शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पीएमपीला लागतो ‘दे धक्का!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 03:10 IST

गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बसेस ठिकठिकाणी बंद पडत असल्याने ‘दे धक्का’चे तंत्र प्रवाशांना म्हणावे लागत आहे

हडपसर : गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बसेस ठिकठिकाणी बंद पडत असल्याने ‘दे धक्का’चे तंत्र प्रवाशांना म्हणावे लागत आहे. शनिवारी चौकात सकाळी पावणेदहा वाजता बस बंद पडल्यामुळे प्रवाशांनाच ‘दे धक्का’ म्हणत बस ढकलून रस्त्याच्या बाजूला घेण्याची वेळ आली.मगरपट्टा चौकात सकाळी ९.४३ वाजता पीएमपी बस बंद पडली. दुचाकी-चारचाकी वाहनांची खच्चून गर्दी होती. वाहनचालकांनी कर्णकर्कश हॉर्न वाजवायला सुरुवात केली. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी खाली उतरून बस ढकलत पुढे नेली आणि वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला. वारंवार बस बंद पडत आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालय, चाकरमानी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पुण्याची वाहिनी म्हणून पीएमपीकडे पाहिले जात असले तरी, त्याचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली.पीएमपीची वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे सामान्य कामगारांनीसुद्धा स्वत:चे वाहन वापरणे पसंत केले आहे. रस्ते मात्र तेवढेच असले तरी वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची खच्चून गर्दी, कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा प्रत्येकाला त्रास सहन करावा लागत आहे.सहाआसनी रिक्षाचालकांनी प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचे कार्य सुरू केले. त्या वेळी पीएमपीच्या बसेस रिकाम्या धावू लागल्या. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने अनेक फतवे काढले. त्यामध्ये ‘सुखकर प्रवास पीएमपी बसचा प्रवास’ असे घोषवाक्य तयार केले. त्याशिवाय पीएमपीच्या प्रमुख थांब्यावर स्पीकरवरून प्रवाशांना पीएमपी बसने प्रवास करा, असे आवाहन केले जात होते. बसमध्ये सुमधुर गीतेही प्रवाशांना ऐकविली जात होती. झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेली बस दाखवा आणि बक्षीस मिळवा, तसेच पीएमपी बसवर नामफलक नसलेल्या बस दाखवा आणि बक्षीस मिळवा या योजना बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत. मात्र, गर्दी आणि प्रदूषणाचे कारण दाखवत सहाआसनी रिक्षांना शहराबाहेर काढले आणि पीएमपीचे पुन्हा पहिले पाढे सुरू झाले. वारंवार बंद पडणाऱ्या पीेएमपीची सेवा सुरळीत कधी होणार, असा खडा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. हडपसर ते कात्रज जाणारी बस नेहमीच खराब असतात, रस्त्यात बंद पडतात, सकाळची पहिली ट्रीपला बसला बिघाड ठरलेला असतोच.प्रवाशांना रोजच होतो मनस्तापरस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, खासगी वाहनांचा वापर टाळा, पीएमपीने प्रवास करा, असा नारा दिला जात आहे. मात्र, पीएमपीच्या बसेसठिकठिकाणी बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.सकाळी कामावर जाण्याची घाई, वेळेवर पोहोचलो नाही, तर बिनपगारी होण्याची भीती, बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही, तरीसुद्धा प्रवासी पीएमपीने प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Puneपुणे