शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

पोलिसांचे मन:स्वास्थ्य बिघडले

By admin | Updated: June 12, 2015 06:06 IST

कामाचे अधिक तास, अशातच रजा, सुट्यांचे प्रमाणही कमी. यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, तसेच आरोग्यावरही परिणाम होत आहे.

मंगेश पांडे, पिंपरी कामाचे अधिक तास, अशातच रजा, सुट्यांचे प्रमाणही कमी. यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, तसेच आरोग्यावरही परिणाम होत आहे. यातून पोलिसांची मानसिकता बदलत असून, ते वरिष्ठांनाच दोषी धरू लागले आहेत. कागदोपत्री रजा, सुट्या असतानाही त्या घेताना मात्र अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागत आहे. कामाच्या व्यापामुळे पोलिसांची मानसिकता बदलत आहे. सुटी न दिल्याने अधिकाऱ्याला गोळी घालण्याचा प्रकार मुंबईत घडला. या पाठोपाठ भोसरी पोलीस ठाण्यातही रजा नाकारल्याच्या कारणावरून पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुरक्षितता पुरविणारे पोलीसच हक्काच्या रजा, सुट्यांपासून वंचित राहत असल्याचे दिसून येते.बारा तासाची ड्युटी असली, तरी ती चौदा, पंधरा तासांवर जाते. कामाच्या तासांचे प्रमाण नाही. यामुळे पोलिसांना कुटुंबालाही वेळ देणे शक्य होत नाही. त्यांच्यात चिडचिड निर्माण होते. निवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम, नेत्यांचे दौरे, अचानक घडणाऱ्या घटना यामुळे पोलिसांची अक्षरश: पळापळ होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणखीनच अडचणी निर्माण होतात. खाकी वर्दी आणि कायद्याचे रक्षण करण्याची मिळणारी संधी याचा तरुणांमध्ये उत्साह असतो. मात्र, खात्यातील कामाचा ताण आणि कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.इतर विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांच्या रजा सुट्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. सणासुदीला प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी असते. तसेच कामाचे तासही आठच आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हे कामकाज पाहिले जाते. तर, दुसरीकडे पोलिसांना कामाच्या तासाची कसलीही मर्यादा नाही. त्यामुळे पोलिसांमध्ये अस्वस्थता आहे. तासन्तास काम करायचे आणि मनाप्रमाणे सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी पोलीस कर्मचारी करतात. महत्त्वाच्या कामासाठी आणि तातडीच्या वेळेला रजा मागितली जाते. मात्र, वरिष्ठांकडून अनेकदा हवी तशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही. रजा देण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद होण्याचे प्रसंगही घडतात.आठवड्याची सुटी असतानाही बऱ्याचदा ती मिळत नाही. रजा मागणे म्हणजे पोलिसांपुढे मोठे संकट असते. वर्षाला कागदोपत्री सुमारे १२२ रजा आहेत. मात्र, त्या मिळविण्याठीची प्रक्रियाही तितकीच किचकट आहे. रजेसाठी केलेल्या अर्जाची वरिष्ठांकडून दखलही घेतली जात नाही.