शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनीच लुटले कुरिअरचे लाखो रुपये

By admin | Updated: January 3, 2016 05:03 IST

नगरहून मुंबईकडे जाणारी कुरिअर कंपनीची तब्बल दहा लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या लुटीमध्ये पुणे पोलिसांच्या

पुणे : नगरहून मुंबईकडे जाणारी कुरिअर कंपनीची तब्बल दहा लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या लुटीमध्ये पुणे पोलिसांच्या ‘एसपीयू’चे दोन पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. या दोघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.रूपेश गायकवाड आणि सुनील ऊर्फ कपिल रंदवे अशी अटक पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही सध्या ‘विशेष सुरक्षा पथका’मध्ये नेमणुकीस आहेत. गायकवाड हा चालक आहे. या दोघांची मूळ नेमणूक राज्य राखीव पोलीस दलात असून, प्रतिनियुक्तीवर हे दोघेही एसपीयूमध्ये काम करीत आहेत. काय आहे एसपीयू?- विशेष सुरक्षा पथक हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलीस गार्ड पुरविणारे पथक आहे. सफारी कपड्यांमधले बंदूकधारी पोलीस अधिकारी व कर्मचारी या विभागामार्फत व्हीव्हीआयपी, व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी पुरविले जातात. - ज्यांच्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. त्या विभागातच असे कर्मचारी काम करीत आहेत. - नुकत्याच उपराष्ट्रपतींच्या झालेल्या दौऱ्यामध्येही त्यांची सुरक्षा एसपीयूने पोलीस अधिकाऱ्यांऐवजी कर्मचाऱ्यांवरच ढकलल्याचेही समोर आले आहे. सध्या तरी या विभागामध्ये मनमौजी कारभार सुरू असून, कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.- विशेष सुरक्षा पथक हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलीस गार्ड पुरविणारे पथक आहे. सफारी कपड्यांमधले बंदूकधारी पोलीस अधिकारी व कर्मचारी या विभागामार्फत व्हीव्हीआयपी, व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी पुरविले जातात. - ज्यांच्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. त्या विभागातच असे कर्मचारी काम करीत आहेत. - नुकत्याच उपराष्ट्रपतींच्या झालेल्या दौऱ्यामध्येही त्यांची सुरक्षा एसपीयूने पोलीस अधिकाऱ्यांऐवजी कर्मचाऱ्यांवरच ढकलल्याचेही समोर आले आहे. सध्या तरी या विभागामध्ये मनमौजी कारभार सुरू असून, कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.