृण खून झाला. मावळात राजकीय वैमनस्य धुमसत असल्याचा प्रत्यय या घटनांतून आला आहे.तळेगावात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून, त्यांचा उपद्रव वेळोवेळी जाणवतो. सुपारी देऊन खून केल्याच्या घटना तळेगावसह मावळ तालुक्यात घडल्या आहेत. ग्रामपंचायत अथवा नगर परिषदेची निवडणूक असते, त्या वेळी या गुन्हेगारी टोळ्या अधिक सक्रिय होतात. राजकीय वैमनस्यातून घडणाऱ्या घटना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे संकेत देणाऱ्या आहेत. लोकप्रतिनिधी अथवा समाज संघटनाचे काम करणाऱ्यांवर असे हल्ले होत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशा घटनांमुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. २०१० मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा तळेगाव येथे भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी खून झाला होता. शेट्टी यांच्या खुनाच्या खळबळजनक घटनेने राज्यभर तळेगावच्या गुन्हेगारीची चर्चा झाली. मुंबई, पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये खुनाच्या गंभीर घटना घडतात. परंतु त्या घटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये घडत असतात. शहरामध्ये राजकारणी अथवा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्य केले जात नाही. तळेगाव आणि मावळ परिसरात मात्र राजकीय व्यक्तींना टार्गेट केले जात आहे. सुपारी घेणाऱ्या गुंडांच्या टोळ्या या भागात कार्यरत आहेत. या परिसरातील गुन्हेगारी वेगळ्या स्वरूपाची असून, गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागला असल्याचे बोलले जात आहे. मावळातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता रसाळ यांचा सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक होताच राजकीय वैमनस्यातूनच काटा काढला. ग्रामपंचायत ते नगर परिषद निवडणुकीच्या वेळी अशा घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)>चार संशयित ताब्यातसचिन शेळके यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तळेगावात या प्रकरणामुळे तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच हत्याप्रकणातील हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. रविवारी रात्री शेळके यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी साथीदारांचा तपास सुरू असल्याचे पोलीस सांगितले.>पोलिसांचे दुर्लक्ष : गुन्हेगारी आळा घालामावळ परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आलेला आहे. तळेगाव, कामशेत, लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गृह प्रकल्प विकसित होत आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून धमकावणे, मारामाऱ्या करणे असे गुन्हे वाढू लागले आहेत. वाढत्या गुन्हेगारीकडे ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादानेच मावळ परिसरात भाईगिरी वाढली आहे. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मावळ परिसरात सुजाण नागरिक करीत आहेत.