शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

‘उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा’

By admin | Updated: June 30, 2015 00:31 IST

‘उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा’ या अभंगासह काकडारती झाल्यानंतर श्रीक्षेत्र देहूतील देऊळवाड्यात होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेला विशेष महत्त्व आहे.

मंगेश पांडे, पिंपरी ‘उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा’ या अभंगासह काकडारती झाल्यानंतर श्रीक्षेत्र देहूतील देऊळवाड्यात होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेला विशेष महत्त्व आहे. रोज पहाटे होणारी विधिवत पूजा ही महापूजाच संबोधली जाते. पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी काकडारतीने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. भगवंताला जागे करण्यासाठी काकडारती म्हटली जाते. ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’याप्रमाणे अठरा अभंग गायले जातात. पुजारी, विणेकरी, सेवेकरी व भाविक या वेळी हजर असतात. त्यानंतर लगबग सुरू होते महापूजेची. पहाटे सव्वापाच वाजता सुरुवातीला शिळामंदिरात तुकोबारायांची महापूजा केली जाते. त्यानंतर राम मंदिरातील राम, लक्ष्मण, सीता यांची पूजा होते. साडेपाचला श्री विठ्ठल-रुक्मिणी स्वयंभू मूर्ती महापूजेला सुरुवात होते. ही पूजा भाविकांच्या हस्ते केली जाते. भगवंताची महापूजा म्हणजे एक अनुपम सोहळाच असतो. दीड तास चालणाऱ्या या पूजेसाठी १३ प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात. सुरुवातीला मंत्रोच्चारात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर जलाभिषेक केला जातो. त्यानंतर दही, दूध, तूप, मध, केळी या पंचामृताने स्रान घातले जाते. दोन्ही मूर्ती मखमली वस्त्राने पुसल्या जातात. पुन्हा भगवंताच्या डोक्यावर दूध आणि पायावर दही, केळी, मध लावले जाते. त्यानंतर येथे असलेल्या मोठ्या शंखात शुद्ध पाणी घेऊन त्याने दोन्ही मूर्तींना स्नान घातले जाते. मूर्ती मखमली वस्त्राने स्वच्छ केल्यानंतर अत्तर लावून भगवंताला नवीन वस्त्र परिधान केले जातात. विठ्ठलाच्या कपाळावर चंदनाचा गंध, त्यावर अबीर आणि रुक्मिणीमातेच्या कपाळावर कुंकवाचा गंध लावून मुकुट, दागिने चढविले जातात. गणपती, पांंडुरंग, ज्ञानेश्वरमहाराज, तुकाराममहाराज यांची आरती होते. हा अनुपम सोहळा चौघडा, झांज या वाद्यांच्या गजरात पार पडतो. श्री विठ्ठल-रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली, त्या वेळी मूर्तीजवळ तुळशी आणि अबीर होते. त्यामुळे तुळस आणि अबीर भगवंताला प्रिय असल्याची भाविकांची भावना आहे. त्यामुळे भगवंताला तुळशीहार घालण्याची प्रथा आहे. (क्रमश:)महापूजेनंतर विठ्ठल-रुक्मिणीला दररोज नवीन वस्त्र परिधान केले जाते. पांडुरंगाला अंगरखा, उपरणे व सोवळे, तर रुक्मिणीला चोळी आणि सहावार साडी असा पोशाख असतो. सणासुदीच्या दिवशी पांडुरंगाला पिवळ्या रंगाचे उपरणे आणि रुक्मिणीला हिरव्या रंगाची साडी घातली जाते. वर्षभरात सुमारे १७० महापूजा होतात. तीन ते चार पिढ्यांपासून महापूजा करणारे कुटुंब आहेत. यामध्ये पुण्यासह, मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागातील कुटुंबांचा समावेश आहे. दर वर्षी ठरलेल्या तिथीला ते आदल्या दिवशीच मंदिरात हजर असतात. त्यानंतर दैनंदिन पूजादेखील असतात.

गेल्या सात वर्षांपासून नित्यनेमाने देऊळवाड्यात महापूजा करीत आहे. दीड ते दोन तासांच्या कालावधीत संपूर्ण विधिवत पूजा केली जाते. भगवंताची सेवा करताना प्रसन्न आणि समाधानी वाटते.

- धनंजय मोरे, पुजारी.