शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही अपूर्ण : श्रीपाल सबनीस, मुक्तरंग पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 17:56 IST

राजकीय लोकशाहीचा प्रयोग सांस्कृतिक लोकशाहीशिवाय अपूर्ण असतो, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.  मुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देमुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळाराज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी बहारदार कविता सादर करून रसिकांची जिंकली मने

पुणे : जीवनातील प्रत्येक श्वासात कवितेचा ध्यास पेरणाऱ्या नव्या प्रतिभा आता पुण्या-मुंबई ऐवजी महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातून जन्माला येत आहेत. या नव्या अंकुरांना जुन्या जाणकरांनी तांब्या भरून पाणी घालावे आणि मराठी संस्कृतीचा मळा फुलवावा. तळातील नवे उन्मेषक सांस्कृतिक लोकशाही समृद्ध करीत आहेत. राजकीय लोकशाहीचा प्रयोग सांस्कृतिक लोकशाहीशिवाय अपूर्ण असतो, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. मुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते. सोहळ्यात  सुशीलकुमार शिंदे (कवितासंग्रह : शहर आत्महत्या करायचं म्हणतंय), : ऐश्वर्य पाटेकर (कादंबरी; जू) शंकर विभूते, (कथासंग्रह : आडवाट) हे पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत.  दत्ता घोलप (समीक्षा), सुमित गुणवंत (कविता) यांना उदयोन्मुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य व  सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आकाश आप्पा सोनावणे आणि हृदयमानव अशोक यांचा विशेष  सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजाभाऊ भैलुमे,  प्रमोद आडकर, वि. दा. पिंगळे, राजेंद्र वाघ, शिरीष चिटणीस, म. भा. चव्हाण, महेंद्रकुमार गायकवाड, सर्वेश तरे, अंकुश आरेकर, डॉ. रामचंद्र काकडे, रवींद्र कांबळे, शुभम वाळूंज, दीप पारधे, बबन पोतदार, अजय बिरारी  हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.सबनीस म्हणाले, समाजात विविध प्रमाणात विधायक कर्तृत्वाचे डोंगर उभे करणारे साहित्यिक कलावंत विचारवंत हे समाजाचे मानदंड असतात. असे सांस्कृतिक नायक सन्मान पुरस्काराने सन्मानित करणे समाजाचे कर्तव्य असते. समाजाने संस्कृतीचे शुद्धीकरण केल्याशिवाय राजकीय आणि सामाजिक व्यवस्था सुधारणार नाही. उपेक्षित प्रवाहातून येणारे नवे साहित्यिक समाजाने स्वीकारले आणि गौरविणे सर्वार्थाने आवश्यक आहे.या समारंभासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी भीमराव कोते यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या बहारदार कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. कविसंमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द गझलकार दत्तप्रसाद जोग यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे आणि जित्या जाली यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब घोंगडे यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष सागर काकडे यांनी मानले.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणे