शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पोलिसांच्या लॉकअपची दुरवस्था, पिण्यासाठी पाणी नाही, अपु-या खोल्यांमुळे आरोपींची एकत्रच कोंबाकोंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 02:52 IST

साचलेला कचरा, पाण्याचे दुर्भिक्ष, अपुरी वीज, आरोग्याची अपुरी साधने आणि ढिसाळ व्यवस्थापन यामुळे राजगुरुनगर येथील पोलीस ठाण्याच्या लॉकअपची दुरवस्था झाली आहे. खोल्यांची संख्या अपुरी असून आरोपींची संख्या वाढली आहे. त्यामुळे एका खोलीत १० ते १२ आरोपी कोंबले जात आहेत.

राजगुरुनगर - साचलेला कचरा, पाण्याचे दुर्भिक्ष, अपुरी वीज, आरोग्याची अपुरी साधने आणि ढिसाळ व्यवस्थापन यामुळे राजगुरुनगर येथील पोलीस ठाण्याच्या लॉकअपची दुरवस्था झाली आहे. खोल्यांची संख्या अपुरी असून आरोपींची संख्या वाढली आहे. त्यामुळे एका खोलीत १० ते १२ आरोपी कोंबले जात आहेत. अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक आरोपी आजारी पडल्यामुळे त्यांना उपचार पुरवावे लागत आहेत.राजगुरुनगर शहरामध्ये खेड न्यायालयाची ब्रिटीश कालीन इमारत आहे. या इमारतीमध्ये तलसीलदार कार्यालय, पोलीस लॉकअप रुम आहे. पोलीस लॉक अपच्या 1० बाय १५च्या पाच खोल्या आहेत. या खोल्यांपैकी १ एका खोलीमध्ये तहसिल कचेरीचे महत्वाचे दस्तावेज ठेवण्यात आले आहे. त्या शेजार असलेली खोली पोलीस गार्ड यांच्या वापराकरिता ठेवलेली आहे. यातील एक खोली महिला आरोपींंसाठी असून उर्वरीत दोन खोल्यांमध्ये पुरुष आरोपींसाठी आहे.त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. या स्वच्छतागृहांसाठी पुरेसे पाणी पुरविले जात नाही. डासांचाही प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे आरोपींच्या आजारी पडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशा आरोपीना चांडोली येथील शासकीय रुग्णालयात नेऊन उपचार केले जातात.येथील डॉक्टर जुजबी उपचार करुन रुग्णांना पुण्याला घेऊन जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आजारी आरोपींची ने-आण करण्यासाठी पोलिसांना मनुष्यबळाची तजवीज करावी लागते. मुळातच याभागातील पोलीस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे याच भागात पोलिसांनी नविन इमारतीचे बांधकाम करावे अशी मागणी केली जात आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाच बाहेरून पाणी आणून आरोपींना दयावे लागते.दुर्गंधीचा त्रासखेड तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोपींच्या संख्येचा आकडा वाढू लागला आहे. चाकण, आळंदी व खेड पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील आरोपींना अटक केल्यानंतर या लॉकअपमध्ये ठेवण्यात येते. आरोपींच्या वाढलेल्या संख्येमुळे एका एका खोलीमध्ये १० ते ११ आरोपींना ठेवण्यात येत आहे. खोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश नाही. खोल्यांमध्येच स्वच्छतागृहे असल्याने दुर्गंधी पसरलेली आहे.

टॅग्स :Puneपुणे