शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

हिरवाईने नटलेल्या उद्यानात नामवंत कवींनी कवितांतून शिंपले आनंदाचे तुषार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:13 IST

कमला नेहरू पार्क मधील साहित्यिक कट्ट्यावर कवीसंमेलनाने रंगत आणली. अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर करून आनंदाचे तुषार शिंपले. 

पुणे : महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत चालणार्‍या कमला नेहरू पार्क मधील साहित्यिक कट्ट्यावर  कवीसंमेलनाने  रंगत आणली. हिरवाईने नटलेल्या उद्यानात अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर करून आनंदाचे तुषार शिंपले. जीवनातील अनुभवांची शिदोरी वाढत गेल्यावर ती शब्दबद्ध करून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे काव्य होय. कमी शब्दात मोठा आशय कवी व्यक्त करीत असतो, असे मत प्राचार्य शाम भुर्के यांनी सांगितले. 'स्त्री' ही कविता भारती पांडे यांनी सादर केली. स्त्री आणि वृक्ष हे नेहमी दुसर्‍यासाठी काही ना काही करीत असतात. तरीही झाडाला सदैव पुल्लिंगी का संबोधतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अश्विनी पिंगळे, मंजुषा आचरेकर, बाबा ठाकूर, संगीता पुराणिक, श्रीकृष्ण शाळीग्राम, रवींद्र देशमुख, सुजाता शेंडे यांनीही अनुक्रमे विठ्ठल, तपस्वी वृक्ष, संगीतकार, पावसाची ओढ व नशीब या कविता सादर केल्या.कट्ट्याच्या निमंत्रक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘कविसंमेलनाला कायमच उदंड प्रतिसाद मिळतो. या कवीसंमेलनाने दिवाळीच्या आनंदपर्वास प्रारंभ झाला आहे.अलका घळसासी यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणे