शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मावळात धुमसतेय राजकीय वैमनस्य

By admin | Updated: October 17, 2016 01:26 IST

खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता

पिंपरी : गतवर्षी कामशेतजवळील खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता. मतदानाच्या दिवशीच झालेल्या या खुनाच्या घटनेनंतर दीड वर्षात खुनाच्या आणखी घटना घडल्या. महिनाभरापूर्वीच तळेगाव नगर परिषदेचे सदस्य व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा कट फसला. हल्ल्याच्या तयारीत आलेले शस्त्रधारी आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने ही घटना टळली. काही दिवस उलटताच रविवारी भरदिवसा तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा निर्घृण खून झाला. मावळात राजकीय वैमनस्य धुमसत असल्याचा प्रत्यय या घटनांतून आला आहे.तळेगावात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून, त्यांचा उपद्रव वेळोवेळी जाणवतो. सुपारी देऊन खून केल्याच्या घटना तळेगावसह मावळ तालुक्यात घडल्या आहेत. ग्रामपंचायत अथवा नगर परिषदेची निवडणूक असते, त्या वेळी या गुन्हेगारी टोळ्या अधिक सक्रिय होतात. राजकीय वैमनस्यातून घडणाऱ्या घटना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे संकेत देणाऱ्या आहेत. लोकप्रतिनिधी अथवा समाज संघटनाचे काम करणाऱ्यांवर असे हल्ले होत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशा घटनांमुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. २०१० मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा तळेगाव येथे भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी खून झाला होता. शेट्टी यांच्या खुनाच्या खळबळजनक घटनेने राज्यभर तळेगावच्या गुन्हेगारीची चर्चा झाली. मुंबई, पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये खुनाच्या गंभीर घटना घडतात. परंतु त्या घटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये घडत असतात. शहरामध्ये राजकारणी अथवा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्य केले जात नाही. तळेगाव आणि मावळ परिसरात मात्र राजकीय व्यक्तींना टार्गेट केले जात आहे. सुपारी घेणाऱ्या गुंडांच्या टोळ्या या भागात कार्यरत आहेत. या परिसरातील गुन्हेगारी वेगळ्या स्वरूपाची असून, गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागला असल्याचे बोलले जात आहे. मावळातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता रसाळ यांचा सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक होताच राजकीय वैमनस्यातूनच काटा काढला. ग्रामपंचायत ते नगर परिषद निवडणुकीच्या वेळी अशा घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)>चार संशयित ताब्यातसचिन शेळके यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तळेगावात या प्रकरणामुळे तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच हत्याप्रकणातील हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. रविवारी रात्री शेळके यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. आणखी साथीदारांचा तपास सुरू असल्याचे पोलीस सांगितले.>पोलिसांचे दुर्लक्ष : गुन्हेगारी आळा घालामावळ परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आलेला आहे. तळेगाव, कामशेत, लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गृह प्रकल्प विकसित होत आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून धमकावणे, मारामाऱ्या करणे असे गुन्हे वाढू लागले आहेत. वाढत्या गुन्हेगारीकडे ग्रामीण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादानेच मावळ परिसरात भाईगिरी वाढली आहे. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मावळ परिसरात सुजाण नागरिक करीत आहेत.