शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

योजना कागदावर, मीटर त्वरित

By admin | Updated: May 20, 2017 05:28 IST

चोवीस तास पाणी योजनेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पैसे मोजावे लागणार, हे आहे. त्यासाठीच्या पाणी साठवण टाक्या, नव्या जलवाहिन्या असे

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चोवीस तास पाणी योजनेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पैसे मोजावे लागणार, हे आहे. त्यासाठीच्या पाणी साठवण टाक्या, नव्या जलवाहिन्या असे सर्व काही अद्याप कागदावरच असताना या योजनेतंर्गत तब्बल ६०४ कोटी रुपयांची मीटरखरेदीची निविदा प्रसिद्धही करण्यात आली असून, त्यातही विशिष्ट कंपनीलाच हे काम मिळावे, यासाठी प्रयत्न केले गेले असल्याचे बोलले जाते.योजनेला पाठिंबा देणाऱ्या तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेच टाक्यांच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून झालेल्या वादामुळे अचानक मीटरच्या कामाला हरकत घेतली. काँग्रेसनेही त्यांच्या सुरात सूर मिसळला. प्रथम पाईपलाईन, टाक्या व त्यानंतरच मीटर अशी भूमिका घेतली गेली; त्यामुळे आता निविदा प्रसिद्ध होऊन त्याला प्रतिसाद मिळाला असला तरी प्राप्त निविदा अद्याप खुल्या करण्यात आलेल्या नाहीत. फक्त दोनच निविदा प्राप्त झाल्या असून त्यात महापालिका आयुक्त कुणाल कुमार आग्रही असलेल्या ‘त्या’ कंपनीची निविदाही असल्याची माहिती मिळाली. निविदा प्राप्त होऊन आता ७ महिने झाले आहेत. तरीही प्रशासनात या विषयावर गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेतील जलवाहिन्यांच्या, पाणी साठवण टाक्यांच्या कामानंतर आता हे कामही वादात सापडले आहे. त्यामुळे कुणाल कुमार यांच्याबाबतच संशय निर्माण झाला आहे. एकूण ३ लाख १५ हजार मीटर यात बसवण्यात येणार आहेत, असे सांगण्यात येते. या मीटरबाबत खुद्द महापालिकेतही पदाधिकाऱ्यांना कसलीच माहिती नाही. त्यामुळेच ही ३ लाख १५ हजार संख्या कशावरून काढण्यात आली, असा सवाल काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी उपमहापौर आबा बागुल तसेच काही स्वयंसेवी संस्था-संघटनाांनी केला आहे. शहरात नळजोडांची अधिकृत संख्या साधारण दीड लाख असून तेवढेच; किंबहुना त्यापेक्षा जास्त अनधिकृत नळजोड आहेत. प्रशासनाकडूनच ही माहिती देण्यात येत असते. समान पाणी योजनेत बसवण्यात येणाऱ्या मीटरमुळे हे सर्व अनधिकृत नळजोड सापडतील व ते अधिकृत होतील, असे समर्थन करण्यात येत आहे. नवी मीटर अत्याधुनिक असून त्यांना सेन्सर बसवण्यात आले आहे. पाणी सोडले, की लगेचच ते मोजले जाईल. एखाद्या विभागातून जाताना विशिष्ट यंत्रावर या सेन्सरमधून संदेश दिले जातील व त्यावरून कोणत्या भागात किती पाणी दिले गेले व त्यापैकी किती पाण्याचा कोणाकडून वापर झाला ते या मीटरवरून अचूक समजण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.बिल भरणार कोण? : प्रबोधन नाहीयोजनेची चर्चा सुरू असतानाच प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी हे मीटर बसवावेत म्हणून प्रबोधन मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र , हे मीटर कसे बसवणार, मोठ्या सोसायट्यांमध्ये ते सोसायटीला बसवणार की प्रत्येक सदनिकेत बसवणार, झोपडपट्टीमधील रहिवाशांसाठी काय करणार, जुन्या वाड्यांमध्ये असलेल्या जुन्या नळजोडांना ते बसवले तर मग पाण्याचे बिल कोण भरणार, अशा बऱ्याच प्रश्नांवर मात्र प्रशासनाने काहीच प्रबोधन केले नाही.मीटर बसविण्याचा प्रयोग अयशस्वीप्रशासनाच्या या प्रबोधन मोहिमेतूनच नळजोडांना मीटर बसवण्यासाठी घाई केली जात आहे, हे उघड झाले. महापालिकेने आताही व्यावसायिक व औद्योगिक वापरासाठीच्या नळजोडांना मीटर बसवले आहेत. असे एकूण ४० हजार मीटर असून त्यांतील २० ते २५ हजार बंदच आहेत. घरगुती नळजोडांना मीटर बसवण्याचा प्रयोग याआधीही काही वर्षांपूर्वी प्रशासनाने केला होता; मात्र तो अयशस्वी झाला होता. आता पुन्हा एकदा सर्व नळजोडांना या योजनेअंतर्गत मीटर बसवण्यात येणार आहे. मात्र, बसवण्याआधीच ते वादग्रस्त झाले आहेत.