सरपंच आणि उपसरपंच हे गावातील महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद असल्यामुळे आपल्याच गटाचा किंवा पक्षाचा सरपंच व्हावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. त्यामुळे काठावर बहुमत असलेले ग्रामपंचायत सदस्य सहलीला गेले आहेत. ते निवडणुकीच्या दिवशीच गावात येतील तर अनेक गावात पद मिळाले नाही तर फुटून दुसऱ्या पक्षात जाऊन सरपंचपद पदरात पाडून घेतले जाऊ शकते. तशाही हालचाली सुरु आहेत. यामुळे निष्ठेपेक्षा पदाला महत्त्व प्राप्त झालेले आहे, तर अनेक गावांत अडीच अडीच वर्ष सरपंच उपसरपंचपद वाटूनही घेतले जाऊ शकते.
चौकट अनेक गावांत सरपंचपद वाटून
तालुक्यात ७३ ग्रामपंचायतींचे सरपंच उपसपंच निवडले जाणार आहे. मात्र अनेकजण इच्छुक असल्यामुळे सरपंचपद एक एक वर्ष दोन वर्ष असे वाटून घेतले जात असून, त्यासाठी गावबैठका सुरु आहेत. तर आरक्षण पडलेल्या गावात एकच जण निवडून आला आहे. त्याची पाच वर्षे लाॅटरी लागणार आहे. मात्र सध्या तरी सरपंच होण्यासाठी गावागावांतील गटातटांत मोठी कसरत सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.