शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही अपूर्ण : श्रीपाल सबनीस, मुक्तरंग पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 17:56 IST

राजकीय लोकशाहीचा प्रयोग सांस्कृतिक लोकशाहीशिवाय अपूर्ण असतो, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.  मुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देमुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळाराज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी बहारदार कविता सादर करून रसिकांची जिंकली मने

पुणे : जीवनातील प्रत्येक श्वासात कवितेचा ध्यास पेरणाऱ्या नव्या प्रतिभा आता पुण्या-मुंबई ऐवजी महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातून जन्माला येत आहेत. या नव्या अंकुरांना जुन्या जाणकरांनी तांब्या भरून पाणी घालावे आणि मराठी संस्कृतीचा मळा फुलवावा. तळातील नवे उन्मेषक सांस्कृतिक लोकशाही समृद्ध करीत आहेत. राजकीय लोकशाहीचा प्रयोग सांस्कृतिक लोकशाहीशिवाय अपूर्ण असतो, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. मुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते. सोहळ्यात  सुशीलकुमार शिंदे (कवितासंग्रह : शहर आत्महत्या करायचं म्हणतंय), : ऐश्वर्य पाटेकर (कादंबरी; जू) शंकर विभूते, (कथासंग्रह : आडवाट) हे पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत.  दत्ता घोलप (समीक्षा), सुमित गुणवंत (कविता) यांना उदयोन्मुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य व  सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आकाश आप्पा सोनावणे आणि हृदयमानव अशोक यांचा विशेष  सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजाभाऊ भैलुमे,  प्रमोद आडकर, वि. दा. पिंगळे, राजेंद्र वाघ, शिरीष चिटणीस, म. भा. चव्हाण, महेंद्रकुमार गायकवाड, सर्वेश तरे, अंकुश आरेकर, डॉ. रामचंद्र काकडे, रवींद्र कांबळे, शुभम वाळूंज, दीप पारधे, बबन पोतदार, अजय बिरारी  हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.सबनीस म्हणाले, समाजात विविध प्रमाणात विधायक कर्तृत्वाचे डोंगर उभे करणारे साहित्यिक कलावंत विचारवंत हे समाजाचे मानदंड असतात. असे सांस्कृतिक नायक सन्मान पुरस्काराने सन्मानित करणे समाजाचे कर्तव्य असते. समाजाने संस्कृतीचे शुद्धीकरण केल्याशिवाय राजकीय आणि सामाजिक व्यवस्था सुधारणार नाही. उपेक्षित प्रवाहातून येणारे नवे साहित्यिक समाजाने स्वीकारले आणि गौरविणे सर्वार्थाने आवश्यक आहे.या समारंभासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी भीमराव कोते यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या बहारदार कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. कविसंमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द गझलकार दत्तप्रसाद जोग यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे आणि जित्या जाली यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब घोंगडे यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष सागर काकडे यांनी मानले.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणे