शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

हिरवाईने नटलेल्या उद्यानात नामवंत कवींनी कवितांतून शिंपले आनंदाचे तुषार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:13 IST

कमला नेहरू पार्क मधील साहित्यिक कट्ट्यावर कवीसंमेलनाने रंगत आणली. अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर करून आनंदाचे तुषार शिंपले. 

पुणे : महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत चालणार्‍या कमला नेहरू पार्क मधील साहित्यिक कट्ट्यावर  कवीसंमेलनाने  रंगत आणली. हिरवाईने नटलेल्या उद्यानात अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर करून आनंदाचे तुषार शिंपले. जीवनातील अनुभवांची शिदोरी वाढत गेल्यावर ती शब्दबद्ध करून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे काव्य होय. कमी शब्दात मोठा आशय कवी व्यक्त करीत असतो, असे मत प्राचार्य शाम भुर्के यांनी सांगितले. 'स्त्री' ही कविता भारती पांडे यांनी सादर केली. स्त्री आणि वृक्ष हे नेहमी दुसर्‍यासाठी काही ना काही करीत असतात. तरीही झाडाला सदैव पुल्लिंगी का संबोधतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अश्विनी पिंगळे, मंजुषा आचरेकर, बाबा ठाकूर, संगीता पुराणिक, श्रीकृष्ण शाळीग्राम, रवींद्र देशमुख, सुजाता शेंडे यांनीही अनुक्रमे विठ्ठल, तपस्वी वृक्ष, संगीतकार, पावसाची ओढ व नशीब या कविता सादर केल्या.कट्ट्याच्या निमंत्रक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘कविसंमेलनाला कायमच उदंड प्रतिसाद मिळतो. या कवीसंमेलनाने दिवाळीच्या आनंदपर्वास प्रारंभ झाला आहे.अलका घळसासी यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणे