शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या तिघांना अटक

By admin | Updated: May 7, 2017 03:17 IST

सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमविल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण केला. डीजे बंद करून शांततेत जाण्यास सांगितल्यामुळे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमविल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण केला. डीजे बंद करून शांततेत जाण्यास सांगितल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली, तर इतर ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास सहकारनगर येथील दाते बसथांब्याजवळ घडली. याबाबत पोलीस नाईक पी. सी. मरगजे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गणेश बाबूराव शिंदे (वय ४५), श्रावण बाबूराव शिंदे (वय २०, दोघे रा. सिद्धार्थनगर, सहकारनगर), सुमीत सुरेश शिर्के (वय २७, रा. आम्रपाली सोसायटी, अभिरुची मॉलच्या मागे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर रोहित शिंदे, राम गावडे, मंगेश राठोड, जावेद खाजुद्दीन पठाण, अभिजित सुरेश जाधव यांच्यासह दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस ठाण्याचे मोबाईल वाहन अडविले आणि ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना वाहनामधून बाहेर काढून सरकारी कामात अडथळा आणला. या गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक व्ही. के. कोळी करीत आहेत.बेकायदा जमावामुळे वाहतुकीला अडथळापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अटक केलेल्या व गुन्हा दाखल केलेल्या आरोपींनी सहकारनगर येथील दाते बसथांब्याजवळ सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमविल्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. त्या वेळी तेथे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तेथेच थांबून डीजे लावला. फिर्यादी यांनी त्यांना डीजे बंद करण्यास सांगितले; त्यामुळे यातील व्यक्तींनी फिर्यादी यांना धक्काबुक्की केली.