शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

पीएमपीला लागतो ‘दे धक्का!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 03:10 IST

गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बसेस ठिकठिकाणी बंद पडत असल्याने ‘दे धक्का’चे तंत्र प्रवाशांना म्हणावे लागत आहे

हडपसर : गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बसेस ठिकठिकाणी बंद पडत असल्याने ‘दे धक्का’चे तंत्र प्रवाशांना म्हणावे लागत आहे. शनिवारी चौकात सकाळी पावणेदहा वाजता बस बंद पडल्यामुळे प्रवाशांनाच ‘दे धक्का’ म्हणत बस ढकलून रस्त्याच्या बाजूला घेण्याची वेळ आली.मगरपट्टा चौकात सकाळी ९.४३ वाजता पीएमपी बस बंद पडली. दुचाकी-चारचाकी वाहनांची खच्चून गर्दी होती. वाहनचालकांनी कर्णकर्कश हॉर्न वाजवायला सुरुवात केली. त्यामुळे बसमधील प्रवाशांनी खाली उतरून बस ढकलत पुढे नेली आणि वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला. वारंवार बस बंद पडत आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालय, चाकरमानी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पुण्याची वाहिनी म्हणून पीएमपीकडे पाहिले जात असले तरी, त्याचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली.पीएमपीची वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे सामान्य कामगारांनीसुद्धा स्वत:चे वाहन वापरणे पसंत केले आहे. रस्ते मात्र तेवढेच असले तरी वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची खच्चून गर्दी, कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा प्रत्येकाला त्रास सहन करावा लागत आहे.सहाआसनी रिक्षाचालकांनी प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचे कार्य सुरू केले. त्या वेळी पीएमपीच्या बसेस रिकाम्या धावू लागल्या. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने अनेक फतवे काढले. त्यामध्ये ‘सुखकर प्रवास पीएमपी बसचा प्रवास’ असे घोषवाक्य तयार केले. त्याशिवाय पीएमपीच्या प्रमुख थांब्यावर स्पीकरवरून प्रवाशांना पीएमपी बसने प्रवास करा, असे आवाहन केले जात होते. बसमध्ये सुमधुर गीतेही प्रवाशांना ऐकविली जात होती. झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेली बस दाखवा आणि बक्षीस मिळवा, तसेच पीएमपी बसवर नामफलक नसलेल्या बस दाखवा आणि बक्षीस मिळवा या योजना बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत. मात्र, गर्दी आणि प्रदूषणाचे कारण दाखवत सहाआसनी रिक्षांना शहराबाहेर काढले आणि पीएमपीचे पुन्हा पहिले पाढे सुरू झाले. वारंवार बंद पडणाऱ्या पीेएमपीची सेवा सुरळीत कधी होणार, असा खडा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. हडपसर ते कात्रज जाणारी बस नेहमीच खराब असतात, रस्त्यात बंद पडतात, सकाळची पहिली ट्रीपला बसला बिघाड ठरलेला असतोच.प्रवाशांना रोजच होतो मनस्तापरस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, खासगी वाहनांचा वापर टाळा, पीएमपीने प्रवास करा, असा नारा दिला जात आहे. मात्र, पीएमपीच्या बसेसठिकठिकाणी बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.सकाळी कामावर जाण्याची घाई, वेळेवर पोहोचलो नाही, तर बिनपगारी होण्याची भीती, बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही, तरीसुद्धा प्रवासी पीएमपीने प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Puneपुणे