शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

पोलिसांचे मन:स्वास्थ्य बिघडले

By admin | Updated: June 12, 2015 06:06 IST

कामाचे अधिक तास, अशातच रजा, सुट्यांचे प्रमाणही कमी. यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, तसेच आरोग्यावरही परिणाम होत आहे.

मंगेश पांडे, पिंपरी कामाचे अधिक तास, अशातच रजा, सुट्यांचे प्रमाणही कमी. यामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही, तसेच आरोग्यावरही परिणाम होत आहे. यातून पोलिसांची मानसिकता बदलत असून, ते वरिष्ठांनाच दोषी धरू लागले आहेत. कागदोपत्री रजा, सुट्या असतानाही त्या घेताना मात्र अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागत आहे. कामाच्या व्यापामुळे पोलिसांची मानसिकता बदलत आहे. सुटी न दिल्याने अधिकाऱ्याला गोळी घालण्याचा प्रकार मुंबईत घडला. या पाठोपाठ भोसरी पोलीस ठाण्यातही रजा नाकारल्याच्या कारणावरून पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुरक्षितता पुरविणारे पोलीसच हक्काच्या रजा, सुट्यांपासून वंचित राहत असल्याचे दिसून येते.बारा तासाची ड्युटी असली, तरी ती चौदा, पंधरा तासांवर जाते. कामाच्या तासांचे प्रमाण नाही. यामुळे पोलिसांना कुटुंबालाही वेळ देणे शक्य होत नाही. त्यांच्यात चिडचिड निर्माण होते. निवडणुका, सार्वजनिक कार्यक्रम, नेत्यांचे दौरे, अचानक घडणाऱ्या घटना यामुळे पोलिसांची अक्षरश: पळापळ होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणखीनच अडचणी निर्माण होतात. खाकी वर्दी आणि कायद्याचे रक्षण करण्याची मिळणारी संधी याचा तरुणांमध्ये उत्साह असतो. मात्र, खात्यातील कामाचा ताण आणि कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.इतर विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत पोलिसांच्या रजा सुट्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. सणासुदीला प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी असते. तसेच कामाचे तासही आठच आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हे कामकाज पाहिले जाते. तर, दुसरीकडे पोलिसांना कामाच्या तासाची कसलीही मर्यादा नाही. त्यामुळे पोलिसांमध्ये अस्वस्थता आहे. तासन्तास काम करायचे आणि मनाप्रमाणे सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी पोलीस कर्मचारी करतात. महत्त्वाच्या कामासाठी आणि तातडीच्या वेळेला रजा मागितली जाते. मात्र, वरिष्ठांकडून अनेकदा हवी तशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही. रजा देण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद होण्याचे प्रसंगही घडतात.आठवड्याची सुटी असतानाही बऱ्याचदा ती मिळत नाही. रजा मागणे म्हणजे पोलिसांपुढे मोठे संकट असते. वर्षाला कागदोपत्री सुमारे १२२ रजा आहेत. मात्र, त्या मिळविण्याठीची प्रक्रियाही तितकीच किचकट आहे. रजेसाठी केलेल्या अर्जाची वरिष्ठांकडून दखलही घेतली जात नाही.