शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

पोलीसच करताहेत जीव मुठीत धरून काम, भिंती झाल्या आहेत जीर्ण, डोक्यावर अधांतरी कुजलेले पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:14 IST

ज्या पोलिसांनी नागरिकांचे रक्षण करायचे त्यांनाच भाड्याच्या खोलीत राहून जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वालचंदनगर : ज्या पोलिसांनी नागरिकांचे रक्षण करायचे त्यांनाच भाड्याच्या खोलीत राहून जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील पोलीस ठाणे नाव वालचंदनगरचे मात्र पोलीस ठाणे जंक्शन, अंथुर्णे हद्दीत आहे. या पोलीस ठाण्याची ओळख करून देण्यासाठी नावाचे बोर्डही नसल्याने अनेकांना घर आहे का पोलीस ठाणे आहे, हे कळत नाही. या पोलीस ठाण्याला स्वत:ची इमारत नसल्याने स्थापनेपासून २ रुपये भाड्याच्या खोल्यांत कामकाज करण्याची वेळ आली आहे. छतावरील पत्रे कुजल्याने व जीर्ण भिंती झाल्याने जीव मुठीत धरून गळक्या खोल्यांत पोलिसांना कामकाज करावे लागत आहे.या पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत करण्यात यावी, अशी येथील कर्मचाºयांची मागणी गेल्या १५ वर्षांपासून होताना दिसत आहे. २७ पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून हे पोलीस ठाणे चार खोल्यांच्या मासिक १० रुपये भाडेतत्त्वावर आहे. कोणतीही डागडुजी करणे अवघड झाल्याने जीर्ण भिंती गळक्या इमारतीतच कर्मचाºयांना कामकाज करण्याची वेळ ओढवली आहे. या पोलीस ठाण्याला नवीन स्वतंत्र इमारत व पोलीस वसाहती निर्माण करण्यासाठी शासनाने ८० लाख रुपये देऊन ५ एकर जमीन देण्यात आली. परंतु, अनेक अधिकारी आले गेले, तालुक्याचे प्रतिनिधीही बदलले तरीही इमारत झालेली नाही. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन तत्कालीन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या हस्ते सन ५ आॅगस्ट १९९० मध्ये करण्यात आलेले आहे.या खोल्या शेती महामंडळाच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे डागडुजी करण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. जुने पत्रे एकावर एक टाकून दिवस काढण्याची वेळ येथील कर्मचाºयांवर आली आहे. पावसाळ्यात सर्वत्र पाणी या खोल्यांमध्ये येते, यामुळे महत्त्वाची कागदपत्रे भिजण्याची भीती आहे.१५ वर्षांपूर्वी शेती महामंडळाला पोलीस ठाण्याच्या नियोजित नवीन इमारतीसाठी शासनाने ५ एकरांसाठी ८० लाख रुपये मोजलेले आहेत. त्यांची जागा निश्चित न झाल्याने व योग्य निधी उपलब्ध न झाल्याने गेल्या २७ वर्षांपासून पोलीस कर्मचाºयांना आपल्या हक्काच्या वसाहतीपासून वंचित राहावे लागले आहे.>१५ वर्षांपासून मागणी प्रलंबित...स्वत:ची इमारत नसल्याने स्थापनेपासून २ रुपये भाड्याच्या खोल्यांत कामकाज करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हक्काच्या इमारतीची अद्यापही प्रतीक्षा आहे. छतावरील पत्रे कुजल्याने व जीर्ण भिंती झाल्याने जीव मुठीत धरून गळक्या खोल्यांत पोलिसांना कामकाज करावे लागत आहे. ही परिस्थिती कधी बदलणार?या पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत करण्यात यावी, अशी येथील कर्मचाºयांचीमागणी गेल्या १५ वर्षांपासून होताना दिसत आहे. मात्रअद्याप ती पूर्ण झाली नाही.